AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025 स्पर्धेत अर्शदीप सिंह खास कामगिरीसाठी सज्ज, नक्की काय?

Asia Cup 2025 : आशिया कप 2025 स्पर्धा टी 20 फॉर्मेटने होत आहे. त्यामुळे या स्पर्धेत अनेक रेकॉर्ड्स ब्रेक होऊ शकतात. तसेच भारताचा वेगवाना गोलंदाज अर्शदीप सिंह याला खास कारनामा करण्याची संधी आहे.

Asia Cup 2025 स्पर्धेत अर्शदीप सिंह खास कामगिरीसाठी सज्ज, नक्की काय?
Arshdeep Singh Team IndiaImage Credit source: PTI
| Updated on: Aug 25, 2025 | 4:41 PM
Share

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी आतापर्यंत एकूण 8 पैकी 5 संघ जाहीर करण्यात आले आहेत. यंदा आशिया कपचा 17 वा हंगाम आहे. या हंगामाला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेचं आयोजन हे यूएईमध्ये करण्यात आलं आहे. पाकिस्तान, भारत, हाँगकाँग, बांगलादेश आणि अफगाणिस्तानने संघ जाहीर केला आहे. तर यूएई, श्रीलंका आणि ओमानने संघ जाहीर केलेला नाही. भारतीय संघ या स्पर्धेत सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात खेळणार आहे. सूर्यासाठी टी 20i कॅप्टन म्हणून आतापर्यंतची ही सर्वात मोठी स्पर्धा असणार आहे. त्यामुळे सूर्याचा क्रिकेट चाहत्यांना कायम लक्षात राहिली अशी कामगिरी करुन दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे.

भारतीय संघ आशिया कप मोहिमेतील आपला पहिला सामना 10 सप्टेंबरला ओमान विरुद्ध खेळणार आहे. या स्पर्धेत भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याला अविस्मरणीय कामगिरी करण्याची संधी आहे. अर्शदीपने आतापर्यंत भारतासाठी टी 20i सामन्यांमध्ये निर्णायक भूमिका बजावली आहे. त्यामुळे अर्शदीप आशिया कप स्पर्धेत विशेष असं करुन दाखवणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

या स्पर्धेत अर्शदीप व्यतिरिक्त अफगाणिस्तानचा कर्णधार राशीद खान याला वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. राशीदला सर्वाधिक टी 20i विकेट्स घेण्याचा विश्व विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे. राशीदला त्यासाठी फक्त 4 विकेट्सची गरज आहे. राशीद हा वर्ल्ड रेकॉर्ड आशिया कपआधी होणाऱ्या टी 20 ट्राय सीरिजमध्येही करु शकतो. मात्र राशीद आशिया कप निमित्ताने वर्ल्ड रेकॉर्डसाठी अधिकची संधी आहे. टी 20 ट्राय सीरिजमध्ये पाकिस्तान, यूएई आणि अफगाणिस्तान सहभागी होणार आहेत. या मालिकेत प्रत्येक संघ एकूण 4 सामने खेळणार आहे.

राशीद खानच्या खात्यात किती विकेट?

टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक 164 विकेट्सचा वर्ल्ड रेकॉर्ड हा न्यूझीलंडच्या टीम साऊथी याच्या नावावर आहे. तर राशीदच्या खात्यात 161 विकेट्स आहेत. त्यामुळे राशीदला फक्त 4 विकेट्सची गरज आहे.

भुवनेश्वर कुमारचा विक्रम धोक्यात

राशिद खान याच्याकडे टी 20 आशिया कप स्पर्धेत भुवनेश्वर कुमार याच्या नावावर असलेल्या सर्वाधिक विकेट्सचा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. भुवीने टी 20 आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक 13 विकेट्स घेतल्या होत्या. तर राशीद या विक्रमपासून फक्त 3 विकेट्सने दूर आहे. राशीदने टी 20 आशिया कपमध्ये 11 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे राशिद भुवनेश्वरलाही पछाडणार, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

अर्शदीपचा विकेट्सच्या शतकावर डोळा

अर्शदीपला आशिया कप स्पर्धेत विकेट्सचं शतक पूर्ण करण्याची संधी आहे. अर्शदीपने आतापर्यंत टी 20i कारकीर्दीत 99 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे अर्शदीपला खास शतकासाठी 1 विकेटची गरज आहे.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.