AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्ल्डकप पराभवानंतर कोहलीचे पंख छाटण्याची तयारी, रोहित शर्मा नवा कर्णधार?

विश्वचषक 2019 मध्ये सेमीफायनलमध्येच गाशा गुंडाळावा लागलेल्या टीम इंडियामध्ये आता मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहेत. सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल म्हणजे टीम इंडियाच्या कर्णधारपदाची विभागणी होण्याची चिन्हं आहेत.

वर्ल्डकप पराभवानंतर कोहलीचे पंख छाटण्याची तयारी, रोहित शर्मा नवा कर्णधार?
| Updated on: Jul 15, 2019 | 5:40 PM
Share

मुंबई : विश्वचषक 2019 मध्ये सेमीफायनलमध्येच गाशा गुंडाळावा लागलेल्या टीम इंडियामध्ये आता मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहेत. सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल म्हणजे टीम इंडियाच्या कर्णधारपदाची विभागणी होण्याची चिन्हं आहेत. त्यानुसार विराट कोहलीच्या कर्णधारपदावर गदा येऊ शकते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार बीसीसीआय आता दोन कर्णधार करण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार रोहित शर्माकडे वन डे आणि टी 20 चं कर्णधारपद सोपवलं जाऊ शकतं. तर विराट कोहलीकडे केवळ कसोटी संघाचं कर्णधारपद ठेवलं जाऊ शकतं. आयएएनएस वृत्तसंस्थेला बीसीसीआयमधील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी बोर्ड त्याबाबत विचार करणार आहे.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या मते, “रोहित शर्माकडे वन डे संघाचं कर्णधारपद सोपवण्याची योग्य वेळ आहे. पुढील विश्वचषकाच्या तयारीसाठी योजना बनवायला सुरुवात करायला हवी. त्यासाठी सध्याचे पर्याय नव्या पद्धतीने विचारात घ्यायला हवे. त्यानुसार रोहित शर्मा कर्णधारपदासाठी योग्य पर्याय आहे”

कोहली-रोहितमध्ये मतभेद?

दरम्यान विश्वचषकातील पराभवानंतर कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मामध्ये मतभेद असल्याचा अफवाही पसरल्या. त्यामुळे आता प्रशासक समितीसोबत (COA) प्रशिक्षक रवी शास्त्री, विराट कोहली आणि निवड समितीचे अध्यक्ष एम एस के प्रसाद यांची बैठक होणार आहे. या बैठकीत हे सर्व मुद्दे चर्चिले जातील.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या मते, “तुम्हाला माहिती आहे की विनोद राय (COA प्रमुख) यांनी आधीच सांगितलं आहे की एक बैठक होईल, त्यामध्ये टीमच्या कामगिरीची समीक्षा होईल”.

संबंधित बातम्या 

आयसीसीच्या विश्वचषक संघात विराट कोहलीलाही स्थान नाही, फक्त दोन भारतीय नावं   

विश्वचषकातील महत्त्वाच्या सामन्यात विराट कोहली कायम फ्लॉप 

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.