AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chaturmas 2025: चातुर्मासात शुभ कार्य करायचे असेल तर ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

देवशयनी एकादशीपासून चातुर्मास सुरू होणार आहे, ज्यामध्ये काही शुभ कामे लोकांनी करू नये असे सांगितले जाते. जर काहींना काही कामे करायची असतील तर त्यांनी या गोष्टी लक्षात ठेऊनच कामे करावीत, अन्यथा आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल.

Chaturmas 2025: चातुर्मासात शुभ कार्य करायचे असेल तर 'या' गोष्टी ठेवा लक्षात
| Edited By: | Updated on: Jul 04, 2025 | 7:15 PM
Share

हिंदू धर्मात देवशयनी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो. ज्यामध्ये लग्न, गृहप्रवेश आणि शुभकार्य इत्यादी केली जात नाही. पण तुम्हाला या निर्बंधांना न जुमानता चातुर्मासात काही कामे करता येतात. चातुर्मासाचा काळ भगवान विष्णूंच्या निद्राकाळ म्हणून ओळखला जातो. तसेच या दिवसात अनेक शुभकार्ये निषिद्ध मानली जातात. मात्र तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे, या गोष्टी लक्षात ठेऊन तुम्ही या पवित्र दिवसांमध्ये काही कामे करू शकता.

पंचांगानुसार यावर्षी 2025 मध्ये चार महिन्यांचा चातुर्मास आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशीपासून म्हणजेच 6 जुलै पासून सुरू होईल. आणि तो कार्तिक महिन्यातील देवुथनी एकादशीला संपेल. यावेळी ही देवुथनी एकादशी 1 नोव्हेंबर रोजी आहे आणि चातुर्मास देखील याच दिवशी संपेल.

चातुर्मासात करावयाची कामे

– असे मानले जाते की चातुर्मास हा प्रामुख्याने आध्यात्मिक विकास आणि आत्मनिरीक्षणाचा काळ असतो. या दिवसात तुम्ही या गोष्टी करू शकता.

– चातुर्मासात भगवान विष्णू, शिव आणि इतर देवतांची पूजा करणे, मंत्र जप करणे, कथा ऐकणे आणि चरित्राचे पठण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. या दिवसांमध्ये यज्ञ आणि हवन देखील करता येते.

– चातुर्मास चालू असताना धार्मिक स्थळांना भेट देणे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे शुभ मानले जाते.

– तसेच गरजूंना दान करणे, अन्न पुरवणे, कपडे दान करणे किंवा कोणत्याही प्रकारे मदत करणे हे खूप पुण्यपूर्ण आहे.

– धार्मिक श्रद्धेनुसार चातुर्मासात तुळस, पिंपळ, आवळा यासारख्या पवित्र वनस्पतींची लागवड करणे शुभ असते. हा काळ आध्यात्मिक ग्रंथ, शास्त्रे आणि इतर माहितीपूर्ण पुस्तकांचा अभ्यास करण्यासाठी अतिशय योग्य आहे.

-चातुर्मासात लोकांनी मन शांत आणि एकाग्र करण्यासाठी ध्यान आणि योगाचा सराव केला पाहिजे.

ही कामे करण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

चातुर्मासात लग्न, गृहस्नान, मुंडन, नवीन व्यवसाय सुरू करणे इत्यादी शुभ कामे केली जात नाहीत. कारण भगवान विष्णू योग निद्रामध्ये असल्याने ते या कामांना आशीर्वाद देत नाहीत असे मानले जाते.

चातुर्मासात सात्विक अन्न सेवन करावे. लसूण, कांदा, मांस, मद्य आणि तामसिक अन्न टाळावे. काही लोकं दिवसातून फक्त एकदाच जेवण करतात. तर काही जण या दिवसांमध्ये पालेभाज्या, दही सेवन करणे टाळतात.

चातुर्मासात ब्रह्मचर्य पाळणे आणि तुमच्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे. राग, लोभ, आसक्ती यासारख्या नकारात्मक भावनांपासून दूर राहण्याचा हा एक प्रयत्न असतो.

या काळात, साधी जीवनशैली स्वीकारावी. अनावश्यक विलासिता आणि दिखावा टाळावा. उपासना आणि आध्यात्मिक कार्यात नियमितता राखावी.

चातुर्मासाच्या या दिवसांमध्ये गुरुदीक्षा किंवा कोणत्याही प्रकारची दीक्षा घेणे शुभ मानले जाते, कारण हा काळ आध्यात्मिक विकासाचा असतो.

चातुर्मासाचा उद्देश आत्मशुद्धी, धर्माची भक्ती आणि देवाशी संबंध अधिक दृढ करणे आहे. या नियमांचे पालन करून तुम्ही या पवित्र दिवसांचा पुरेपूर फायदा घेऊ शकता.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.