AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागा बाबांनी अखेर सांगितलं रहस्य, महाकुंभनंतर नेमके कुठे जातात नागा साधू…

महाकुंभ मेळाव्यात तीन अमृत स्नान पूर्ण झाले आहेत, आणि आता आखाडे रिकामे होण्यास सुरुवात झाली आहे. महाकुंभ मेळाव्या सर्वाधिक आकर्षणाचे केंद्र नागा साधूच असतात. नेहमीच एक प्रश्न विचारला जातो की अखेर अमृत स्नानानंतर हजारो लाखो संख्येत आलेले नागा साधू कोठे गायब होतात...

नागा बाबांनी अखेर सांगितलं रहस्य, महाकुंभनंतर नेमके कुठे जातात नागा साधू...
| Updated on: Feb 04, 2025 | 5:44 PM
Share

महाकुंभ मेळाव्यात आतापर्यंत तीन अमृत स्नान पूर्ण झालेत आणि आता आखाडे हळूहळू खाली होण्यास सुरुवात झालेली आहे. महाकुंभातील सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र असलेले नागा साधू कुंभ संपल्यानंतर कुठे जातात. अमृत स्नानासाठी लाखोंच्या संख्येत आलेले नागा साधू नंतर कोठे गायब होतात? निरंजन आखाड्याच्या नागा बाबा दिगंबर दर्शन गिरी महाराजांनी एका खाजगी चॅनलशी बोलताना नागा साधूंच्या निर्गमनाबद्दल माहिती दिलेली आहे. दिगंबर दर्शन गिरी जी महाराज म्हणाले की आतापर्यंत तीन अमृत स्नान झाली आहेत. उद्याचे एक स्नान शिल्लक आहे. गुरु भाई स्वतंत्र स्नान करण्यासाठी जातात जे त्रिवेणी संगमात होते. त्यानंतर ते छावणीत परत येतात. त्यानंतर पंच परमेश्वरची प्रक्रिया सुरु होते. ७ तारखेला पूजा आणि हवन केल्यानंतर जो नवा पंच निवडला जातो. त्याची निवड करून मग आम्ही काशीच्या दिशेने निघतो.

काशीत आमचे स्थायी स्वरुपाचे आखाडे आहेत. तेथे शिवरात्रि मेला आणि मसानची होळी खेळून आम्ही आपआपल्या गंतव्य स्थानी निघतो. ते पुढे म्हणाले की शिवरात्रि आणि होळी नागा बाबांची काशीत होते. तेथे आम्ही महादेवाचा अभिषेक करुन आखाड्यात परततो. होळी खेळल्यानंतर आम्ही हरिद्वाराच्या दिशेने निघतो. नागा संन्याशी संपूर्ण भारतात जागो जागी रहातात. देशाच्या वेगवेगळ्या काही साधू त्यांच्या गुरुच्या आखाड्यात सेवा करतात. कोणी हिमालय, केदारनाथ, बद्रीनाथ, हिमाचल,जम्मू -कश्मीर ,नर्मदाखंड तर कोणी नेपाळमध्ये जातो. जिकडे त्यांचे स्थानिक आखाडे आहेत तिकडे ते जातात. जेथे त्यांची ओढ असते तिकडे ते जातात. म्हणजे चारी दिशांना पसरले जातात.

धर्माचे रक्षण करणे आमचे काम – दिगंबर दर्शनगिरीजी महाराज

नागा साधू यांना पराक्रमी म्हटले जाते. असे काय आहे नागा साधूमध्ये जे लोकांना माहिती नाही ? असे विचारले असतात दिगंबर दर्शन गिरीजी महाराज म्हणाले की,’ आदिकाळात इंग्रज आणि मुघलांचे शासन होते. या राजाच्या काळात जेव्हाही कधी धर्मावर आक्रमण झाले तेव्हा नागांनी लढाई लढून आपले बलिदान दिले आहे आणि धर्माच्या रक्षणासाठी नागासाधू बनले. भाला, त्रिशूल, धनुष्य, गदा, तलवार चालविण्याचे प्रशिक्षण देखील असते. धर्मासाठी बलिदान देणे त्यांचा धर्म आहे.मी सवा लाख रुद्राक्ष धारण केले आहेत. हा भगवान शंकराचा आशीर्वाद आहे.’

Follow Us
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?.
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा.
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?.
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ.
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी.
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार.