AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : वास्तूदोष दूर करण्यासाठी असा करा फुलांचा वापर, हे उपाय बनवू शकतात मालामाल

रागावलेल्या मैत्रिणीच्या गालावर हसू फुलवण्यापासून ते ते देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अनेक बाबतीत फुलं ही महत्वाचा दुवा असतात. ही फुले घरातील अनेक वास्तू दोष दूर करण्यासाठी  प्रभावी ठरतात.

Vastu Tips : वास्तूदोष दूर करण्यासाठी असा करा फुलांचा वापर, हे उपाय बनवू शकतात मालामाल
वास्तूशास्त्रImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Apr 15, 2023 | 11:05 PM
Share

मुंबई : फुलांचा भारताच्या संस्कृतीशी खूप जुना संबंध आहे. पूजेपासून कवींच्या कवितांपर्यंत सर्वत्र फुलांचा उल्लेख होतो. रागावलेल्या मैत्रिणीच्या गालावर हसू फुलवण्यापासून ते ते देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अनेक बाबतीत फुलं ही महत्वाचा दुवा असतात. ही फुले घरातील अनेक वास्तू दोष दूर करण्यासाठी  प्रभावी ठरतात. वास्तुशास्त्राच्या तज्ज्ञांच्या मते फुलांशी संबंधीत असे काही उपाय आहेत  ज्यामुळे आर्थिक परिस्थिती झपाट्याने सुधारू शकते. फुलांचा वापर करण्यापूर्वी त्यांच्याशी संबंधित काही महत्त्वाचे नियम समजून घ्या.

घराच्या उत्तर दिशेला जास्वंदाच्या फुलाचे झाड लावा

वास्तुशास्त्राचे तज्ज्ञ सांगतात की घरात लाल जास्वंदाच्या फूलाचे झाड  लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा सर्वत्र संचारते. जास्वंदाचे फूल आई भवानी आणि गणेशाला खूप प्रिय आहे. घरामध्ये जास्वंदाचे झाड लावताना लक्षात ठेवा की ते नेहमी उत्तर दिशेला लावावे.

चमत्कारीक आहे कमळाचे फूल

हिंदू धर्मात अनेक देवी-देवतांना कमळाचे फूल धरलेले दाखवले आहे. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघेही कमळाचे फूल धारण करतात, तर माता सरस्वती आणि भगवान ब्रह्मदेवाचे आसन केवळ कमळाचे फूल आहे. घरामध्ये कमळाच्या फुलाचे रोप लावल्याने घरामध्ये आर्थिक समृद्धी येते आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होतात.

प्रेमाचे प्रतीक आहे गुलाब

प्रेमात पडलेले लोकं अनेकदा गुलाबाच्या फुलांनी आपले प्रेम व्यक्त करतात. पूजेतही गुलाबाच्या फुलांचा वापर केला जातो.  नैऋत्य दिशेला गुलाबाचे फूल लावल्याने घरात सुख-समृद्धी राहते. याशिवाय गुलाब घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतो.

पळसाचे फुलं आहेत फारच प्रभावी

जर एखाद्या व्यक्तीची आर्थिक स्थिती चांगली नसेल, तर त्याने पळसाच्या फुलाचा विशेष उपाय करावा, असं वास्तुशास्त्रात सांगितलं आहे. पळसाचं फूल व नारळ पांढऱ्या कपड्यात बांधून तिजोरीत किंवा पैसे असलेल्या ठिकाणी ठेवावं. असं केल्यानं तुमचं आर्थिक संकट लवकरच दूर होईल. हा एक उपाय केल्याने घरात धनाची कमतरता भासणार नाही. पळसाची ताजी फुलं न मिळाल्यास त्याची वाळलेली फुलंही वापरता येतील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी