AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Women’s World Cup 2025: भारताची उपांत्य फेरीत धडक, पण अंतिम फेरीचं गणित जुळलं; कसं ते समजून घ्या

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव करत टीम इंडियाने उपांत्य फेरीत जागा पक्की केली आहे. पण भारतीय अंतिम फेरीत जागा मिळवणार असं समीकरण तयार झालं आहे. कसं काय ते समजून घ्या.

Women’s World Cup 2025: भारताची उपांत्य फेरीत धडक, पण अंतिम फेरीचं गणित जुळलं; कसं ते समजून घ्या
Women’s World Cup 2025: भारताची उपांत्य फेरीत धडक, पण अंतिम फेरीचं गणित जुळलं; कसं ते समजून घ्याImage Credit source: BCCI Women Twitter
| Updated on: Oct 24, 2025 | 3:28 PM
Share

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पराभवाची हॅटट्रीक केल्यानंतर भारताचं उपांत्य फेरीचं गणित किचकट झालं होतं. पण भारताने न्यूझीलंडचा पराभव केला आणि उपांत्य फेरीत जागा पक्की केली आहे. आता उपांत्य फेरीत कोणता संघ समोर येणार याची चर्चा रंगली आहे. असं असताना भारताला थेट अंतिम फेरीचं तिकीट मिळणार असंच दिसत आहे. तुम्हीही विचार करत असाल असं कसं होईल. आम्ही नाही तर वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेचा इतिहास पाहिला तर तुम्हाला ही बाब लक्षात येईल. आयसीसी स्पर्धेत तिसऱ्यांदा असं समीकरण जुळून आलं आहे. त्यामुळे टीम इंडियाची अंतिम फेरीत खेळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पण अंतिम फेरीत जाण्यासाठी उपांत्य फेरीत विजय मिळवणं भाग आहे. उपांत्य फेरी खेळल्याशिवाय टीम इंडिया अंतिम फेरी कशी काय गाठणार? आता उपांत्य फेरीचं तितकं टेन्शन नाही का?

क्रीडाविश्वातील एक योगायोग पाहता हे समीकरण जुळवलं जात आहे. वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारातने जेव्हा जेव्हा न्यूझीलंडला पराभूत केलं आहे, तेव्हा अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत या दोन्ही संघात 14 वेळा सामना झाला आहे. पण भारताने तीनवेळा न्यूझीलंडला पराभवाचं पाणी पाजलं आहे. या तिन्ही वेळेस टीम इंडियाने अंतिम फेरीत स्थान पक्कं केलं आहे. 2005 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताने न्यूझीलंडला 40 धावांनी पराभूत केलं होते. त्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती.

दुसऱ्यांदा 2017 मध्ये इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताने न्यूझीलंडला 186 धावांनी मात दिली होती. या स्पर्धेतही भारताने अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर 2025 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताने न्यूझीलंडला 53 धावांनी पराभूत केलं आहे. त्यामुळे मागचा इतिहास पाहता भारतीय संघ अंतिम फेरी गाठेल असंच क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. 2005 आणि 2017 मध्ये भारताला अंतिम फेरीत पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. आताचा वनडे वर्ल्डकप भारतात होत आहे. जर भारताने अंतिम फेरी गाठली तर जेतेपद मिळवेल अशी अपेक्षा आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...