
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा सुरू होण्यापू्र्वी टीम इंडियाची बाजू एकदम भक्कम दिसत होती. पण त्याला नजर लागली असं म्हणावं लागेल. कारण एकापाठोपाठ एक दिग्गज क्रिकेटपटू दुखापतग्रस्त किंवा आजारी पडले. त्यामुळे टीम इंडियाच्या चाहत्यांचं टेन्शन सुरुवातीलाच वाढलं आहे. असं असताना नामिबिया विरूद्धच्या सामन्यात अभिषेक शर्मा प्लेइंग 11 मध्ये नसल्याची घोषणा कर्णधार सूर्यकुमार यादवने केली. त्याच्या जागी संघात संजू सॅमसनला संधी दिल्याचं त्याने सांगितलं. येथपर्यंत सर्व काही ठीक होतं. पण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्मा खेळेल की नाही? याबाबत साशंकता आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे. कारण हा सामना स्पर्धेच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. संघाला चांगली सुरूवात करून देणारा आक्रमक फलंदाज असावा असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. पण या सामन्यात आजारपणामुळे खेळणं कठीण दिसत आहे. सूर्यकुमार यादवने तसे संकेत दिले आहेत. एक दोन सामने बेंचवर बसण्याची शक्यता त्याने वर्तवली.
रवि शास्त्रीने नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर सूर्यकुमार यादवला प्लेइंग 11 बाबत विचारलं. तेव्हा सूर्यकुमार यादव म्हणाला की, अभिषेक शर्माची तब्येत अजून तरी ठीक नाही. तो एक दोन सामने मिस करू शकतो. जर सूर्यकुमार यादवने खरं सांगितलं असेल. तर अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याला मुकू शकतो. कारण भारताचा पुढचा सामना हा पाकिस्तानशी होणार आहे. हा हायव्होल्टेज सामना श्रीलंकेच्या कोलंबोत होणार आहे. अभिषेक शर्माची तब्येत दिल्लीत येताच बिघडली होती. त्यामुळे त्याला रूग्णालयात दाखल केलं होतं. गंगाराम रुग्णालयात एक दिवस उपचार घेतल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला.
अभिषेक शर्मा खरं तर अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात आजारी पडला होता. त्याच्या पोटात दुखत होतं. त्यामुळे फलंदाजीनंतर एक दोन षटकं क्षेत्ररक्षण केलं आणि तंबूत पतरला. त्यानंतर दिल्ली पोहोचताच त्याची तब्येत आणखी बिघडली. त्याच्या पोटात इन्फेक्शन झाल्याचं कळलं. इतकंच काय तर डिहायड्रेशनही झालं होतं. त्यामुळे तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. त्याचं वजनही कमी झालं. त्याला थकवा जाणवत असल्याने अजून काही दिवस आरामाची गरज आहे. त्यामुळे एक दोन सामन्यांना मुकू शकतो.