AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kaliyug Story : चारही युगात कलियुग का मानले जाते श्रेष्ठ, अशी आहे पौराणिक कथा

महर्षी व्यासांनी ऋषींचे म्हणणे ऐकून त्यांना सांगितले की, कलियुग हे चार युगांपैकी सर्वोत्तम युग आहे, कारण जे पुण्य सत्ययुगात 10 वर्षे उपासना, जप, तपश्चर्या आणि व्रताने प्राप्त होते, तेच पुण्य केवळ एका वर्षात प्राप्त होते.

Kaliyug Story : चारही युगात कलियुग का मानले जाते श्रेष्ठ, अशी आहे पौराणिक कथा
कलियुगImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Feb 12, 2024 | 7:48 PM
Share

मुंबई : वेदानुसार हिंदू धर्मात चार युगे मानली जातात. पहिले सतयुग, दुसरे त्रेतायुग ज्यामध्ये भगवान विष्णूने रामाच्या रुपात अवतार घेतला, तिसरा द्वापारयुग ज्यामध्ये भगवान विष्णू कृष्णाच्या रुपात अवतरले आणि चौथे आणि शेवटचे युग हे कलियुग (Kaliyug) मानले जाते. जे सध्या सुरू असल्याचे मानले जात आहे. कलियुग हे चार युगांपैकी सर्वात लहान मानले जाते. मान्यतेनुसार, सर्वात जास्त अनीति, अन्याय, हिंसा आणि पापं कलियुगातच होतात. पण मग कलियुग हे चार युगांपैकी श्रेष्ठ का मानले गेले? यामागे एक रंजक कथा आहे, चला जाणून घेऊया.

कलियुगशी संबंधित कथा?

विष्णु पुराणानुसार, एकदा ऋषी आपापसात चर्चा करत होते की चार युगांपैकी सर्वोत्तम युग कोणते आहे. या विषयावर प्रत्येकाची वेगवेगळी मते होती, त्यामुळे ही चर्चा वादाचा विषय बनली आणि कोणताही तोडगा निघू शकला नाही, मग या वादाचे निराकरण करण्यासाठी सर्व ऋषी महर्षी व्यासांकडे गेले. महर्षी व्यास यांना वेदांचे जनक मानले जाते.

महर्षी व्यासांनी ऋषींचे म्हणणे ऐकून त्यांना सांगितले की, कलियुग हे चार युगांपैकी सर्वोत्तम युग आहे, कारण जे पुण्य सत्ययुगात 10 वर्षे उपासना, जप, तपश्चर्या आणि व्रताने प्राप्त होते, तेच पुण्य केवळ एका वर्षात प्राप्त होते. त्रेतायुगात हे पुण्य उपासना, जप, तपश्चर्या आणि उपवासाने प्राप्त होते आणि द्वापर युगात तेच पुण्य केवळ एक महिन्याच्या नामजप आणि तपश्चर्येने प्राप्त होते, तर कलियुगात तेच पुण्य केवळ एका दिवसाच्या नामजप आणि तपश्चर्येने प्राप्त होते. ,म्हणूनच महर्षी व्यास म्हणतात की कलियुग हे चार युगांमध्ये श्रेष्ठ आहे. ज्यामध्ये फक्त एका दिवसाच्या भक्तीने 10 वर्षांचे पुण्य मिळवता येते. तेव्हापासून कलियुग हे सर्वश्रेष्ठ युग मानले जाते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?