AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागा बाबांनी अखेर सांगितलं रहस्य, महाकुंभनंतर नेमके कुठे जातात नागा साधू…

महाकुंभ मेळाव्यात तीन अमृत स्नान पूर्ण झाले आहेत, आणि आता आखाडे रिकामे होण्यास सुरुवात झाली आहे. महाकुंभ मेळाव्या सर्वाधिक आकर्षणाचे केंद्र नागा साधूच असतात. नेहमीच एक प्रश्न विचारला जातो की अखेर अमृत स्नानानंतर हजारो लाखो संख्येत आलेले नागा साधू कोठे गायब होतात...

नागा बाबांनी अखेर सांगितलं रहस्य, महाकुंभनंतर नेमके कुठे जातात नागा साधू...
| Updated on: Feb 04, 2025 | 5:44 PM
Share

महाकुंभ मेळाव्यात आतापर्यंत तीन अमृत स्नान पूर्ण झालेत आणि आता आखाडे हळूहळू खाली होण्यास सुरुवात झालेली आहे. महाकुंभातील सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र असलेले नागा साधू कुंभ संपल्यानंतर कुठे जातात. अमृत स्नानासाठी लाखोंच्या संख्येत आलेले नागा साधू नंतर कोठे गायब होतात? निरंजन आखाड्याच्या नागा बाबा दिगंबर दर्शन गिरी महाराजांनी एका खाजगी चॅनलशी बोलताना नागा साधूंच्या निर्गमनाबद्दल माहिती दिलेली आहे. दिगंबर दर्शन गिरी जी महाराज म्हणाले की आतापर्यंत तीन अमृत स्नान झाली आहेत. उद्याचे एक स्नान शिल्लक आहे. गुरु भाई स्वतंत्र स्नान करण्यासाठी जातात जे त्रिवेणी संगमात होते. त्यानंतर ते छावणीत परत येतात. त्यानंतर पंच परमेश्वरची प्रक्रिया सुरु होते. ७ तारखेला पूजा आणि हवन केल्यानंतर जो नवा पंच निवडला जातो. त्याची निवड करून मग आम्ही काशीच्या दिशेने निघतो.

काशीत आमचे स्थायी स्वरुपाचे आखाडे आहेत. तेथे शिवरात्रि मेला आणि मसानची होळी खेळून आम्ही आपआपल्या गंतव्य स्थानी निघतो. ते पुढे म्हणाले की शिवरात्रि आणि होळी नागा बाबांची काशीत होते. तेथे आम्ही महादेवाचा अभिषेक करुन आखाड्यात परततो. होळी खेळल्यानंतर आम्ही हरिद्वाराच्या दिशेने निघतो. नागा संन्याशी संपूर्ण भारतात जागो जागी रहातात. देशाच्या वेगवेगळ्या काही साधू त्यांच्या गुरुच्या आखाड्यात सेवा करतात. कोणी हिमालय, केदारनाथ, बद्रीनाथ, हिमाचल,जम्मू -कश्मीर ,नर्मदाखंड तर कोणी नेपाळमध्ये जातो. जिकडे त्यांचे स्थानिक आखाडे आहेत तिकडे ते जातात. जेथे त्यांची ओढ असते तिकडे ते जातात. म्हणजे चारी दिशांना पसरले जातात.

धर्माचे रक्षण करणे आमचे काम – दिगंबर दर्शनगिरीजी महाराज

नागा साधू यांना पराक्रमी म्हटले जाते. असे काय आहे नागा साधूमध्ये जे लोकांना माहिती नाही ? असे विचारले असतात दिगंबर दर्शन गिरीजी महाराज म्हणाले की,’ आदिकाळात इंग्रज आणि मुघलांचे शासन होते. या राजाच्या काळात जेव्हाही कधी धर्मावर आक्रमण झाले तेव्हा नागांनी लढाई लढून आपले बलिदान दिले आहे आणि धर्माच्या रक्षणासाठी नागासाधू बनले. भाला, त्रिशूल, धनुष्य, गदा, तलवार चालविण्याचे प्रशिक्षण देखील असते. धर्मासाठी बलिदान देणे त्यांचा धर्म आहे.मी सवा लाख रुद्राक्ष धारण केले आहेत. हा भगवान शंकराचा आशीर्वाद आहे.’

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.