AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup Controversy 2025 : मोहसीन नक्वींना जबर धक्का, आशिया कप ट्रॉफीबद्दल ICCचा मोठा निर्णय

Asia Cup Controversy : आशिया कप ट्रॉफीच्या वादावर लवकरात लवकर सोडवण्यासाठी आणि ही ट्रॉफी भारताला सोपवण्यासाठी मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. आयसीसीने या बैठकीत हा मुद्दा गंभीरतेने घेतला असून आता यासंदर्भातक एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Asia Cup Controversy 2025 : मोहसीन नक्वींना जबर धक्का, आशिया कप ट्रॉफीबद्दल ICCचा मोठा निर्णय
आशिया कप ट्रॉफीच्या वदावर तोगा निघणार ?
| Updated on: Nov 08, 2025 | 8:40 AM
Share

ICC Asia Cup 2025 Trophy Controversy : सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस दुबईत आशिया कपचा अतिंम सामना झाला आणि पाकिस्तानी संघाला हरवून भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 वर नाव कोरलं. मात्र त्यानंतर झालेला प्रकार अजूनही सर्वांच्या लक्षात असून विजेत्या भारतीय संघाला ही ट्रॉफी अद्यापही मिळालेली नाही. भारतीय संघाने मोहसीन नक्वी यांच्या हातून ही ट्रॉफी घेण्यास नकार दिला, तर आपणच ट्रॉफी देणार या हट्टावर नक्वी अडून बसले. त्यानंतरही भारतीय संघ न आल्याने अखेर नक्वी हे तिथून निघाले पण धक्कादायक गोष्ट म्हणजे ते विजेती ट्रॉफीही त्यांच्यासोबतच घेऊन गेले.

तेव्हापासूनच आशिया कप ट्रॉफीचा हा विवाद सुरू झाला असून आता हे प्रकरण आयसीसीपर्यंत पोहोचलं आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत बीसीसीआयने हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर हा वाद सोडवण्यासाठी आता आयसीसीने मोठं पाऊल उचललं असून याप्रकरणी एका समितीची स्थापन करण्यात आली आहे. आयसीसीची ही बैठक सौहार्दपूर्ण पद्धतीने पार पडली. पाकिस्तान आणि भारत क्रिकेट जगतासाठी महत्त्वाचे आहेत आणि त्यांनी त्यांचे प्रश्न सौहार्दपूर्ण पद्धतीने सोडवावेत या मुद्यावर बैठकीतील सदस्यांनी भर दिला. या बैठकीत मोहसीन नक्वी देखील सहभागी झाले होते.

आयसीसीचा मोठा निर्णय

नक्वी यांनी भारताला ट्रॉफी न दिल्याबद्दल बीसीसीआयने बोर्डाला कळवले होते. आणि हे प्रकरण लवकरात लवकर सोडवण्यासाठी आणि ट्रॉफी भारताला सुपूर्द करण्यासाठी आयसीसीद्वारे मोठा निर्णय घेत एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

नक्वींकडून ट्रॉफी का स्वीकारली नाही ?

2025 च्या आशिया कपचा फायनल सामना हा 28 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबईत खेळला गेला. भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत केले. एसीसी अध्यक्ष म्हणून, मोहसिन नक्वी यांनी भारतीय संघाला आशियाई कप विजेतेपदाची ट्रॉफी प्रदान करण्यासाठी उपस्थिती लावली. मात्र भारतीय संघाच्या खेळाडूंनी नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर नक्वी यांनी ती ट्रॉफी स्टेडियमबाहेर घेऊन जाण्याचे आदेश दिले. त्यामुळे विजेता भारतीय संघ हा ट्रॉफी न घेताच परतला.

भारतीय संघाने नक्वी यांच्याकडून ही ट्रॉफी न स्वीकारण्यामागचे कारण म्हणजे ते एसीसीचे अध्यक्ष असले तरीही ते पाकिस्तानचे गृहमंत्री देखील आहेत. एप्रिल महिन्यात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध प्रचंड ताणले गेले आहेत. आशिया कपच्या तीन सामन्यांमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलनही केले नाही. त्याचाच भाग म्हणून जिंकल्यावरही भारतीय संघाने नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला.

यापूर्वी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नक्वी यांना ईमेलद्वारे आशिया कप विजेतेपद भारतीय संघाला परत करण्याची मागणी केली होती आणि जर प्रतिसाद मिळाला नाही तर हा विषय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत (ICC) उपस्थित केला जाईल असे म्हटले होते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...