AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या चार वस्तू, पैशांच्या सर्व समस्या होतील दूर

घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास तुमच्या आयुष्यात वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात. वास्तुदोष दूर करण्याचे अनेक उपाय वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहेत, त्यातीलच एका उपायाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या चार वस्तू, पैशांच्या सर्व समस्या होतील दूर
वास्तुशास्त्र Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 22, 2026 | 10:13 AM
Share

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी वेगवेगळे उपाय सांगण्यात आले आहेत. आपल्या दैनंदिन जीवनात आपण अशा काही चूका करत असतो, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात. आज आपण वास्तुदोषामुळे निर्माण झालेल्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठी उपाय जाणून घेणार आहोत. वास्तुशास्त्र आणि ज्योतिशास्त्रामध्ये पाण्याला चंद्राचं प्रतिक मानलं गेलं आहे. जर आपण अंघोळीच्या पाण्यात आपल्या घरातील काही विशिष्ट गोष्टी मिसळून त्या पाण्याने अंघोळ केली तर वास्तुदोष दूर होतो. घराला आर्थिक स्थैर्य प्राप्त होते, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. चला तर मग या गोष्टींबद्दल जाणून घेऊयात.

सैंधव मीठ – मीठामुळे ऊर्जा साफ होते. नकारात्मक ऊर्जा नष्ट होते असं मानलं जातं. जर तुम्ही कोमट पाण्यात थोड सैंधव मीठ टाकून त्या पाण्यानं अंघोळ केली तर तुमचं वाईट ऊर्जेपासून संरक्षण होतं. तसेच तुम्हाला कोणाची नजर लागली असेल तर ती देखील यामुळे दूर होते. तुमच्या पैशांशी संबंधित सर्व अडचणी दूर होतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

तेजपत्ता – तेजपत्ता ही केवळ खाण्याचीच गोष्ट नाही तर तेजपत्त्याला यशाचं प्रतिक देखील मानलं जातं. जर तुम्ही अंघोळीच्या पाण्यात थोडासा तेज पत्ता मिसळून अंघोळ केली तर तुमची सर्व कामे मार्गी लागतात. तसेच तुमच्या आत्मविश्वासात देखील वाढ होते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

लवंग – लवंगेला वास्तुशास्त्रात खूप महत्त्व आहे. जर तुम्ही अंघोळीच्या पाण्यात लवंग टाकून अंघोळ केली तर तुमचं नशीब उजळतं, तुमचे अडलेले सर्व कामे मार्गी लागतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

गुलाबाच्या पाकळ्या – गुलाबाच्या पाकळ्या जर अंघोळीच्या पाण्यात मिसळल्या तर सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते, मनाला शांती मिळते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ.
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून.....
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून......
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात.
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप...
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप....
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक.
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं.
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ.
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे.
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली.