AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NEP : नेपाळविरूद्धच्या सामन्यात पाऊस आला तर टीम आशियाकपमधून बाहेर? कसं असणार गणित!

टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेला सामना पावसामुळे रद्द झाला आहे. आता सुपर फोरमध्ये जागा मिळवण्यासाठी टीम इंडियासमोर मोठं आव्हान असणार आहे. जर नेपाळविरूद्धच्या सामन्यातही पाऊस आला आणि सामना रद्द झाला तर कसं असणार गणित? जाणून घ्या.

IND vs NEP : नेपाळविरूद्धच्या सामन्यात पाऊस आला तर टीम आशियाकपमधून बाहेर? कसं असणार गणित!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Sep 03, 2023 | 9:26 AM
Share

मुंंबई : आशिया कपमध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तानविरूद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. सर्व प्रेक्षकांचा हिरमोड झाला, ऊन-पावसाच्या खेळात टीम इंडियाच्या खेळाडूंची लय बिघडली. त्यानंतर ईशान किशन आणि हार्दिक पंड्या यांनी केलेल्या मजबूत भागीदारीच्या जोरावर टीमने 250 धावांचा टप्पा पार केला होता. मात्र पावसाने त्यानंतर जंगी पुनरागमन केलं सामना रद्द करायला भाग पाडलं. या सामन्याचा पाकिस्तान आणि टीम इंडियाला एक-एक गुण दिला गेला आहे. पण आता मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की जर नेपाळविरूद्धच्याही सामन्यात पाऊस आला तर आशिया कपमधून टीम इंडिया बाहेर तर पडणार नाही ना? कसं असणार पुढचं गणित जाणून घ्या.

4 सप्टेंबरला नेपाळविरूद्धचा सामना जिंकावा लागणार असून पहिल्यांदा टीम इंडिया आणि नेपाळ आमनेसामने येणार आहेत. जर या सामन्यातही पाऊस पडला दोन्ही संघांना एक-एक गुण दिला जाणार आहे. दोन गुणांसह टीम इंडियाचा सुपर 4 मध्ये समावेश होणार आहे.

नेपाळ संघाची अवस्था खराब झाली असून त्यांनी पहिला सामना गमावला आहे. त्यांचा रन रेट -4.760 असून 0 पॉइंट्स आहेत. टीम इंडियाचा आता एक गुण झाला आहे. पाकिस्तान संघाचे तीन गुण झाले आणि +4.760 रन रेट आहे. टीम इंडियाचा पाऊस नाही आला तर नेपाळ संघाचा पराभव करावा लागणार आहे.

भारत-पाक सामन्याचा धावता आढावा

दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पावसाने दोनवेळा सामना थांबावा लागलेला त्यानंतर टीम इंडियाची अवस्था बेकार झाली होती. 60 धावांच्या आतमध्ये 4 गडी बाद झाले होते. त्यानंतर पंड्या आणि किशन यांच्या 138 धावांच्या भागीदारीच्या जोरावर संघाने 266 धावा केल्या होत्या. मात्र पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. नेपाळविरूद्धच्या सामन्यामध्ये विजय मिळवावा लागणार आहे.

Follow Us
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न...
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न....
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा...
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा....
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक...
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक....
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून.
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात...
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात....
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात.
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ...
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ....
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला...
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध.....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध......
पोलीस भरती परीक्षेत मोठा घोटाळा? पोलीस शिपाई भरतीची रद्द झालेली लेखी..
पोलीस भरती परीक्षेत मोठा घोटाळा? पोलीस शिपाई भरतीची रद्द झालेली लेखी...