AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Vanga Prediction: भारताशी युद्ध झाल्यास पाकिस्तान उद्ध्वस्त होईल? बाबा वेंगाची भविष्यवाणी होतेय व्हायरल

बाबा वेंगाच्या डोळ्यांची दृष्टी फक्त १२ वर्षांच्या वयातच गेली होती. बाबा वेंगाने सोव्हिएत युनियनचे विघटन, अमेरिकेतील दहशतवादी संघटना अलकायदाच्या ९/११ हल्ल्यांसह अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या. या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत.

Baba Vanga Prediction: भारताशी युद्ध झाल्यास पाकिस्तान उद्ध्वस्त होईल? बाबा वेंगाची भविष्यवाणी होतेय व्हायरल
Baba Venga PredictionImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: May 01, 2025 | 2:42 PM
Share

जम्मू-काश्मीरमधील पहलगामनंतर भारताच्या तातडीच्या कारवाईमुळे पाकिस्तान घाबरला आहे. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्यप्रमुखांसोबतच्या बैठकीत म्हटले आहे की, दहशतवाद्यांविरुद्ध सैन्याला मोकळीक आहे. लक्ष्य आणि ठिकाणाचा निर्णय भारतीय सैन्य स्वतः घेईल. पंतप्रधान मोदी यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानला भीती वाटू लागली आहे की, भारताने यापूर्वी सर्जिकल स्ट्राइकसारखी जी कारवाई केली होती, तशीच कारवाई आता पुन्हा करेल का? पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी दावा केला की, भारत पुढील २४ ते ३६ तासांत लष्करी कारवाई करू शकतो.

भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर लोकांचा प्रश्न आहे की, बाबा वेंगा (Baba Vanga Predictions) यांनी २०२५ साठी केलेली भविष्यवाणी खरी ठरणार का? जगभरात बाबा वेंगा त्यांच्या भविष्यवाण्यांसाठी ओळखल्या जातात. बाबा वेंगाचा जन्म १९११ मध्ये बल्गेरियात झाला आणि १९९६ मध्ये वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. बाबा वेंगाच्या डोळ्यांची दृष्टी वयाच्या १२ व्या वर्षीच केली होती. त्यांनी सोव्हिएत युनियनचे विघटन, अमेरिकेतील अलकायदाच्या ९/११ हल्ल्यांसह अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या, ज्या पूर्णपणे खऱ्या ठरल्या आहेत.

वाचा: भारतासोबत युद्ध होणार असल्याचे कळताच पाकिस्तानी नागरिकांचा आनंद गगनात मावेना, कारण वाचून व्हाल थक्क

बाबा वेंगाने जगाबाबत अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत, परंतु त्यांनी भारत आणि पाकिस्तान युद्ध किंवा विशेषतः पाकिस्तानच्या नाशाबाबत कोणतीही स्पष्ट, प्रामाणिक किंवा थेट भविष्यवाणी केलेली नाही. सोशल मीडियावर भारत आणि पाकिस्तान युद्धाची बाबा वेंगाची भविष्यवाणी खूप व्हायरल होत आहे.

बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचे सत्य

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होणाऱ्या भविष्यवाणीत गंभीर परिणामांचा उल्लेख आहे. हे स्रोत कोणत्याही प्रामाणिक स्रोतावर किंवा बाबा वेंगाच्या मूळ वक्तव्यांवर आधारित नाहीत. तरीही, लोक बाबा वेंगाच्या २०२५ साठीच्या भविष्यवाणीला भारत-पाकिस्तान युद्धाशी जोडत आहेत. बाबा वेंगाने २०२५ साठीच्या भविष्यवाण्यांमध्ये युरोपमधील मोठा संघर्ष आणि मानवी सभ्यतेच्या अंताची सुरुवात यांचा उल्लेख केला आहे. यात भारत-पाकिस्तान युद्ध किंवा पाकिस्तानच्या नाशाचा कोणताही विशिष्ट उल्लेख नाही.

भारत आणि पाकिस्तान युद्धाची शक्यता

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संघर्षाची शक्यता वाढली आहे. या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे युद्धाचा धोका वाढला आहे. भारताची लष्करी ताकद आणि पाकिस्तानची आर्थिक स्थिती पाहता, पाकिस्तान उद्ध्वस्त किंवा तुकडे-तुकडे झाले तर आश्चर्य वाटणार नाही.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक