AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastushastra : घरात साप आला तर ही चूक कधीच करू नका, बँक बॅलन्स होईल खाली, घरात येते गरिबी

वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मामध्ये सापाला प्रगती आणि अध्यात्मिक विकासाचं प्रतिक मानलं जातं. जर तुमच्या घरात साप आला असेल तर तो एक शुभ संकेत असतो, असंही वास्तुशास्त्रात म्हटलं आहे. मात्र जेव्हा एखाद्याच्या घरात साप निघतो, तेव्हा आपण भीतीपोटी काही चुका करतो, त्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होण्याची शक्यता असते.

Vastushastra : घरात साप आला तर ही चूक कधीच करू नका, बँक बॅलन्स होईल खाली, घरात येते गरिबी
snakeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 17, 2026 | 8:18 PM
Share

उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्यामध्ये जमीन गरम झाल्याने सापांना उष्णतेचा त्रास होतो, आणि साप बिळातून बाहेर पडतात. साप मुळातच थंड रक्ताचा प्राणी असल्यामुळे त्यांना उष्णतेचा प्रचंड त्रास होतो. अशावेळी ते लपण्यासाठी थंड आणि अंधाऱ्या जागेचा शोध घेत असतात. त्यामुळे अनेकदा अशा जागेचा शोध घेत असाताना ते तुमच्या घरात देखील घुसू शकतात. त्यामुळेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सर्पंदंशाच्या घटनांमध्ये वाढ होते. जेव्हा एखाद्या घरामध्ये साप निघतो, तेव्हा तो अनेकदा योगायोग असतो. मात्र वास्तुशास्त्रानुसार घरात साप दिसणं हे एक शुभ लक्षण मानलं जातं. वास्तुशास्त्रामध्ये सापाला प्रगती आणि अध्यात्मिक विकासाचं प्रतिक मानलं गेले आहे. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात साप निघतो, तेव्हा त्याचा अर्थ असा की, लवकरच तुमचे दिवस बदलणार आहेत, ते तुम्हाला होणाऱ्या धन प्राप्तीचे देखील योग असतात. सोबतच तुमचा प्रवास हा अध्यात्मिक विकासाकडे सुरू झाला आहे, याचे देखील ते संकेत असतात. परंतु सापांबद्दल आपल्या मनात अनेक गैर समज असतात, त्यामुळे आपण साप दिसला की त्याला लगेच मारतो, मात्र असं न करता त्याची माहिती सर्पमित्रांना द्यावी ते सापाला रेस्क्यू करून सुरक्षित ठिकाणी सोडतील.

तुमच्या घरात जर साप उत्तर दिशेकडून निघाला असेल तर तो अत्यंत मोठा संकेत असतो. लवकरच तुमचे दिवस बदलणार आहेत. तुमचं नशीब चमकणार आहे. तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायामध्ये मोठा फयदा होणार आहे, याचा तो संकते असतो. तसेच जेव्हा एखाद्या व्यक्तीचा अध्यात्माच्या दिशेनं प्रवास सुरू झालेला असतो, तेव्हा देखील असा संकेत तुम्हाला मिळू शकतो. हिंदू धर्मामध्ये सापाला अध्यात्माच्या क्षेत्रात मोठं महत्त्व आहे. भगवान महादेव यांच्या गळ्यात देखील साप आहे. तसेच भगवान विष्णू हे शेष नागावर बसलेले आहेत. नागपंचमीच्या दिवशी आपण नागांची पूजा करतो.

मात्र या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवावी वास्तुशास्त्र तसेच निसर्गाचा समतोल ठेवण्यासाठी देखील ही गोष्ट महत्त्वाची आहे. घरात जेव्हा साप निघतो, तेव्हा त्याला कधीही मारू नका, तर त्याची माहिती ही सर्पमित्रांना द्या. सर्पमित्र त्या सापाला रेस्क्यू करतील. वास्तुशास्त्रानुसार तुम्ही जेव्हा सापाला मारतात, तेव्हा तुमच्या कुंडलीमध्ये कालसर्पयोग तयार होतो. त्यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात. तुमचं घर आर्थिक दृष्या देखील अस्थिर बनतं. तसेच सापांना मारल्यास पितृदोष देखील निर्माण होतो, असं वास्तुशास्त्र सांगतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?