AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20I World Cup 2024 | टी 20 वर्ल्ड कपआधी बीसीसीआयचा मोठा निर्णय

Bcci | भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय सचिव जय शाह नक्की काय म्हणाले? जाणून घ्या.

T20I World Cup 2024 | टी 20 वर्ल्ड कपआधी बीसीसीआयचा मोठा निर्णय
| Updated on: Feb 17, 2024 | 1:53 PM
Share

मुंबई | क्रिकेट चाहत्यांना पुढील काही महिन्यात थरार पाहायला मिळणार आहे. विविध संघ सध्या द्विपक्षीय मालिका खेळत आहेत. त्यानंतर आयपीएलच्या 17 व्या मोसमानिमित्ताने सर्व खेळाडू हे आयपीएलसाठी भारतात येतील. जवळपास 45-40 दिवस ही स्पर्धा चालेल. त्यानंतर पुन्हा एकदा क्रिकेटच्या महाकुंभाला सुरुवात होणार आहे. आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन हे यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये करण्यात आलं आहे. वर्ल्ड कप 1 ते 29 जून दरम्यान पार पडणार आहे. या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या काही महिन्यांआधीच बीसीसीआय अलर्ट मोडवर आली आहे.

आयपीएल स्पर्धेत अनकॅप्डसह अनेक कॅप्ड खेळाडू सहभागी होतात. खेळाडूंना आयपीएल दरम्यान दुखापती होतात. आता टीम इंडियाचे खेळाडू आयपीएलनंतर टी 20 वर्ल्ड कप खेळणार आहे. आयपीएलमध्ये या खेळाडूंना दुखापत होऊन ते वर्ल्ड कपमधून बाहेर होऊ नयेत, याची खबरदारी म्हणून बीसीसीआय सचिव जय शाह यांनी खबरदार घेतली आहे. तसेच आयपीएलमधील सर्व संघांना ताकीद दिली आहे.

जय शाह यांनी आयपीएलआधी खेळाडूंचा वर्कलोड पाहता फ्रँचायजींना अलर्ट केलं आहे. जय शाह यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत याबाबत म्हटलं. “आयपीएल फ्रँचायजींना वार्षिक करार प्राप्त खेळाडूंच्या वर्कलोड मॅनेजमेंट नियमावलींचं पालन करावं लागेल”, असं जय शाह यांनी म्हटलं.

“हा बीसीसीआयचा आदेश आहे. बीसीसीआय सर्वोच्च संस्था आहे. बीसीसीआयचा निर्णय फ्रँचायजींना बंधनकारक आहे. बीसीसीआय फ्रँचायजीपेक्षा सर्वोच्च आहे. तसेच वार्षिक करारातील खेळाडू टीममधून बाहेर असतील तर त्यांना रणजी ट्रॉफीत खेळावं लागेल”असंही जय शाह यांनी म्हटलं.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच जय शाह यांनी टी 20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा हाच नेतृत्व करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. तसेच हार्दिक पंड्या हा उपकर्णधार असणार आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या सामन्याआधी राजकोटमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जय शाह यांनी या कार्यक्रमात ही मोठी घोषणा केली. तसेच या कार्यक्रमात सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमला निरंजन शाह यांचं नावही देण्यात आलं.

मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....