AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NEP : नेपाळविरूद्धच्या सामन्यात पाऊस आला तर टीम आशियाकपमधून बाहेर? कसं असणार गणित!

टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेला सामना पावसामुळे रद्द झाला आहे. आता सुपर फोरमध्ये जागा मिळवण्यासाठी टीम इंडियासमोर मोठं आव्हान असणार आहे. जर नेपाळविरूद्धच्या सामन्यातही पाऊस आला आणि सामना रद्द झाला तर कसं असणार गणित? जाणून घ्या.

IND vs NEP : नेपाळविरूद्धच्या सामन्यात पाऊस आला तर टीम आशियाकपमधून बाहेर? कसं असणार गणित!
| Updated on: Sep 03, 2023 | 9:26 AM
Share

मुंंबई : आशिया कपमध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तानविरूद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. सर्व प्रेक्षकांचा हिरमोड झाला, ऊन-पावसाच्या खेळात टीम इंडियाच्या खेळाडूंची लय बिघडली. त्यानंतर ईशान किशन आणि हार्दिक पंड्या यांनी केलेल्या मजबूत भागीदारीच्या जोरावर टीमने 250 धावांचा टप्पा पार केला होता. मात्र पावसाने त्यानंतर जंगी पुनरागमन केलं सामना रद्द करायला भाग पाडलं. या सामन्याचा पाकिस्तान आणि टीम इंडियाला एक-एक गुण दिला गेला आहे. पण आता मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की जर नेपाळविरूद्धच्याही सामन्यात पाऊस आला तर आशिया कपमधून टीम इंडिया बाहेर तर पडणार नाही ना? कसं असणार पुढचं गणित जाणून घ्या.

4 सप्टेंबरला नेपाळविरूद्धचा सामना जिंकावा लागणार असून पहिल्यांदा टीम इंडिया आणि नेपाळ आमनेसामने येणार आहेत. जर या सामन्यातही पाऊस पडला दोन्ही संघांना एक-एक गुण दिला जाणार आहे. दोन गुणांसह टीम इंडियाचा सुपर 4 मध्ये समावेश होणार आहे.

नेपाळ संघाची अवस्था खराब झाली असून त्यांनी पहिला सामना गमावला आहे. त्यांचा रन रेट -4.760 असून 0 पॉइंट्स आहेत. टीम इंडियाचा आता एक गुण झाला आहे. पाकिस्तान संघाचे तीन गुण झाले आणि +4.760 रन रेट आहे. टीम इंडियाचा पाऊस नाही आला तर नेपाळ संघाचा पराभव करावा लागणार आहे.

भारत-पाक सामन्याचा धावता आढावा

दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पावसाने दोनवेळा सामना थांबावा लागलेला त्यानंतर टीम इंडियाची अवस्था बेकार झाली होती. 60 धावांच्या आतमध्ये 4 गडी बाद झाले होते. त्यानंतर पंड्या आणि किशन यांच्या 138 धावांच्या भागीदारीच्या जोरावर संघाने 266 धावा केल्या होत्या. मात्र पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. नेपाळविरूद्धच्या सामन्यामध्ये विजय मिळवावा लागणार आहे.

Follow Us
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट..
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट...
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?.
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका.
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया.
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.