AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीलंकेला पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत क्लिन स्वीप दिल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली…

वनडे वर्ल्डकप जेतेपदानंतर वुमन्स टीम इंडियाला पहिली टी20 मालिका खेळली. या मालिकेत भारताने श्रीलंकेला 5-0 ने मात दिली. या विजयानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

श्रीलंकेला पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत क्लिन स्वीप दिल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली...
श्रीलंकेला पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत क्लिन स्वीप दिल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली...Image Credit source: टीव्ही 9 हिंदीवरून
| Updated on: Dec 30, 2025 | 10:52 PM
Share

भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका पार पडली. भारताने पाचही सामने जिंकून श्रीलंकेला व्हाईटवॉश दिला आहे. भारताने पाचव्या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमवल्याने प्रथम फलंदाजी करावी लागली. भारताने 20 षटकात 7 गडी गमवून 175 धावा केल्या आणि विजयासाठी 176 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 20 षटकात 7 गडी गमवून 160 धावांपर्यंत मजल मारू शकला. भारताने हा सामना 15 धावांनी जिंकला. या मालिकेतील जबरदस्त कामगिरीसाठी शफाली वर्माचा गौरव करण्यात आला. तर सामनावीराचा पुरस्कार हरमनप्रीत कौरला मिळाला. श्रीलंका महिला संघाने यापूर्वी फक्त चार पाच सामन्यांच्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळल्या आहेत. ही पहिलीच वेळ आहे की, 5-0 च्या फरकाने पराभव पत्करावा लागला. तर भारताच्या महिला संघाचा टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसरा 5-0 मालिका विजय आहे. यापूर्वी त्यांनी 2019 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आणि 2024 मध्ये बांगलादेशविरुद्ध हा पराक्रम केला होता.

भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली की “2025 आमच्यासाठी खूप छान ठरले. आम्ही केलेल्या सर्व कठोर परिश्रमांचे श्रेय या वर्षी आम्हाला मिळाले आहे. हे या सवयींची पुनरावृत्ती करण्याबद्दल आहे. आम्ही सर्वांनी एकत्र खूप टी20 क्रिकेट खेळलो आहोत. ते आम्ही ते करू शकतो यावर विश्वास ठेवण्याबद्दल होते. सरांनी स्ट्राइक रेट आणि खेळ उंचावण्याबद्दल बोलले होते. सर्वजण आनंदी होते आणि आम्हाला ती उंची निश्चित करायची होती. पुढे जाऊन, आम्हाला या मालिकेकडे पाहायचे आहे आणि आम्ही पुढे काय करू शकतो याचा विचार करायचा आहे.”

श्रीलंकेचा कर्णधार चामारी अटापट्टू म्हणाली की “आम्ही आमचे सर्वोत्तम क्रिकेट खेळलो नाही. आम्हाला आमचे पॉवर-हिटिंग आणि फलंदाजी सुधारावी लागेल. काही तरुण खेळाडूंनी मध्यंतरी चांगले खेळले. पुढील काही महिन्यांत आमचे सर्वोत्तम क्रिकेट खेळण्यास उत्सुक आहोत.काही वरिष्ठ खेळाडू चांगले खेळत आहेत पण आम्ही वरिष्ठ म्हणून आमचे सर्वोत्तम क्रिकेट खेळत नाही आहोत. काही तरुणांनी त्यांच्या संधींचा फायदा घेतला आहे. टी20 विश्वचषकापूर्वी आपल्याला खूप विचार करावा लागेल.आम्ही सकारात्मक गोष्टींबद्दल बोलतो. आम्ही 67 महिन्यांपूर्वी चांगले क्रिकेट खेळलो. आमच्या प्रशिक्षकांनी आम्हाला मोकळेपणाने खेळण्यास सांगितले. काही फलंदाजांनी मध्यंतरी योग्य योजना राबवल्या. आम्ही भारताला लढा दिला पण दुर्दैवाने आम्ही हरलो.”

Follow Us
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी.
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का.
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक.
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,.
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि.
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्.
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?.
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार.
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ.