AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : सायंकाळच्या वेळी चुकूनही करू नका या गोष्टी, अन्यथा घरात येईल गरिबी

वास्तुशास्त्रामध्ये सायंकाळच्या वेळेला खूप महत्त्व आहे. त्यामुळे सायंकाळच्या वेळी काही गोष्टी करणं टाळाव्यात असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. अशा गोष्टींमुळे घरात गरिबी येते, अशी मान्यता आहे. चला तर मग जाणून घेऊयात सायंकाळच्या वेळी कोणत्या गोष्टी करु नयेत?

Vastu Shastra : सायंकाळच्या वेळी चुकूनही करू नका या गोष्टी, अन्यथा घरात येईल गरिबी
vastu shastraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 27, 2026 | 9:22 PM
Share

वास्तुशास्त्रामध्ये सायंकाळच्या वेळेला खूप महत्त्व आहे. हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार सायंकाळची वेळ ही घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते. सायंकाळच्या वेळी घरात लक्ष्मी मातेचं आगमन होणार असल्यानं या काळात काही विशिष्ट गोष्टी करू नये असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. सायंकाळच्या वेळी तुमच्या घराचा मुख्य दरवाजा आणि खिडक्या नेहमी उघड्या ठेवाव्यात, तसेच सायंकाळच्या वेळी देवघरासमोर दिवा लावल्यानंतर न चुकता एक दिवा घराच्या मुख्य दरवाजासमोर देखील लावावा, त्यामुळे घरात सुख समृद्धी येते, घरातील वातावरण आनंदी राहतं असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. मात्र काही लोक सायंकाळच्या वेळी अशा काही चुका करतात ज्यामुळे लक्ष्मी माता नाराज होते, लक्ष्मी मातेला धनाची देवता म्हटलं जातं. जर लक्ष्मी माता नाराज झाली तर घरात गरिबी येऊ शकते, त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत, ज्या सायंकाळच्या वेळी करणं टाळलं पाहिजे, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

भांडणं – सायंकाळच्या वेळी घरात लक्ष्मी येते असं मानलं जातं. त्यामुळे सायंकाळच्या वेळी घरात कधीही वादविवाद आणि भांडणं करू नये, अशी मान्यता आहे. जर सायंकाळच्या वेळी सतत भांडणं होत असतील तर यामुळे लक्ष्मी मातेची अवकृपा होते आणि घरात हळूहळू गरिबी येण्यास सुरुवात होते. त्यामुळे घरात कधीही भांडणं करू नये असं मानलं जातं.

तुळशीचे पान तोडू नका – रात्रीच्या वेळी कधीही तुळशीचे पानं तोडू नयेत, तुळस हे लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांचं अतिशय प्रिय झाड आहे. ज्या घरात तुळस असते त्या घरात कधीही पैशांची कमी भासत नाही. त्यामुळेच दररोज सकाळी तुळशीची पूजा करण्याचा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे. पंरतु एक गोष्टीची काळजी नेहमी घेतली गेली पाहिजे की, कधीही रात्रीच्या वेळी तुळशीची पानं तोडू नयेत.

कोणालाही पैसे उधार देऊ नका – सायंकाळच्या वेळी कोणालाही पैसे देऊ नये, यामुळे घरावर लक्ष्मी मातेची अवकृपा होते असं मानलं जातं. त्यामुळे सायंकाळच्या वेळी कोणताही पैशांचा व्यवहार करू नये.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
विश्व मराठी साहित्य संमेलन: मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती
विश्व मराठी साहित्य संमेलन: मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती.
निर्दोष मुक्तता अन् अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर!
निर्दोष मुक्तता अन् अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर!.
कांद्याच्या भावात घसरण; नाशिकमध्ये शिवसेना आक्रमक!
कांद्याच्या भावात घसरण; नाशिकमध्ये शिवसेना आक्रमक!.
जालन्यात अतिक्रमणावर पालिका प्रशासनाचा हतोडा
जालन्यात अतिक्रमणावर पालिका प्रशासनाचा हतोडा.
अखेर माकपचा लाँग मार्च यशस्वी! महत्त्वाच्या मागण्यांना सरकारची मंजुरी
अखेर माकपचा लाँग मार्च यशस्वी! महत्त्वाच्या मागण्यांना सरकारची मंजुरी.
जयंत पाटील यांच्याकडून कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी
जयंत पाटील यांच्याकडून कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी.
रोहित पवारांनी घेतली संजय शिरसाटांची भेट; एकनाथ शिंदेंनाही भेटणार
रोहित पवारांनी घेतली संजय शिरसाटांची भेट; एकनाथ शिंदेंनाही भेटणार.
लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यावर अन्याय होतोय! गणेश नाईकांचा आरोप
लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यावर अन्याय होतोय! गणेश नाईकांचा आरोप.
कुंभमेळ्यात बिबटे घुसले तर? विधानसभेत अनिल परब यांचा प्रश्न
कुंभमेळ्यात बिबटे घुसले तर? विधानसभेत अनिल परब यांचा प्रश्न.
अजित पवारांचा मृत्यू धुक्याने झाला की धोक्याने? राज ठाकरेंचा प्रश्न
अजित पवारांचा मृत्यू धुक्याने झाला की धोक्याने? राज ठाकरेंचा प्रश्न.