AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajinkya Rahane : ऋषभ पंतनंतर आता रहाणेही करणार कॅप्टन्सी, अजिंक्यच्या नेतृत्वात खेळणार इंडियाचे खेळाडू

Ajinkya Rahane Mumbai Captain : अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा मुंबईचं नेतृत्व करणार आहे. तसेच रोहित शर्मा आणि हार्दिक तामोरे हे रहाणेच्या नेतृत्वात खेळणार आहेत.

Ajinkya Rahane : ऋषभ पंतनंतर आता रहाणेही करणार कॅप्टन्सी, अजिंक्यच्या नेतृत्वात खेळणार इंडियाचे खेळाडू
ajinkya rahaneImage Credit source: BCCI/IPL
| Updated on: Jan 20, 2025 | 8:36 PM
Share

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू असलेला विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याची आयपीएलच्या 18 व्या मोसमाआधी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ऋषभ पंत लखनौ सुपर जायंट्सचं नेतृत्व करणार आहे. ऋषभ पंत केएल राहुल याची जागा घेणार आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियापासून बाहेर असलेला फलंदाज माजी कर्णधार अजिंक्य रहाणे याची पुन्हा एकदा मुंबईच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. अजिंक्य रहाणे गेल्या काही स्पर्धेसाठी संघात होता. मात्र श्रेयस अय्यर याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र आता रहाणे पुन्हा एकदा नेतृत्व करणार आहे.

एमसीएच्या निवड समितीने 20 जानेवारीला रणजी ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील एका सामन्यासाठी 17 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. त्यानुसार रहाणे मुंबईचं कर्णधारपद सांभाळणार आहे. मुंबईचा 23 जानेवारी रोजी जम्मू-काश्मीर विरुद्ध सामना होणार आहे. हा सामना मुंबईतील बीकेसी येथे होणार आहे.

मुंबईच्या संघात एकूण रहाणेसह एकूण 6 खेळाडूंचा समावेश आहे. टीम इंडियाचा विद्यमान कर्णधार रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, शिवम दुबे आणि शार्दूल ठाकुर हे 5 खेळाडू आता रहाणेच्या नेतृत्वात खेळणार आहेत.

रोहितचं रणजी क्रिकेटकमध्ये कमबॅक

दरम्यान रोहित शर्मा 10 वर्षांनंतर रणजी ट्रॉफीमध्ये खेळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. रोहित मैदानात उतरताच इतिहास रचणार आहे. रोहित शर्मा मैदानात उतरताच 17 वर्षांनंतर रणजी ट्रॉफीत खेळणारा दुसरा भारतीय कर्णधार ठरेल. याआधी सौरव गांगुली 17 वर्षांपूर्वी कर्णधार असताना रणजी क्रिकेट खेळला होता.

अशी आहे मुंबई टीम

जम्मू काश्मिर विरूद्धच्या सामन्यासाठी मुंबई टीम : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर,सिद्धेश लाड, शिवम दुबे, हार्दिक तामोरे (विकेटकीपर),आकाश आनंद (विकेटकीपर), तनुष कोटीयन, शम्स मुलानी, हिमांशु सिंग, शार्दूल ठाकुर, मोहित अवस्थी, सिलवेस्टर डीसोझा, रॉयस्टर डायस आणि कर्श कोठारी.

मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.