AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kaliyug Story : चारही युगात कलियुग का मानले जाते श्रेष्ठ, अशी आहे पौराणिक कथा

महर्षी व्यासांनी ऋषींचे म्हणणे ऐकून त्यांना सांगितले की, कलियुग हे चार युगांपैकी सर्वोत्तम युग आहे, कारण जे पुण्य सत्ययुगात 10 वर्षे उपासना, जप, तपश्चर्या आणि व्रताने प्राप्त होते, तेच पुण्य केवळ एका वर्षात प्राप्त होते.

Kaliyug Story : चारही युगात कलियुग का मानले जाते श्रेष्ठ, अशी आहे पौराणिक कथा
कलियुगImage Credit source: Social Media
| Updated on: Feb 12, 2024 | 7:48 PM
Share

मुंबई : वेदानुसार हिंदू धर्मात चार युगे मानली जातात. पहिले सतयुग, दुसरे त्रेतायुग ज्यामध्ये भगवान विष्णूने रामाच्या रुपात अवतार घेतला, तिसरा द्वापारयुग ज्यामध्ये भगवान विष्णू कृष्णाच्या रुपात अवतरले आणि चौथे आणि शेवटचे युग हे कलियुग (Kaliyug) मानले जाते. जे सध्या सुरू असल्याचे मानले जात आहे. कलियुग हे चार युगांपैकी सर्वात लहान मानले जाते. मान्यतेनुसार, सर्वात जास्त अनीति, अन्याय, हिंसा आणि पापं कलियुगातच होतात. पण मग कलियुग हे चार युगांपैकी श्रेष्ठ का मानले गेले? यामागे एक रंजक कथा आहे, चला जाणून घेऊया.

कलियुगशी संबंधित कथा?

विष्णु पुराणानुसार, एकदा ऋषी आपापसात चर्चा करत होते की चार युगांपैकी सर्वोत्तम युग कोणते आहे. या विषयावर प्रत्येकाची वेगवेगळी मते होती, त्यामुळे ही चर्चा वादाचा विषय बनली आणि कोणताही तोडगा निघू शकला नाही, मग या वादाचे निराकरण करण्यासाठी सर्व ऋषी महर्षी व्यासांकडे गेले. महर्षी व्यास यांना वेदांचे जनक मानले जाते.

महर्षी व्यासांनी ऋषींचे म्हणणे ऐकून त्यांना सांगितले की, कलियुग हे चार युगांपैकी सर्वोत्तम युग आहे, कारण जे पुण्य सत्ययुगात 10 वर्षे उपासना, जप, तपश्चर्या आणि व्रताने प्राप्त होते, तेच पुण्य केवळ एका वर्षात प्राप्त होते. त्रेतायुगात हे पुण्य उपासना, जप, तपश्चर्या आणि उपवासाने प्राप्त होते आणि द्वापर युगात तेच पुण्य केवळ एक महिन्याच्या नामजप आणि तपश्चर्येने प्राप्त होते, तर कलियुगात तेच पुण्य केवळ एका दिवसाच्या नामजप आणि तपश्चर्येने प्राप्त होते. ,म्हणूनच महर्षी व्यास म्हणतात की कलियुग हे चार युगांमध्ये श्रेष्ठ आहे. ज्यामध्ये फक्त एका दिवसाच्या भक्तीने 10 वर्षांचे पुण्य मिळवता येते. तेव्हापासून कलियुग हे सर्वश्रेष्ठ युग मानले जाते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.