AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Swastik on Main Door : घराच्या मुख्य दारावर स्वस्तिक का काढलं जातं ? काय असतं महत्व ?

Swastika on Main Door : हिंदू धर्मात स्वस्तिक अत्यंत शुभ मानले जाते. घराच्या मुख्य दारावर आणि उंबऱ्यावर स्वस्तिक रेखाटल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा येते. वास्तुशास्त्रानुसार यामुळे घरात सुख-समृद्धी येते आणि वास्तुदोष कमी होतात. कुंकवाने योग्य पद्धतीने काढलेले स्वस्तिक घरात शांतता आणि भरभराट आणते. हे लक्ष्मीला प्रसन्न करते.

Swastik on Main Door : घराच्या मुख्य दारावर स्वस्तिक का काढलं जातं ? काय असतं महत्व ?
स्वस्तिक का रेखाटावे ?
| Updated on: Sep 30, 2025 | 2:26 PM
Share

हिंदु धर्मात स्वस्तिकाचे खूप महत्व आहे. ते प्रत्येक शुभ प्रसंगी रेखाटले जाते. आपल्या घरातील वडीलधारी मंडळी घरच्या उंबऱ्यावर स्वस्तिक रेखाटायला सांगतात. मात्र त्या मागे काय कारण असतं, ते जाणून घेऊया. जर घरात निगेटीव्ह व्हाईब्स जाणवत असतील किंवा सतत काही समस्यांचा सामना करावा लागत असेल तर एखादा छोटासा बदल करून नकारात्मकता कमी करता येते असं मानलं जातं. त्यासाठी घराच्या मुख्य दारावर, उंबऱ्यावर संपूर्ण श्रद्धेने स्वस्तिक (Swastika) रेखाटलं जातं. मुख्य दारावर स्वस्तिक रेखाटणं शुभ मानलं जातं. वास्तुशास्त्रात घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक काढणे शुभ मानले आहे. मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक का, कसे, कुठे आणि केव्हा काढायचे ते जाणून घेऊया.

स्वस्तिक हे शुभं मानलं जातं, त्याने घरातली नकारात्मक उर्जा कमी होते. घराच्या उंबऱ्यावर , दारावर स्वस्तिक काढणं हे सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. स्वस्तिक रेखाटल्याने उत्कर्ष होतो, असं मानलं जातं. त्यामुळे घरात सुख -समृद्धी येण्याचा मार्ग मोकळा होता आणि वास्तु दोष दूर होतात असं मानलं जातं. स्वस्तिक रेखाटल्याने वातावरण शुभ आणि सुखद होतं. घराच्या दारावर, उंबऱ्यावर स्वस्तिक रेखाटल्याने लक्ष्मी प्रसन्न होते , तसेच त्यामुळे सकारात्मक उर्जा येते.

मुख्य दारावर स्वस्तिक कसे काढावे ?

मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढताना, वापरलेले साहित्य अत्यंत महत्त्वाचे असते. फक्त कुंकू वापरून ते काढायचे असते. कुंकवाने रेखाटलेले स्वस्तिक सुख आणि समृद्धीचे दार उघडतं असं मानले जाते.

• स्वस्तिकचा आकार देखील लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. मुख्य दरवाजा घराच्या सुरुवातीला चिन्हांकित करतो, म्हणून येथे मोठ्या स्वस्तिकचा वापर केला जातो. असे मानले जाते की नऊ बोटे लांब आणि रुंद स्वस्तिक वास्तुदोष कमी करण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी फायदेशीर आहे.

• जर तुम्हाला तुमच्या घरासमोर एखादे झाड किंवा खांब असेल तर ते नकारात्मक उर्जेचे प्रतीक असू शकते. त्याच्या दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी, दररोज मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढणे शुभ मानले जाते.

• जेव्हा जेव्हा तुम्ही मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढता तेव्हा तो भाग आधी स्वच्छ करा. धूळ असेल तर केर काढून पुसून घ्या.

• मुख्य दरवाजावरील स्वस्तिकाभोवती पिंपळ, आंबा किंवा अशोकाच्या पानांची माळ बांधणे देखील शुभ असते.

• मुख्य दरवाजाजवळ स्वस्तिक काढल्यानंतर, त्याच्याभोवती बूट आणि चप्पल साचू देऊ नका.

• मुख्य दरवाजाव्यतिरिक्त, उंबऱ्यावर देखील स्वस्तिक काढता येते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.