AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूजेनंतर आरती करणे का महत्त्वाचे असते? असे आहेत आरतीचे नियम

कुठलीही विशेष पुजा करताना जेव्हा तुम्ही शेवटी आरती करता तेव्हाच पूजा पूर्ण होते. आरती करण्याही योग्य पद्धत आहे. आरती म्हणजे देवाची स्तूती करणे. शास्त्रोक्त पद्धतीने आरती केल्याने चांगले परिणाम मिळतात प्राप्त होतात

पूजेनंतर आरती करणे का महत्त्वाचे असते? असे आहेत आरतीचे नियम
आरतीचे महत्त्व Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 08, 2023 | 7:40 PM
Share

मुंबई : देवाची उपासना करण्याला आणि त्याची पूजा करण्याला हिंदी धर्मात विशेष महत्त्व आहे, यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे माणूस सदाचार आणि धार्मिकतेकडे जातो आणि वाईट कर्मांपासून दूर राहातो. कुठलीही विशेष पुजा करताना जेव्हा तुम्ही शेवटी आरती करता तेव्हाच पूजा पूर्ण होते. आरती करण्याही योग्य पद्धत आहे. आरती म्हणजे देवाची स्तूती करणे. शास्त्रोक्त पद्धतीने आरती केल्याने चांगले परिणाम मिळतात प्राप्त होतात, तसेच पूजेदरम्यान काही उणिवा किंवा चुका राहिल्यास क्षमाही होते. धर्मग्रंथातील आरतीच्या वर्णनात, एका संस्कृत श्लोकात असे म्हटले आहे की, मंत्राशिवाय आणि कोणत्याही कृतीशिवाय, म्हणजेच आवश्यक कर्मकांड न करता पूजा केल्यानंतर आरती (Aarti Rules) केल्यास त्यात पूर्णता प्राप्त होते.

आरती करण्याचे सामान्य नियम

1. एक, पाच, सात किंवा विषम संख्येने दीप लावून आरती करावी. साधारणपणे एक किंवा पाच दिवे लावून आरती केली जाते. 2. आपल्या आवडत्या देवतेची स्तुती जप करण्याबरोबरच, त्यांच्या मंत्रांचाही आरतीमध्ये समावेश आहे. 3. आरतीचे करताना, भक्त मंत्राच्या शब्दांचा आकार बनवून आरती फिरवतो, परंतु जर मंत्र मोठा आणि कठीण असेल तर तसे करणे शक्य नाही. 4. या समस्येवर उपाय सांगताना आपल्या ऋषींनी ओमचा आकार बनवण्याविषयी सांगितले आहे. ऋषी म्हणतात की प्रत्येक मंत्राची सुरुवात ओम या शब्दाने होते. 5. भक्ताने हातात धरलेली आरती अशा प्रकारे फिरवावी की ओमचा आकार तयार होईल. 6. अशाप्रकारे आरती करताना भगवंताच्या गुणांचा जप करण्याबरोबरच मंत्रांचाही जप करावा लागतो. 7. दिव्याच्या ज्योतीची दिशा पूर्व दिशेला ठेवल्याने आयुर्मान वाढते, पश्चिम दिशेला ठेवल्याने दुःख वाढते, दक्षिण दिशेला ठेवल्याने नुकसान होते आणि ज्योत उत्तर दिशेला ठेवल्याने आर्थिक लाभ होतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.