AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी हरमनप्रीत कौरने व्यक्त केली चिंता, आमच्याकडे एक सामना असून…

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत अखेर भारताने उपांत्य फेरी गाठली आहे. आता टीम इंडिया जेतेपदापासून दोन विजय दूर आहे. असं असताना एका सामन्याची संधी असल्याचं कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली आहे. असं का ते जाणून घ्या.

उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी हरमनप्रीत कौरने व्यक्त केली चिंता, आमच्याकडे एक सामना असून...
उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी हरमनप्रीत कौरने व्यक्त केली चिंता, आमच्याकडे एक सामना असून...Image Credit source: BCCI Women Twitter
| Updated on: Oct 24, 2025 | 4:16 PM
Share

न्यूझीलंडविरुद्धचा महत्त्वाचा सामना भारताने 53 धावांनी जिंकला आणि उपांत्य फेरीत जागा पक्की केली. पावसामुळे या सामन्यात व्यत्यय आला आणि भारताने 49 षटकं खेळत 3 गडी गमवून 340 धावा केल्या. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार टार्गेट निश्चित करण्यात आलं आहे. न्यूझीलंडसमोर विजयासाठी 44 षटकात 325 धावांचं आव्हान दिलं गेलं. न्यूझीलंडने 44 षटकात 8 गडी गमवून 271 धावा केल्या. भारताने हा सामना 53 धावांनी जिंकला असला तर न्यूझीलंडने कडवी झुंज दिली. न्यूझीलंडने आक्रमक खेळ दाखवत भारतीय गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. जर हा सामना 50 षटकांचा असता तर कदाचित न्यूझीलंडची रणनिती प्रभावी ठरली असती असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. कारण भारताची गोलंदाजी या स्पर्धेत काही प्रभावी ठरलेली नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्ध 331 धावा करूनही भारताने हा सामना 49 षटकातच गमावला होता. त्यामुळे भारताची सुमार गोलंदाजी पाहून कर्णधार हरमनप्रीत कौरची चिंता वाढली आहे.

कर्णधार हरमनप्रीत कौर सामन्यानंतर म्हणाली की, ‘मला वाटते की आम्ही फलंदाजी करताना खूप चांगले करत आहोत. पण गोलंदाजी ही अशी गोष्ट आहे जी मला वैयक्तिकरित्या वाटते की आम्हाला स्वतःला खरोखर मजबूत ठेवावे लागेल. आमच्याकडे आणखी एक सामना आहे जिथे आम्ही ती गोष्ट देखील पार करू शकतो. आशा आहे की, गोलंदाजी युनिट म्हणून देखील, आम्ही एकत्र येऊन एक चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करू.’ हरमनप्रीत कौरची चिंता योग्यच आहे. कारण फलंदाजांनी चांगली कामगिरी केली तर गोलंदाजांना त्या धावा रोखता येणं आवश्यक आहे. अन्यथा जेतेपदाचं स्वप्न पूर्ण करणं कठीण आहे.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील भारताचा शेवटचा सामना बांगलादेशशी होणार आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजीकडे लक्ष असणार आहे. गोलंदाजांना त्याच्या रणनितीत सुधारणा करण्याची ही शेवटची वेळ असणार आहे. कारण उपांत्य आणि अंतिम सामन्यात अशी चूक करणं परवडणारं नाही. उपांत्य फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. या दोन्ही संघांचा साखळी फेरीत शेवटचा सामना 25 ऑक्टोबरला होणार आहे. या सामन्यातील विजेत्या संघासोबत भारताची उपात्य फेरीत लढत होणार आहे. भारताचा उपांत्य फेरीचा सामना 29 ऑक्टोबरला होणार आहे.

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.