AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bangladesh Cricket: बांगलादेशी खेळाडू आता भारतीय बॅटचा वापर करू शकणार नाहीत, कारण…

Bangladesh Cricketer's Bat : भारत आणि बांग्लादेश यांच्यातील संबंध गेल्या काही दिवसात ताणले गेले आहेत. त्याचा परिणाम क्रिकेटवर होताना दिसत आहे. आता बांगलादेशी खेळाडू भारतीय बॅट वापरू शकणार नाहीत. त्याचं कारण असं की...

Bangladesh Cricket: बांगलादेशी खेळाडू आता भारतीय बॅटचा वापर करू शकणार नाहीत, कारण...
Bangladesh Cricket: बांगलादेशी खेळाडू आता भारतीय बॅटचा वापर करू शकणार नाहीत, कारण..Image Credit source: Asian Cricket Council
| Updated on: Jan 07, 2026 | 3:30 PM
Share

भारत आणि बांग्लादेश क्रिकेट बोर्डातील संबंध आता कमालीचे ताणले गेले आहेत. बांगलादेशातील हिंसाचारानंतर भारतात त्याचे पडसाद उमटले आहेत. त्याचाच भाग म्हणून बीसीसीआयने बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्ताफिझुर रहमान याची आयपीएलमधून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे भेदरलेल्या बांगलादेशने कुरापती करण्यास सुरुवात केली आहे. भारतात टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा खेळण्यास नकार दिला आहे. यासाठी आयसीसीकडे प्रस्तावही पाठवला. बांगलादेशचे सर्व सामने श्रीलंकेत व्हावे अशी मागणी केली होती. पण आयसीसीने त्यांची मागणी फेटाळून लावली आहे. रिपोर्टनुसार, आयसीसीने बांगलादेशला स्पष्ट सांगितलं की सामने ठरलेल्या वेळापत्रकानुसारच खेळावे लागतील. म्हणजेच बांगलादेशला टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचे सर्व सामने भारतातच खेळावे लागतील. बांगलादेशचे सामने मुंबई आणि कोलकात्यात होणार आहेत. असं असताना बांगलादेशी फलंदाज यापुढे भारतीय बॅट उत्पादक कंपनी एसजीने बनवलेले बॅट वापरू शकणार नाहीत.

रिपोर्टनुसार, एसजीने सध्याची स्थिती पाहता बांगलादेशी क्रिकेटपटूंसोबत असलेला करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशी बॅटवर पूर्वी प्रायोजक म्हणून एसजी कंपनीचे स्टिकर होते. आता हा करार रद्द केल्याने प्रायोजकत्वाचे फायदे मिळणार नाहीत. यात कस्टम-मेड बॅट्स आणि ब्रँडिंगमधून व्यावसायिक परतावा यांचा समावेश होता. बांगलादेशचा टी20 संघाचा कर्णधार लिट्टन दास देखील एसजी कंपनीची बॅट वापरतो. माहितीनुसार, एसजीने बांगलादेशी क्रिकेटपटूंसोबत असलेला किट स्पॉन्सरचा करार रद्द केला आहे. भारतीय कंपनीने बांगलादेशी खेळाडूंसोबत असलेला आपला करार पुढे वाढवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे बांगलादेशला आता नव्या कीट स्पॉन्सरचा शोध घ्यावा लागणार आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी बीसीसीआयने मुस्तफिझुर रहमानला बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बांग्लादेश क्रीडा मंत्रालयाच्या सूचनांनुसार, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आयसीसीला ईमेल पाठवून भारताने 2026च्या टी20 विश्वचषक सामन्यांसाठी ठिकाण बदलावे अशी मागणी केली. दरम्यान, बांगलादेशमध्ये आयपीएलचे प्रसारण बंदी घालण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला. बांगलादेशने सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या भारत बांग्लादेश स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. पण बीसीसीआयने हे वेळापत्रक धुडकावून लावलं आहे. त्यामुळे भारत बांग्लादेश ही मालिका होणार नाही. आता पुढे काय होतं? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

Follow Us
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी.
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का.
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक.
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,.
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि.
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्.
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?.
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार.
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ.