AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shree Ganesha | बुधवारी गणेशाची पूजा का करावी, जाणून घ्या…

बुधवारी गणेशाची पूर्ण विधीवत पूजा केली जाते. भगवान गणेश भक्तांवर प्रसन्न होतात (Lord Ganesha) आणि त्यांचे दु:ख हरतात आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतात.

Shree Ganesha | बुधवारी गणेशाची पूजा का करावी, जाणून घ्या...
Lord Ganesha
| Updated on: Apr 21, 2021 | 12:46 PM
Share

मुंबई : बुधवारी गणेशाची पूर्ण विधीवत पूजा केली जाते. भगवान गणेश भक्तांवर प्रसन्न होतात (Lord Ganesha) आणि त्यांचे दु:ख हरतात आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतात. हिंदू मान्यतेनुसार कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा करणे आवश्यक आहे. भगवान गणेश सर्व लोकांच्या दु:खाचा नाश करतात. मान्यता आहे की प्रथम पूजनीय गणेशाची श्रद्धापूर्वक पूजा केल्यास घरात सुख आणि समृद्धी नांदते. तसेच, घर संपत्तीने परिपूर्ण होते. त्यांच्याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही (Why Should Worship Lord Ganesha On Wednesday Know The Reasons).

मान्यता आहे की गणपतीचे आशीर्वाद अत्यंत लाभदायक असतात. गणपतीची उपासना केल्यास भाविकांना अनेक फायदे होतात. बुधवारी गणेशाची पूजा का करावी, याचे कारण काय हे जाणून घेऊ.

समृद्धी

प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धी मिळवायची असते. गणपतीची उपासना केल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येते आणि भक्त त्यांच्या क्षेत्रात यशस्वी होतात.

भाग्योदय

गणपतीची खऱ्या भक्तीभावाने उपासना केल्याने भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. गणपतीची उपासना केल्यास भाग्योदय होते आणि निरोगी आयुष्य प्राप्त होते.

बुद्धिमत्ता

हिंदू धर्मग्रंथांमध्ये असे सांगितले गेले आहे की भगवान गणेशाची उपासना केल्याने बुद्धी वाढते. ज्या भाविकांना बुद्धीमान व्हायचे आहे त्यांनी प्रत्येक बुधवारी गणेशाची पूजा-अर्चना करावी.

अडचणी होतात दूर

भगवान गणेश यांना विघ्नहर्ता म्हणतात, म्हणजेच ते आपल्या भक्तांच्या आयुष्यात येणारी सर्व संकटे दूर करतात. एखाद्याच्या आयुष्यात अडथळे येत असतील तर त्यांनी नक्कीच गणेशाची पूजा करावी. गणपतीची उपासना केल्यास भीतीवर विजय प्राप्त होतो.

सहनशक्ती वाढते

गणपतीची पूजा केल्याने एखादी व्यक्ती आपल्या आतल्या लपलेल्या शक्तीवर लक्ष केंद्रित करु शकतो, ज्यामुळे सहनशक्ती वाढते.

ज्ञान

ज्ञान वाढवण्यासाठीही गणेशाची पूजा केली जाते. गणपतीची उपासना केल्यामुळे ज्ञान मिळवणे सोपे होते.

आत्मा शुद्ध होते

जर एखाद्या व्यक्तीने गणरायाची श्रद्धापूर्वक उपासना केली तर त्याचा आत्मा शुद्ध होतो. भाविकांच्या जीवनातून सर्व नकारात्मक शक्ती दूर होतात, ज्याद्वारे त्यांचा आत्मा शुद्ध होतो.

Why Should Worship Lord Ganesha On Wednesday Know The Reasons

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Shree Ganesha | श्री गणेशाचं खरं मुख कुठे गेलं? पौराणिक कथा काय सांगते…

जन्म घेताच भगवान कार्तिकेयचं अपहरण झालं होतं, जाणून घ्या या पौराणिक कथेबाबत…

Vinayaka Chaturthi 2021 | विनायक चतुर्थी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी…

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.