AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाकुंभ मेळ्यातून का परत जात आहेत नागा साधू? जाणून घ्या हे खास कारण

श्रद्धेचा महान सण महा कुंभ मेळ्याला 13 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. याची सांगता महाशिवरात्रीच्या पवित्र मुहूर्तावर म्हणजेच 26 फेब्रुवारीला होईल. परंतु नागा साधूंनी वसंत पंचमीनंतर महा कुंभातून परतण्यास सुरुवात केली आहे. या मागचे कारण काय आहे ते जाणून घेऊ.

महाकुंभ मेळ्यातून का परत जात आहेत नागा साधू? जाणून घ्या हे खास कारण
आकांक्षा वाघ
आकांक्षा वाघ | Edited By: | Updated on: Feb 06, 2025 | 4:42 PM
Share

प्रयागराज येथील महा कुंभा दरम्यान अनेक भाविकांनी पवित्र संगम मध्ये श्रद्धेने स्नान केले. तर देशभरातील आखाड्यातील नागा साधू आणि संतही स्नानासाठी आले होते. शाही स्नान करण्यासाठी आणि देशभरातील ऋषीमुनींचे दर्शन घेण्यासाठी तसेच त्यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी लोक महा कुंभात आले होते. परंतु आता सर्व नागा साधू आपल्या आखाड्यांसह परत जात आहे. प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की महा कुंभाचा उत्सव महाशिवरात्रीपर्यंत सुरू राहणार आहे तर मग नागा साधू का परत जात आहेत?

महाकुंभाचे शाही स्नान आणि नागा साधू

नागा साधू आपल्या जीवनातील सर्व सुख सुविधा सोडून पूर्णपणे ध्यानात मग्न असतात. सहसा ते आश्रम, पर्वत आणि जंगलामध्ये तपश्चर्या करतात. परंतु जेव्हा जेव्हा कुंभमेळा आयोजित केला जातो तेव्हा हे सर्व नागा साधू आणि संत तिथे येतात आणि शाही स्नान करण्याचे पुण्य प्राप्त करतात. यावेळी प्रयागराज मध्ये आयोजित महा कुंभाचे पहिले शाही स्नान मकर संक्रांतीच्या दिवशी 14 जानेवारीला करण्यात आले तर दुसरे शाही स्नान मौनी अमावस्येला आणि तिसरे शाही स्नान वसंत पंचमीला झाले.

परत जात आहेत नागा साधू

नागा साधूंसाठी शाही स्नानाला विशेष महत्त्व आहे. शाही स्नान केल्याने 1000 अश्वमेध यज्ञ एवढे पुण्य प्राप्त होते असे मानले जाते. महा कुंभामध्ये शाही स्नान केल्यानंतर नागा साधू ध्यान करतात आणि धार्मिक ज्ञानावर चर्चा करतात. त्यामुळे वसंत पंचमीचे दिवशी तिसरे आणि शेवटचे शाही स्नान करून सर्व नागा साधू आपापल्या आखाड्यांसह महा कुंभातून परत जात आहेत.

पुन्हा कधी दिसणार नागा साधू?

नागा साधू महा कुंभाच्या वेळीच एकत्र येतात आता ते पुढील महा कुंभ म्हणजेच 2027 मध्ये होणाऱ्या नाशिक कुंभमेळ्यात दिसणार आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या काठावर महा कुंभाचे आयोजन करण्यात येणार आहे. जिथे हजारो नागा साधू एकत्र येतील.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपकेंचं पुन्हा आंदोलन?
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपके पुन्हा आंदोलनाला बसले, हायकोर्ट टायपिंग परीक्षा प्रकरण तापलं
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंबाबत..
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या दाव्यावर म्हणाले...
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा खुलासा
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा कुणबी प्रमाणपत्राबाबत मोठा खुलासा
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... भावेश कावरेचं मोठं विधान
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... ब्रोकर भावेश कावरे ठाकरेंच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाला?
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर, व्हिडीओच आला समोर
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्...
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्... पोलिसांनीच मारहाण केल्याच्या आरोपाने मोठी खळबळ
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी...
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी तरी लाज शिल्लक असेल तर...
लातूरमधील घटना: रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
लातूरमधील खासगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, नातेवाईकांकडून निष्काळजीपणाचा आरोप
रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत काय घडलं?
Maratha Arakshan | रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?