AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India: बीसीसीआय निवड समितीकडून 36 वर्षीय त्रिमुर्तीकडे दुर्लक्ष, निवृत्तीशिवाय पर्याय नाही!

India vs Bangaldesh Test Series 2024: बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. मात्र निवड समितीने 3 अनुभवी खेळाडूंना संधी दिली नाही. त्यामुळे या तिघांसमोर निवृत्तीशिवाय पर्याय नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Team India: बीसीसीआय निवड समितीकडून 36 वर्षीय त्रिमुर्तीकडे दुर्लक्ष, निवृत्तीशिवाय पर्याय नाही!
ishant virat team indiaImage Credit source: ishan sharma x account
| Updated on: Sep 10, 2024 | 12:22 AM
Share

श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आता बांगलादेश विरुद्ध मायदेशात बांगलादेश विरुद्ध क्रिकेट खेळायला तयार झाली आहे. टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध कसोटी आणि टी 20i मालिका खेळणार आहे. बांगलादेशच्या भारत दौऱ्याची सुरुवात ही 19 सप्टेंबरपासून होणार आहे. कसोटी मालिकेतील सलामीच्या सामन्यासाठी 8 सप्टेंबरला भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. विराट कोहलीचं अनेक महिन्यांनी कमबॅक झालं आहे. तर जसप्रीत बुमराह याच्याकडे बॉलिंगची जबाबदारी असणार आहे. तर यश दयालला पहिल्यांदाच संधी दिली गेली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला टीम इंडियाच्या अनुभवी त्रिकुटाकडे पुन्हा एकदा बीसीसीआय निवड समितीने दुर्लक्ष केलं आहे.

अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि इशांत शर्मा या तिघांबाबत आपण बोलतोय. या तिघांचं वय हे 36 वर्ष आहे. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे दोघे वर्षभरापासून टीम इंडियापासून बाहेर आहेत. तर इशांत शर्मा याला तर जवळपास 3 वर्षांपासून संधीच मिळालेली नाही. अजिंक्यने त्याचा अखेरचा कसोटी सामना हा विंडिज विरुद्ध जुलै 2023 मध्ये खेळलाय. पुजारा जून 2023 साली अखेरचा कसोटी सामना खेळला होता. तर इशांत शर्मा याला अखेरची संधी 2021 मध्ये मिळाली होती. इशांतने न्यूझीलंड विरुद्ध नोव्हेंबर 2021 मध्ये अखेरची टेस्ट मॅच खेळली होती. या तिघांकडे निवड समितीकडून होणाऱ्या सातत्यपूर्ण दुर्लक्षामुळे या तिघांकडे आता निवृत्तीशिवाय पर्याय नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

इशांत, पुजारा आणि रहाणे या तिघांना कसोटी क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. या तिघांनी अनुक्रमे 105, 103 आणि 85 असे सामने खेळले आहेत. अजिंक्य रहाणे याने टीम इंडियाचं नेतृत्वही केलंय. मात्र प्रतिभावान युवा खेळाडूंमुळे या अनुभवी त्रिुकटाला संधी मिळणं अवघड होऊन बसलंय. त्यामुळे आता या तिघांना पुढील काही मालिकांसाठी संधी मिळणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.