AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीसीसीआयचा एक आदेश आणि इशान किशन टीममधून आऊट, सामना सोडून थेट घरी

इशान किशन सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्याच्या या फॉर्मची दखल भारतीय निवड समितीने घेतली आणि त्याची संघात निवड केली. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी त्याने सर्वाधिक 517 धावा केल्या. तर विजय हजारे ट्रॉफीतही वादळी शतक ठोकलं. पण दुसऱ्या सामन्यात त्याला संघाबाहेर केलं आहे.

बीसीसीआयचा एक आदेश आणि इशान किशन टीममधून आऊट, सामना सोडून थेट घरी
बीसीसीआयचा एक आदेश आणि इशान किशन टीममधून आऊट, सामना सोडून थेट गेला घरीImage Credit source: PTI
| Updated on: Dec 26, 2025 | 5:25 PM
Share

इशान किशनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीची दखल निवड समितीला घ्यावी लागली. न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिका आणि टी20 वर्ल्डकपसाठी त्याची संघात निवड केली आहे. त्यानंतर इशान किशन विजय हजारे ट्रॉफीत उतरला होता. त्याने पहिल्याच सामन्यात शतकी खेळी करत क्रीडाप्रेमींचं मन जिंकलं होतं. त्याने 34 चेंडूत शतक ठोकलं. पण त्याला पुढच्या सामन्यात संघाने त्याला बाहेर केले. झारखंडचा कर्णधार इशान किशनला राजस्थानविरुद्धच्या सामन्यातून वगळण्यात आलं आहे. त्याच्या जागी आता संघाची धुरा कुमार कुशाग्रच्या खांद्यावर देण्यात आली आहे. इशान किशनने शतकी खेळी करूनही त्याला संघातून वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. इशान किशनला बीसीसीआयच्या सांगण्यावरून संघातून बाहेर केलं आहे. बीसीसीआयच्या आदेशानंतर इशान किशनला झारखंडच्या प्लेइंग 11 मधून वगळण्यात आलं.

विजय हजारे ट्रॉफीत राजस्थानविरुद्धच्या सामन्यात झारखंडचं नेतृत्व करणाऱ्या कुमार कुशाग्रने सांगितलं की, बीसीसीआयने इशान किशनला आराम करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे इशान किशन टीम सोडून घरी परतला आहे आणि 2 जानेवारीला संघासोबत असेल. इशान किशनला तातडीचा आराम दिला गेला आहे. कारण इशान किशनची निवड न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिका आणि टी20 वर्ल्डकप 2026 संघात झाली आहे. त्यामुळे या स्पर्धेदरम्यान दुखापत होऊ यासाठी बीसीसीआयने काळजीपोटी त्याला आराम दिला आहे. इतकंच काय तर टी20 वर्ल्डकपसाठी फ्रेश राहावा यासाठी हा निर्णय घेतला आहे.

इशान किशनच्या नेतृत्वात झारखंडने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत जेतेपद मिळवलं होतं. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक 517 धावा केलया होत्या. यात त्याने जवळपास 200च्या स्ट्राईक रेटने धावा काढल्या. यात दोन शतकं आणि 2 अर्धशतकांचा समावेश होता. इतकंच काय तर अंतिम सामन्यात त्याने शतक ठोकल्याने संघाचा विजय पक्का झाला. त्याने 39 चेंडूत 125 धावांची खेळी केली होती. यात 14 षटकार मारले होते. इशान किशनचा फॉर्म टीम इंडियासाठी खूपच महत्त्वाचा आहे. त्यामुळे बीसीसीआय ताकही फुंकून पित आहे. त्याचा फॉर्म टीम इंडियाल टी20 वर्ल्डकप स्पर्धेत महत्त्वाचा असणार आहे.

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.