AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20I World Cup 2024 | टी 20 वर्ल्ड कपआधी बीसीसीआयचा मोठा निर्णय

Bcci | भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय सचिव जय शाह नक्की काय म्हणाले? जाणून घ्या.

T20I World Cup 2024 | टी 20 वर्ल्ड कपआधी बीसीसीआयचा मोठा निर्णय
| Updated on: Feb 17, 2024 | 1:53 PM
Share

मुंबई | क्रिकेट चाहत्यांना पुढील काही महिन्यात थरार पाहायला मिळणार आहे. विविध संघ सध्या द्विपक्षीय मालिका खेळत आहेत. त्यानंतर आयपीएलच्या 17 व्या मोसमानिमित्ताने सर्व खेळाडू हे आयपीएलसाठी भारतात येतील. जवळपास 45-40 दिवस ही स्पर्धा चालेल. त्यानंतर पुन्हा एकदा क्रिकेटच्या महाकुंभाला सुरुवात होणार आहे. आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन हे यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये करण्यात आलं आहे. वर्ल्ड कप 1 ते 29 जून दरम्यान पार पडणार आहे. या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या काही महिन्यांआधीच बीसीसीआय अलर्ट मोडवर आली आहे.

आयपीएल स्पर्धेत अनकॅप्डसह अनेक कॅप्ड खेळाडू सहभागी होतात. खेळाडूंना आयपीएल दरम्यान दुखापती होतात. आता टीम इंडियाचे खेळाडू आयपीएलनंतर टी 20 वर्ल्ड कप खेळणार आहे. आयपीएलमध्ये या खेळाडूंना दुखापत होऊन ते वर्ल्ड कपमधून बाहेर होऊ नयेत, याची खबरदारी म्हणून बीसीसीआय सचिव जय शाह यांनी खबरदार घेतली आहे. तसेच आयपीएलमधील सर्व संघांना ताकीद दिली आहे.

जय शाह यांनी आयपीएलआधी खेळाडूंचा वर्कलोड पाहता फ्रँचायजींना अलर्ट केलं आहे. जय शाह यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत याबाबत म्हटलं. “आयपीएल फ्रँचायजींना वार्षिक करार प्राप्त खेळाडूंच्या वर्कलोड मॅनेजमेंट नियमावलींचं पालन करावं लागेल”, असं जय शाह यांनी म्हटलं.

“हा बीसीसीआयचा आदेश आहे. बीसीसीआय सर्वोच्च संस्था आहे. बीसीसीआयचा निर्णय फ्रँचायजींना बंधनकारक आहे. बीसीसीआय फ्रँचायजीपेक्षा सर्वोच्च आहे. तसेच वार्षिक करारातील खेळाडू टीममधून बाहेर असतील तर त्यांना रणजी ट्रॉफीत खेळावं लागेल”असंही जय शाह यांनी म्हटलं.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच जय शाह यांनी टी 20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा हाच नेतृत्व करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. तसेच हार्दिक पंड्या हा उपकर्णधार असणार आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या सामन्याआधी राजकोटमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जय शाह यांनी या कार्यक्रमात ही मोठी घोषणा केली. तसेच या कार्यक्रमात सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमला निरंजन शाह यांचं नावही देण्यात आलं.

Follow Us
महायुतीसमोरचं सर्वात मोठं संकट टळलं; गोकुळ गीते यांचं बंड अखेर थंडावलं
मोठी ब्रेकिंग! महायुतीसमोरचं सर्वात मोठं संकट टळलं; गोकुळ गीते यांचं बंड अखेर थंडावलं
घरं फोडा, पक्ष फोडा आणि सत्तेत या! भाजप सरकारवर सुळेंचा हल्लाबोल
Supriya Sule | घरं फोडा, पक्ष फोडा आणि सत्तेत या! भाजप सरकारवर सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
कुंभार समाजाला सरकारची मोठी भेट! बावनकुळेंची थेट महत्त्वाची घोषणा
Chandrashekhar Bawankule | कुंभार समाजाला सरकारची मोठी भेट! बावनकुळेंची थेट महत्त्वाची घोषणा; नेमका काय फायदा होणार?
मोठी बातमी! लोकसभेची सदस्यसंख्या 824 पर्यंत वाढवणार? सल्लागारांच्या
मोठी बातमी! लोकसभेची सदस्यसंख्या 824 पर्यंत वाढवणार? सल्लागारांच्या शिफारस पत्रात नेमकं काय?
अखेरचा पत्ता उघडणार! गोकुळ गितेसोबत उदय सामंत अन् गिरिश महाजनांच्या
अखेरचा पत्ता उघडणार! गोकुळ गितेसोबत उदय सामंत अन् गिरिश महाजनांच्या अंतिम चर्चेत नेमकं काय घडलं?
एकच खळबळ! मशिदीच्या भिंतीआड भयंकर कांड; 7 वर्षाच्या.... नेमकं काय घडलं
एकच खळबळ! मशिदीच्या भिंतीआड भयंकर कांड; 7 वर्षाच्या.... नेमकं काय घडलं?
तृणमूल काँग्रेसला धक्क्यावर धक्का; CIDची धाड, TMC खासदाराचा राजीनामा
तृणमूल काँग्रेसला धक्क्यावर धक्का; CIDची धाड, TMC खासदाराचा राजीनामा तर, आणखी नेते सोडणार पक्ष?
जळगावात महायुती विरुद्ध महायुती? रेश्मा काळेंचा बंडखोर पवित्रा कायम
Jalgaon | जळगावात महायुती विरुद्ध महायुती? रेश्मा काळेंचा बंडखोर पवित्रा कायम
मुंबई ते दिल्ली प्रवासाआधीच विमानात बिघाड होताच... प्रवासाबाबत सुनेत्र
मुंबई ते दिल्ली प्रवासाआधीच विमानात बिघाड होताच... प्रवासाबाबत सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
राज्य थरथरलं! अनेक वर्ष चालला काळा कारभार, अल्पवयीन मुलीवर दोघं...भाजप
राज्य थरथरलं! अनेक वर्ष चालला काळा कारभार, अल्पवयीन मुलीवर दोघं... भाजप नगरसेविकेच्या भावाचं हादरवणारं कांड