AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : सायंकाळच्या वेळी चुकूनही करू नका या गोष्टी, अन्यथा घरात येईल गरिबी

वास्तुशास्त्रामध्ये सायंकाळच्या वेळेला खूप महत्त्व आहे. त्यामुळे सायंकाळच्या वेळी काही गोष्टी करणं टाळाव्यात असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. अशा गोष्टींमुळे घरात गरिबी येते, अशी मान्यता आहे. चला तर मग जाणून घेऊयात सायंकाळच्या वेळी कोणत्या गोष्टी करु नयेत?

Vastu Shastra : सायंकाळच्या वेळी चुकूनही करू नका या गोष्टी, अन्यथा घरात येईल गरिबी
vastu shastraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 27, 2026 | 9:22 PM
Share

वास्तुशास्त्रामध्ये सायंकाळच्या वेळेला खूप महत्त्व आहे. हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार सायंकाळची वेळ ही घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते. सायंकाळच्या वेळी घरात लक्ष्मी मातेचं आगमन होणार असल्यानं या काळात काही विशिष्ट गोष्टी करू नये असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. सायंकाळच्या वेळी तुमच्या घराचा मुख्य दरवाजा आणि खिडक्या नेहमी उघड्या ठेवाव्यात, तसेच सायंकाळच्या वेळी देवघरासमोर दिवा लावल्यानंतर न चुकता एक दिवा घराच्या मुख्य दरवाजासमोर देखील लावावा, त्यामुळे घरात सुख समृद्धी येते, घरातील वातावरण आनंदी राहतं असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. मात्र काही लोक सायंकाळच्या वेळी अशा काही चुका करतात ज्यामुळे लक्ष्मी माता नाराज होते, लक्ष्मी मातेला धनाची देवता म्हटलं जातं. जर लक्ष्मी माता नाराज झाली तर घरात गरिबी येऊ शकते, त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत, ज्या सायंकाळच्या वेळी करणं टाळलं पाहिजे, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

भांडणं – सायंकाळच्या वेळी घरात लक्ष्मी येते असं मानलं जातं. त्यामुळे सायंकाळच्या वेळी घरात कधीही वादविवाद आणि भांडणं करू नये, अशी मान्यता आहे. जर सायंकाळच्या वेळी सतत भांडणं होत असतील तर यामुळे लक्ष्मी मातेची अवकृपा होते आणि घरात हळूहळू गरिबी येण्यास सुरुवात होते. त्यामुळे घरात कधीही भांडणं करू नये असं मानलं जातं.

तुळशीचे पान तोडू नका – रात्रीच्या वेळी कधीही तुळशीचे पानं तोडू नयेत, तुळस हे लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांचं अतिशय प्रिय झाड आहे. ज्या घरात तुळस असते त्या घरात कधीही पैशांची कमी भासत नाही. त्यामुळेच दररोज सकाळी तुळशीची पूजा करण्याचा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे. पंरतु एक गोष्टीची काळजी नेहमी घेतली गेली पाहिजे की, कधीही रात्रीच्या वेळी तुळशीची पानं तोडू नयेत.

कोणालाही पैसे उधार देऊ नका – सायंकाळच्या वेळी कोणालाही पैसे देऊ नये, यामुळे घरावर लक्ष्मी मातेची अवकृपा होते असं मानलं जातं. त्यामुळे सायंकाळच्या वेळी कोणताही पैशांचा व्यवहार करू नये.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
24 तासात योग्य तो निर्णय घेऊ- उदय सामंत
Uday Samant On Manoj Jarange Protest : 24 तासात योग्य तो निर्णय घेऊ- उदय सामंत
प्रसंगावधान राखत बस कर्मचाऱ्याने वाचवले वृद्ध प्रवाशाचे प्राण
केरळमध्ये बस कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे वृद्ध प्रवासी पडण्यापासून वाचले
महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये मेडलवरून वाद; पालकांकडून अधिकाऱ्यांना घेराव
ठाणे मॅरेथॉन: विजेत्यांना मेडल न मिळाल्याने पालकांचा गोंधळ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारांचाच -सुप्रिया सुळे
Supriya Sule : चुकीच्या पद्धतीने काढून घेतलेला राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांना परत करा: सुप्रिया सुळे
पैठणीसाठी आता बारकोड, वस्त्रोद्योग मंत्र्यांची माहिती
Paithani Saree : पैठणी साडीसाठी आता बारकोड: वस्त्रोद्योग मंत्र्यांनी दिली माहिती, फसवणूक थांबणार
संजय जाधवांच्या पक्ष प्रवेशाबबात पुन्हा शिंदेंचं सुचक वक्तव्य, म्हणाले
संजय जाधवांच्या पक्ष प्रवेशाबबात पुन्हा शिंदेंचं सुचक वक्तव्य, म्हणाले...
सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले...
सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले, फोडण्यासाठी पक्षच...
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले, बचावकार्य सुरु
एकनाथ शिंदेंनी मध्येच भाषण थांबवलं: परभणीत भरमंचावर असं काय घडलं?
एकनाथ शिंदेंनी मध्येच भाषण थांबवलं: परभणीत भरमंचावर असं काय घडलं?
मुंबईच्या महापौरांचे पती म्हणून भलत्याचाच फोटो, युट्यूब चॅनलवर गुन्हा
Ritu Tawade | मुंबईच्या महापौरांचे पती म्हणून भलत्याचाच फोटो, बदनामी केल्या प्रकरणी युट्यूब चॅनलवर गुन्हा