AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहलगाम हल्ल्यानंतर BCCI घेणार पाकिस्तानचा बदला? घेतला मोठा निर्णय

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट दिसत आहे. भारत सरकारनंतर आता BCCI कडूनही कारवाईची मागणी होत होती.

पहलगाम हल्ल्यानंतर BCCI घेणार पाकिस्तानचा बदला? घेतला मोठा निर्णय
BCCIImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: May 03, 2025 | 12:36 PM
Share

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव खूपच वाढला आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू तर उघडपणे भारताविरोधात वक्तव्य करत आहेत. पण त्यांच्या या वक्तव्यांचा त्यांनाच तोटा सहन करावा लागू शकतो. भारत सरकारने आधीच अनेक कठोर पावले उचलली आहेत. आता पहलगाम हल्ल्याचा बदला BCCI घेऊ शकते. खरं तर, यावर्षी सप्टेंबरमध्ये टी20 स्वरूपात आशिया कप खेळला जाणार आहे आणि याचे यजमानपद भारताकडे आहे. 2026 च्या टी20 विश्वचषकापूर्वी या महत्त्वाच्या स्पर्धेतून पाकिस्तान क्रिकेट संघाला बाहेर काढले जाऊ शकते. हा दावा भारतीय दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी केला आहे.

पाकिस्तानवर BCCI करणार कारवाई

सुनील गावस्कर यांचे म्हणणे आहे की, पहलगाम हल्ल्यानंतर अनेक गोष्टी बदलल्या आहेत. अशा परिस्थितीत आता पाकिस्तानचा आशिया कपमध्ये सहभाग जवळपास अशक्य वाटतो. त्यांच्या मते, BCCI नेहमीच भारत सरकारच्या आदेशांचे पालन करते आणि आशिया कपच्या बाबतीतही असेच होऊ शकते.

Baba Vanga Prediction: भारताशी युद्ध झाल्यास पाकिस्तान उद्ध्वस्त होईल? बाबा वेंगाची भविष्यवाणी होतेय व्हायरल

गावस्कर म्हणाले, “BCCI ची भूमिका नेहमीच तीच राहिली आहे जी भारत सरकार त्यांना सांगते. त्यामुळे मला वाटत नाही की आशिया कपच्या बाबतीत काही बदल होईल. आशिया कप 2026चे यजमानपद भारत आणि श्रीलंका यांच्याकडे आहे. त्यामुळे मी आता पाकिस्तानला आशिया कपचा भाग होताना पाहू नाही.” मात्र, त्यांनी हेही सांगितले की, पुढील दोन महिन्यांत दोन्ही देशांमधील संबंध कसे राहतात, यावर बरेच काही अवलंबून आहे.

ACC बरखास्त होऊ शकते

सुनील गावस्कर यांच्या मते, पाकिस्तानला बाहेर काढण्यासाठी आशियाई क्रिकेट परिषद (ACC) बरखास्त केली जाऊ शकते. म्हणजेच ACC चे भवितव्यही धोक्यात आहे आणि जर परिस्थिती सुधारली नाही तर तिचे अस्तित्वच राहणार नाही. त्यांचे म्हणणे आहे की, आशिया कपच्या जागी फक्त 3 किंवा 4 देशांमधील एक स्पर्धा खेळली जाऊ शकते.

पाकिस्तानला बाहेर काढण्याबाबत ते म्हणाले, “मला माहित नाही हे कसे होईल. कदाचित ACC बरखास्त केली जाईल आणि तुम्ही फक्त तीन देशांचा दौरा करू शकता, ज्यामध्ये तीन देशांची स्पर्धा होऊ शकते. किंवा चार देशांची स्पर्धा होऊ शकते ज्यामध्ये हाँगकाँग किंवा यूएईला आमंत्रित केले जाऊ शकते. पण हे पुढील काही महिन्यांत काय घडते यावर अवलंबून आहे.”

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...