AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिला आणि पुरुष एकमेकांबद्दल ‘या’ गोष्टी खरंच लपवतात? हजारो वर्षांपूर्वी समोर आलेलं कारण

कळत असून सुद्धा महिला आणि पुरुष एकमेकांबद्दल का गुपित ठेवतात 'या' गोष्टी... तुम्हाला आहे का माहिती? हजारो वर्षांपूर्वी समोर आलेलं कारण...

महिला आणि पुरुष एकमेकांबद्दल 'या' गोष्टी खरंच लपवतात? हजारो वर्षांपूर्वी समोर आलेलं कारण
| Updated on: Aug 26, 2025 | 3:42 PM
Share

पूर्वी पेक्षा आजचा काळ फार बदलेला आहे. पूर्वी स्त्रीयांना शिक्षण आणि नोकरी करण्याचा अधिकार नव्हता… आता मात्र परिस्थिती फार वेगळी आहे… आज महिला कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत… पण तुम्ही कायम पाहिलं असेल की, शिकणाऱ्या किंवा नोकरी करणाऱ्या महिला कायम स्वतःचं वय लपवतात. महिलांच्या वयाचा अंदाज त्यांच्या चेहऱ्यावरुन येतो. तर पुरुष कायम त्यांची सॅलरी लपवतात… स्त्री आणि पुरुष असं का करतात? याचं कारण हजारो वर्षांपूर्वी आचार्य चाणाक्य यांनी सांगितलं आहे.

आचार्य चाणाक्य यांनी हे केवळ आधुनिक समाजाच्या मानसिकतेला कारणीभूत ठरवलं नाही, तर त्याचं कारण प्राचीन काळापासून प्रचलित असलेल्या वर्तनात आणि मानसिक धोरणांमध्ये आहे. चाणक्य नीति आपल्याला हे वर्तन समजून घेण्याची गुरुकिल्ली देते.

महिला का लपवतात त्यांचं वय

चाणाक्य नीतिनुसार, समाजात आदर आणि वैयक्तिक प्रतिष्ठा राखणं फार महत्वाचं आहे. महिलांनी त्यांचं वय लपवण्याचा उद्देश केवळ सामाजिक दबाव किंवा देखावा यांचा भाग नाही तर सुरक्षितता आणि संधी जपणं देखील आहे. महिला त्यांचं खरं वय लपवून समाजात त्यांचं मूल्य आणि स्थान टिकवून ठेवतात.पुरुष का लपवतात त्यांची सॅलरी?

पुरुष कायम त्यांची सॅलरी लपवतात कारण चाणक्य नीतीमध्ये असं सांगितलं आहे, की संपत्ती आणि शक्ती उघड केल्यानं संभाव्य धोके आणि स्पर्धा निर्माण होऊ शकते. पुरुषांची ही एक रणनीती आहे की त्यांनी त्यांची खरी आर्थिक परिस्थिती काही लोकांना सांगितली पाहिजे… ज्यामुळे त्यांना कोणतंही सामाजिक किंवा आर्थिक नुकसान सहन करावं लागू नये.

आजच्या काळात, वैयक्तिक सुरक्षितता, सामाजिक प्रतिष्ठा आणि आर्थिक रणनीता एकमेकांशी जोडले गेले आहे. महिलांसाठी ते स्व-संरक्षण आणि सामाजिक अपेक्षांचा भाग आहे, तर पुरुषांसाठी ते आर्थिक संतुलन आणि जोखीम व्यवस्थापनाचा भाग आहे.

महान अर्थशास्त्रज्ञ  आचार्य चाणाक्य (Chanakya Neeti Marathi) यांनी आपल्या नीतिने अनेकांना मार्गदर्शन केले आहे. त्यांनी लिहिलेले नीतिशास्त्र सामाजिक आणि राजकीय जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यांनी आखलेली धोरणे आजही लोकांसाठी यशाची सूत्रे ठरतात.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.