AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kaliyug Story : चारही युगात कलियुग का मानले जाते श्रेष्ठ, अशी आहे पौराणिक कथा

महर्षी व्यासांनी ऋषींचे म्हणणे ऐकून त्यांना सांगितले की, कलियुग हे चार युगांपैकी सर्वोत्तम युग आहे, कारण जे पुण्य सत्ययुगात 10 वर्षे उपासना, जप, तपश्चर्या आणि व्रताने प्राप्त होते, तेच पुण्य केवळ एका वर्षात प्राप्त होते.

Kaliyug Story : चारही युगात कलियुग का मानले जाते श्रेष्ठ, अशी आहे पौराणिक कथा
कलियुगImage Credit source: Social Media
| Updated on: Feb 12, 2024 | 7:48 PM
Share

मुंबई : वेदानुसार हिंदू धर्मात चार युगे मानली जातात. पहिले सतयुग, दुसरे त्रेतायुग ज्यामध्ये भगवान विष्णूने रामाच्या रुपात अवतार घेतला, तिसरा द्वापारयुग ज्यामध्ये भगवान विष्णू कृष्णाच्या रुपात अवतरले आणि चौथे आणि शेवटचे युग हे कलियुग (Kaliyug) मानले जाते. जे सध्या सुरू असल्याचे मानले जात आहे. कलियुग हे चार युगांपैकी सर्वात लहान मानले जाते. मान्यतेनुसार, सर्वात जास्त अनीति, अन्याय, हिंसा आणि पापं कलियुगातच होतात. पण मग कलियुग हे चार युगांपैकी श्रेष्ठ का मानले गेले? यामागे एक रंजक कथा आहे, चला जाणून घेऊया.

कलियुगशी संबंधित कथा?

विष्णु पुराणानुसार, एकदा ऋषी आपापसात चर्चा करत होते की चार युगांपैकी सर्वोत्तम युग कोणते आहे. या विषयावर प्रत्येकाची वेगवेगळी मते होती, त्यामुळे ही चर्चा वादाचा विषय बनली आणि कोणताही तोडगा निघू शकला नाही, मग या वादाचे निराकरण करण्यासाठी सर्व ऋषी महर्षी व्यासांकडे गेले. महर्षी व्यास यांना वेदांचे जनक मानले जाते.

महर्षी व्यासांनी ऋषींचे म्हणणे ऐकून त्यांना सांगितले की, कलियुग हे चार युगांपैकी सर्वोत्तम युग आहे, कारण जे पुण्य सत्ययुगात 10 वर्षे उपासना, जप, तपश्चर्या आणि व्रताने प्राप्त होते, तेच पुण्य केवळ एका वर्षात प्राप्त होते. त्रेतायुगात हे पुण्य उपासना, जप, तपश्चर्या आणि उपवासाने प्राप्त होते आणि द्वापर युगात तेच पुण्य केवळ एक महिन्याच्या नामजप आणि तपश्चर्येने प्राप्त होते, तर कलियुगात तेच पुण्य केवळ एका दिवसाच्या नामजप आणि तपश्चर्येने प्राप्त होते. ,म्हणूनच महर्षी व्यास म्हणतात की कलियुग हे चार युगांमध्ये श्रेष्ठ आहे. ज्यामध्ये फक्त एका दिवसाच्या भक्तीने 10 वर्षांचे पुण्य मिळवता येते. तेव्हापासून कलियुग हे सर्वश्रेष्ठ युग मानले जाते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....