AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : सायंकाळच्या वेळी चुकूनही करू नका या गोष्टी, अन्यथा घरात येईल गरिबी

वास्तुशास्त्रामध्ये सायंकाळच्या वेळेला खूप महत्त्व आहे. त्यामुळे सायंकाळच्या वेळी काही गोष्टी करणं टाळाव्यात असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. अशा गोष्टींमुळे घरात गरिबी येते, अशी मान्यता आहे. चला तर मग जाणून घेऊयात सायंकाळच्या वेळी कोणत्या गोष्टी करु नयेत?

Vastu Shastra : सायंकाळच्या वेळी चुकूनही करू नका या गोष्टी, अन्यथा घरात येईल गरिबी
vastu shastraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 27, 2026 | 9:22 PM
Share

वास्तुशास्त्रामध्ये सायंकाळच्या वेळेला खूप महत्त्व आहे. हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार सायंकाळची वेळ ही घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते. सायंकाळच्या वेळी घरात लक्ष्मी मातेचं आगमन होणार असल्यानं या काळात काही विशिष्ट गोष्टी करू नये असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. सायंकाळच्या वेळी तुमच्या घराचा मुख्य दरवाजा आणि खिडक्या नेहमी उघड्या ठेवाव्यात, तसेच सायंकाळच्या वेळी देवघरासमोर दिवा लावल्यानंतर न चुकता एक दिवा घराच्या मुख्य दरवाजासमोर देखील लावावा, त्यामुळे घरात सुख समृद्धी येते, घरातील वातावरण आनंदी राहतं असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. मात्र काही लोक सायंकाळच्या वेळी अशा काही चुका करतात ज्यामुळे लक्ष्मी माता नाराज होते, लक्ष्मी मातेला धनाची देवता म्हटलं जातं. जर लक्ष्मी माता नाराज झाली तर घरात गरिबी येऊ शकते, त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत, ज्या सायंकाळच्या वेळी करणं टाळलं पाहिजे, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

भांडणं – सायंकाळच्या वेळी घरात लक्ष्मी येते असं मानलं जातं. त्यामुळे सायंकाळच्या वेळी घरात कधीही वादविवाद आणि भांडणं करू नये, अशी मान्यता आहे. जर सायंकाळच्या वेळी सतत भांडणं होत असतील तर यामुळे लक्ष्मी मातेची अवकृपा होते आणि घरात हळूहळू गरिबी येण्यास सुरुवात होते. त्यामुळे घरात कधीही भांडणं करू नये असं मानलं जातं.

तुळशीचे पान तोडू नका – रात्रीच्या वेळी कधीही तुळशीचे पानं तोडू नयेत, तुळस हे लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांचं अतिशय प्रिय झाड आहे. ज्या घरात तुळस असते त्या घरात कधीही पैशांची कमी भासत नाही. त्यामुळेच दररोज सकाळी तुळशीची पूजा करण्याचा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे. पंरतु एक गोष्टीची काळजी नेहमी घेतली गेली पाहिजे की, कधीही रात्रीच्या वेळी तुळशीची पानं तोडू नयेत.

कोणालाही पैसे उधार देऊ नका – सायंकाळच्या वेळी कोणालाही पैसे देऊ नये, यामुळे घरावर लक्ष्मी मातेची अवकृपा होते असं मानलं जातं. त्यामुळे सायंकाळच्या वेळी कोणताही पैशांचा व्यवहार करू नये.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागी मुंडेंना
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागा घेणार धनंजय मुंडे?
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील,
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग शिवसेनेचा कोणत्या पदावार दावा? शिंदेंनी दिलं थेट उत्तर
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60 हून अधिक...
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट!
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट! पत्रात मोठी विसंगती; 18 फेब्रुवारीशी काय कनेक्शन?
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली दौऱ्याआधीच एकनाथ शिंदेंनी...
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, काय घडणार?
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, पुढे काय घडणार?
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधानांना पत्र
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र
फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या
NCP | फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ