AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विवाह पंचमीला या वेळेत करा पूजा, भगवान रामाच्या आशीर्वादाने सर्व संकटे होतील दूर

मार्गशीर्ष शुक्ल पंचमीला विवाह पंचमी साजरी केली जाते. तर हा दिवस भगवान राम आणि सीता मातेला समर्पित आहे. या दिवशी योग्य विधींनी त्यांची पूजा केल्याने विशेष आशीर्वाद मिळतात आणि सर्व त्रास दूर होतात. तर आजच्या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊयात...

विवाह पंचमीला या वेळेत करा पूजा, भगवान रामाच्या आशीर्वादाने सर्व संकटे होतील दूर
Vivah Panchami
| Edited By: | Updated on: Nov 24, 2025 | 11:59 PM
Share

मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी विवाह पंचमीचा पवित्र सण साजरा केला जातो. हा दिवस सर्वात प्रतिष्ठित भगवान राम आणि सीता माता यांचा विवाह सोहळा झाला होता. या दिवशी योग्य विधींनी भगवान राम आणि सीता मातेची पूजा केल्याने भगवान राम यांच्याकडून विशेष आशीर्वाद मिळतो आणि भक्तांचे सर्व त्रास दूर होतात. तर या दिवसाशी संबंधित प्रमुख गोष्टी जाणून घेऊयात.

विवाह पंचमी 2025 शुभ मुहूर्त

राम मंदिरात ध्वजारोहण समारंभ अभिजित मुहूर्तावर सकाळी 11 वाजून 52 मिनिटांनी ते दुपारी 12 वाजून 35 मिनिट या दरम्यान होईल. हा 43 मिनिटांचा कालावधी खूप शुभ मानला जातो. या वेळेत विवाह पंचमी पूजा करणे देखील खूप शुभ मानले जाते. त्यामुळे या वेळेत भाविक भक्त पूजा आणि इतर शुभ कार्ये करू शकतात.

राम-सीता विवाह विधीसाठी शुभ मुहूर्त – दुपारी 04:49 ते 06:33 पर्यंत

विवाह पंचमी 2025 पूजा विधी

  • सकाळी लवकर उठून पाण्यात गंगाजल मिक्स करून स्नान करा.
  • तुमच्या घरातील देवघरात राम यांचे फोटो स्थापित करा.
  • हातात पाणी घ्या आणि पूजा करण्याचा संकल्प करा.
  • चंदन, पिवळी किंवा लाल फुले, तुळशीची पाने आणि मिठाई अर्पण करा.
  • भगवान रामाच्या ‘श्री राम जय राम जय जय राम’ किंवा ‘ओम नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा.
  • संध्याकाळी घराबाहेर आणि मंदिरात तुपाचे दिवे लावा.
  • शक्य असल्यास तुमच्या घरातील देवघरात भगवा ध्वज फडकावा आणि त्याची पूजा करा, कारण या दिवशी राम मंदिराचा ध्वजारोहण देखील होत आहे.
  • शेवटी आरती करा आणि पूजा दरम्यान झालेल्या सर्व चुकांसाठी क्षमा मागा.

विवाह पंचमीचे महत्त्व

हा सण धार्मिकता, प्रेम आणि आदर्श वैवाहिक जीवनाचे प्रतीक आहे. ज्यांना त्यांच्या लग्नात विलंब किंवा अडथळे येत आहेत त्यांनी या दिवशी भगवान राम आणि सीता मातेचा विवाह सोहळ्याचे अनुष्ठान करावे. भगवान राम यांच्या आशीर्वादाने तुमच्या लग्नातील सर्व अडथळे दूर होतील आणि तुम्हाला इच्छित जीवनसाथी मिळेल. शिवाय भगवान राम आणि सीता मातेच्या आशीर्वादाने, जीवनातील सर्व आव्हाने दूर होतात.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी.
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम.
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार.