AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BCCI : रिटायर झालेल्या खेळाडूंना IPL खेळता नाही येणार? बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

बीसीसीआय नवा नियम आणून परदेशी लीग खेळणाऱ्या खेळाडूंना कुलिंग ऑफ पीरियडचा नियम लागू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

BCCI : रिटायर झालेल्या खेळाडूंना IPL खेळता नाही येणार? बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!
| Updated on: Jun 30, 2023 | 7:40 PM
Share

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेले खेळाडू वेगवेगळ्या लीगमध्ये खेळताना दिसतात. आतासुद्धा असे अनेक खेळाडू आहेत जे निवृत्ती घेतल्यावर लीगमध्ये खेळत आहेत. मात्र आता बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. (BCCI May Introduce Cooling Off Period For Retired IPL Stars) निवृत्त झालेले खेळाडू परदेशी लीगमध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे बीसीसीआय यावर ठोस असा निर्णय घेणार आहे. बीसीसीआय नवा नियम आणून परदेशी लीग खेळणाऱ्या खेळाडूंना कुलिंग ऑफ पीरियडचा नियम लागू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बीसीसीआयची 7 जुलैला सर्वोच्च परिषदेची बैठक होणार आहे. या बैठकीत निवृत्त खेळाडूंच्या नियमांचा मुद्दा उपस्थित होणार आहे. याशिवाय सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत प्रभावशाली खेळाडूंच्या नियमावरही चर्चा होणार आहे. आयपीएल आणि सय्यद मुश्ताक अलीमध्ये खेळाडूंसाठी नियम वेगळे आहेत.

आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेले भारतीय खेळाडू नुकतेच UAE च्या आंतरराष्ट्रीय लीग T20 मध्ये खेळताना दिसले. परदेशी लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंसाठी सध्या कोणतेही धोरण नाही. त्यामुळे बीसीसीआयला नवीन धोरण आणण्याच्या तयारीत आहे.

असा असू शकतो नवीन नियम?

बीसीसीआय नवीन कुलिंग ऑफ पीरियड नियम लागू करू शकतं. ज्यामध्ये निवृत्तीनंतर खेळाडू काही महिने किंवा वर्षांनीच परदेशी लीगमध्ये सहभागी होऊ शकतात. त्यासोबतच त्यांना बीसीसीआयची परवानगी घ्यावी लागू शकते. जर हा नियम मोडला खेळाडूंवर बीसीसीआय कारवाई करू शकतं. निवृत्तीनंतर खेळाडू अनेकदा प्रशिक्षक, गोलंदाजी-क्षेत्ररक्षण-फलंदाजी प्रशिक्षक अशा भूमिकांमध्ये ज्यांना पगार बीसीसीआय देतं. नियम मोडणाऱ्या खेळांडूना या पदावर घेतलं जावू शकत नाही.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.