AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajinkya Rahane : ऋषभ पंतनंतर आता रहाणेही करणार कॅप्टन्सी, अजिंक्यच्या नेतृत्वात खेळणार इंडियाचे खेळाडू

Ajinkya Rahane Mumbai Captain : अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा मुंबईचं नेतृत्व करणार आहे. तसेच रोहित शर्मा आणि हार्दिक तामोरे हे रहाणेच्या नेतृत्वात खेळणार आहेत.

Ajinkya Rahane : ऋषभ पंतनंतर आता रहाणेही करणार कॅप्टन्सी, अजिंक्यच्या नेतृत्वात खेळणार इंडियाचे खेळाडू
ajinkya rahaneImage Credit source: BCCI/IPL
| Updated on: Jan 20, 2025 | 8:36 PM
Share

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू असलेला विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याची आयपीएलच्या 18 व्या मोसमाआधी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ऋषभ पंत लखनौ सुपर जायंट्सचं नेतृत्व करणार आहे. ऋषभ पंत केएल राहुल याची जागा घेणार आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियापासून बाहेर असलेला फलंदाज माजी कर्णधार अजिंक्य रहाणे याची पुन्हा एकदा मुंबईच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. अजिंक्य रहाणे गेल्या काही स्पर्धेसाठी संघात होता. मात्र श्रेयस अय्यर याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र आता रहाणे पुन्हा एकदा नेतृत्व करणार आहे.

एमसीएच्या निवड समितीने 20 जानेवारीला रणजी ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील एका सामन्यासाठी 17 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. त्यानुसार रहाणे मुंबईचं कर्णधारपद सांभाळणार आहे. मुंबईचा 23 जानेवारी रोजी जम्मू-काश्मीर विरुद्ध सामना होणार आहे. हा सामना मुंबईतील बीकेसी येथे होणार आहे.

मुंबईच्या संघात एकूण रहाणेसह एकूण 6 खेळाडूंचा समावेश आहे. टीम इंडियाचा विद्यमान कर्णधार रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, शिवम दुबे आणि शार्दूल ठाकुर हे 5 खेळाडू आता रहाणेच्या नेतृत्वात खेळणार आहेत.

रोहितचं रणजी क्रिकेटकमध्ये कमबॅक

दरम्यान रोहित शर्मा 10 वर्षांनंतर रणजी ट्रॉफीमध्ये खेळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. रोहित मैदानात उतरताच इतिहास रचणार आहे. रोहित शर्मा मैदानात उतरताच 17 वर्षांनंतर रणजी ट्रॉफीत खेळणारा दुसरा भारतीय कर्णधार ठरेल. याआधी सौरव गांगुली 17 वर्षांपूर्वी कर्णधार असताना रणजी क्रिकेट खेळला होता.

अशी आहे मुंबई टीम

जम्मू काश्मिर विरूद्धच्या सामन्यासाठी मुंबई टीम : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर,सिद्धेश लाड, शिवम दुबे, हार्दिक तामोरे (विकेटकीपर),आकाश आनंद (विकेटकीपर), तनुष कोटीयन, शम्स मुलानी, हिमांशु सिंग, शार्दूल ठाकुर, मोहित अवस्थी, सिलवेस्टर डीसोझा, रॉयस्टर डायस आणि कर्श कोठारी.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.