AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia cup 2022: रोहित, विराट, अनुष्का दुबईसाठी रवाना, पाकिस्तानचा संघ दाखल

Asia cup 2022: दुसऱ्याबाजूला पाकिस्तानी संघ दुबईत दाखल झाला आहे. सर्वांनाच उत्सुक्ता असलेला भारत विरुद्ध पाकिस्तान हा हायप्रोफाईल सामना 28 ऑगस्टला होणार आहे.

Asia cup 2022: रोहित, विराट, अनुष्का दुबईसाठी रवाना, पाकिस्तानचा संघ दाखल
team-india Image Credit source: insidesport
| Updated on: Aug 23, 2022 | 11:03 AM
Share

मुंबई: आशिया कप (Asia cup) टी 20 स्पर्धा खेळण्यासाठी भारतीय संघ आज सकाळी दुबईला रवाना झाला. रोहित शर्मा, (Rohit sharma) विराट कोहली (Virat kohli) त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि अन्य सदस्यांचे दुबईला रवाना होत असतानाचे फोटो कॅमेऱ्यात कैद झाले. दुसऱ्याबाजूला पाकिस्तानी संघ दुबईत दाखल झाला आहे. सर्वांनाच उत्सुक्ता असलेला भारत विरुद्ध पाकिस्तान हा हायप्रोफाईल सामना 28 ऑगस्टला होणार आहे.

पराभवाचा हिशोब चुकता करण्याची संधी

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी भारतीय संघ 3 दिवस दुबई मध्ये ट्रेनिंग करणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेआधी आशिया कपच्या माध्यमातून भारताला पाकिस्तान विरुद्ध खेळण्याची संधी मिळत आहे. मागच्यावर्षी दुबईत झालेल्या टी 20 वर्ल्ड कप मध्ये दोन्ही संघ आमने-सामने आले होते. त्यावेळी पाकिस्तानने भारतावर 10 विकेट राखून एकतर्फी विजय मिळवला होता. भारतीय संघ या पराभवाचा हिशोब चुकता करण्यासाठी उत्सुक्त आहे. पाकिस्तानी संघ नेदरलँडवरुन दुबई मध्ये दाखल झाला आहे.

80 ते 90 टक्के टीम तयार

भारतीय संघ दुबईला रवाना होत असतानाच, टीम इंडियासाठी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या दुबईला जाण्याबद्दल साशंकता आहे. या परिस्थितीत व्हीव्हीएस लक्ष्मण टीम इंडियाच्या हेड कोचची जबाबदारी संभाळू शकतात. आशिया कप मध्ये खेळणारा संघच ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप मध्ये दिसू शकतो. वर्ल्ड कपच्या दृष्टीने भारताचा 80 ते 90 टक्के संघ तयार आहे, असं विधान कॅप्टन रोहित शर्माने केलं होतं. जास्तीत जास्त आणखी 3 ते 4 बदल संघात संभवतात, असं रोहितने म्हटलं होतं.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल