AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL Points Table: लखनौ-मुंबई सामन्यानंतर पॉईंट टेबलमध्ये मोठा बदल, जाणून घ्या कोणत्या संघाला किती आहेत गुण

सध्या गुणतालिकेत गुजरात अव्वल स्थानावर असून त्याचे 12 गुण आहेत. याशिवाय मुंबईच्या (Mumbai Indians) संघाचे खातेही अद्याप उघडलेले नाही आणि मुंबई इंडियन्स 0 गुणांसह 10 व्या क्रमांकावर आहे.

IPL Points Table: लखनौ-मुंबई सामन्यानंतर पॉईंट टेबलमध्ये मोठा बदल, जाणून घ्या कोणत्या संघाला किती आहेत गुण
लखनौ-मुंबई सामन्यानंतर पॉईंट टेबलमध्ये मोठा बदलImage Credit source: twitter
| Updated on: Apr 25, 2022 | 2:23 PM
Share

मुंबई – आयपीएलमधील प्रत्येक सामन्यानंतर पॉईंट टेबलची (IPL Points Table) स्थिती बदलते. आयपीएलचा (IPL 2022) हा मोसम रोमांचक टप्प्यावर पोहोचला असून सर्व संघ आता प्लेऑफसाठी पात्र ठरण्याचा प्रयत्न करत आहेत. सलग आठ सामने गमावून मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. अजूनही 9 संघांना प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे. सध्या गुणतालिकेत गुजरात अव्वल स्थानावर असून त्याचे 12 गुण आहेत. याशिवाय मुंबईच्या (Mumbai Indians) संघाचे खातेही अद्याप उघडलेले नाही आणि मुंबई इंडियन्स 0 गुणांसह 10 व्या क्रमांकावर आहे. कालच्या सामन्यानंतर पॉईंट टेबलमध्ये काय स्थिती आहे आपण पाहू या.

time table

जाणून घ्या कोणत्या संघाला किती आहेत गुण

  1. गुजरात टायटन्सचा संघ 7 पैकी 6 सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. हार्दिक पांड्याच्या संघाचे सर्वाधिक 12 गुण आहेत.
  2. सनरायझर्स हैदराबाद संघाने 7 सामन्यांपैकी 5 सामने जिंकले असून संघाचे 10 गुण आहेत. सध्या गुणतालिकेत हैदराबाद दुसऱ्या क्रमांकावर आहे.
  3. राजस्थान रॉयल्सनेही 7 पैकी 5 सामने जिंकून 10 गुण मिळवले असून संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
  4. मुंबईविरुद्ध शानदार विजय नोंदवल्यानंतर लखनौचा संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. लखनौने आतापर्यंत 8 पैकी 5 सामने जिंकले असून 10 गुण मिळवले आहेत.
  5. आरसीबी संघाने आतापर्यंत 8 पैकी 5 सामने जिंकले असून 10 गुणांसह संघ पाचव्या क्रमांकावर आहे.
  6. दिल्ली कॅपिटल्सची स्थिती चांगली नाही आणि संघाने 7 पैकी फक्त 3 सामने जिंकले असून 6 गुणांसह दिल्लीचा संघ सध्या 6 व्या क्रमांकावर आहे.
  7. कोलकाता नाईट रायडर्स कठीण स्थितीत पोहोचले असून त्यांनी आतापर्यंत 8 सामन्यांपैकी केवळ 3 सामने जिंकले आहेत. केकेआर 6 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे.
  8. पंजाब किंग्जचे 6 गुण आहेत आणि पंजाब गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहे. पंजाबने आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये केवळ 3 सामने जिंकता आले आहेत.
  9. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जची अवस्था तर आणखी वाईट आहे. चेन्नईने आतापर्यंत 7 पैकी केवळ 2 सामने जिंकले असून 4 गुणांसह संघ नवव्या क्रमांकावर आहे.
  10. या मोसमात मुंबई इंडियन्सने अद्याप आपले खाते उघडलेले नाही आणि संघाने सर्व आठ सामने गमावले आहेत. मुंबईचे सध्या 0 गुण आहेत आणि संघ तळाच्या म्हणजे दहाव्या क्रमांकावर आहे.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.