AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Australia vs India, 1st Test | कसोटी इतिहासात टीम इंडियाच्या नावावर लाजीरवाणा विक्रम

ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा 8 विकेट्सने एकतर्फी पराभव केला.

Australia vs India, 1st Test | कसोटी इतिहासात टीम इंडियाच्या नावावर लाजीरवाणा विक्रम
| Updated on: Dec 19, 2020 | 4:20 PM
Share

अ‌ॅडिलेड : ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटी सामन्यात (Australia vs India 1st Test) टीम इंडियावर 8 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 90 धावांचे माफक आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान ऑस्ट्रेलियाने 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. टीम इंडियाने दुसऱ्या डावात अवघ्या 36 धावाच केल्या. या दुसऱ्या डावात टीम इंडियाच्या एकाही खेळाडूला दुहेरी आकडा गाठता आला नाही. त्यामुळे टीम इंडियाच्या नावावर लाजीरवाणा विक्रम झाला आहे. Australia vs India 1st Test No Indian player has reached double figures

नक्की काय झालं?

दुसऱ्या डावात भारतीय संघातील 3 खेळाडू शून्यावर बाद झाले. अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि आर आश्विन या तिकडीला भोपळाही फोडता आला नाही. तर उर्वरित 7 खेळाडूंना दुहेरी आकडा गाठता आला नाही. भारताकडून मयाकं अग्रवालने सर्वाधिक 9 धावा केल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका डावात दुहेरी आकडा न करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. त्यामुळे टीम इंडियाने ही लाजीरवाणी कामगिरी केली आहे. तसेच टीम इंडियाने कसोटी क्रिकेटमध्ये 65 वर्षानंतर निच्चांकी धावसंख्या नोंदवली.

1955 नंतर कसोटीतील सर्वात निच्चांकी धावसंख्या

टीम इंडियाने दुसऱ्या डावात 36 धावांवर डाव घोषित केला. यासह टीम इंडियाने कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल 65 वर्षानंतर निच्चांकी धावसंख्या केली. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात निच्चांकी धावसंख्येचा लाजीरवाणा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर आहे. न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यात 1955 मध्ये कसोटी सामना खेळण्यात आला. या सामन्यात न्यूझीलंडने एका डावात 26 धावा केल्या होत्या.

दुसरा सामना 26 डिसेंबरपासून

दरम्यान बॉर्डर-गावसकर मालिकेतील दुसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून खेळण्यात येणार आहे. हा सामना बॉक्सिंग डे क्रिकेट सामना असणार आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्याच सामन्यात विजय मिळवून आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल.

संबंधित बातम्या :

Australia vs India, 1st Test | टीम इंडिया 36 धावात गारद कशी होऊ शकते? लाजिरवाण्या पराभवाची 5 कारणे

Australia vs India 1st Test | टीम इंडियाच्या पराभवाचे टॉप 3 व्हिलन

Australia vs India 1st Test No Indian player has reached double figures

Follow Us
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.