AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित शर्मा शिव्या देतो आणि…! कर्णधार शुबमन गिलच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा कस लागणार आहे. असं असताना या मालिकेपूर्वी टीम इंडियाचे दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि विराट कोहलीबाबत कर्णधार शुबमन गिल याने मोठं वक्तव्य केलं आहे.

रोहित शर्मा शिव्या देतो आणि...! कर्णधार शुबमन गिलच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
शुबमन गिलImage Credit source: PTI
| Updated on: Jun 15, 2025 | 9:30 PM
Share

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून कसोटी मालिका जिंकण्याचं मोठं आव्हान आहे. कारण मागच्या 17 वर्षात टीम इंडियाला ही मालिका जिंकता आलेली नाही. राहुल द्रविडच्या नेतृत्वात 2007 मध्ये भारताने मालिका जिंकली होती. त्यानंतर विजयाची चव काही चाखता आली नाही. दुसरीकडे, या दौऱ्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची उणीव भासणार आहे. कारण या दोघांनी मागच्या महिन्यात कसोटीतून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे शुबमन गिलच्या नेतृत्वात खेळताना टीम इंडियाला अनुभवाची उणीव जाणवणार आहे. दुसरीकडे, शुबमन गिलने रोहित शर्मा आणि विराट कोहलीकडून मिळणाऱ्या शिकवणुकीबाबत मोठं विधान केलं आहे. शुबमन गिलने स्काय स्पोर्ट्सला मुलाखत दिली. त्यावेळी त्याने विराट कोहली आणि रोहित शर्माबाबत विधान केलं.

शुबमन गिल रोहित शर्माबाबत म्हणाला की, ‘असं वाटतं की रोहित भाई खूप आक्रमक नाही पण तो सर्वात जास्त आक्रमक आहे. त्याच्या कर्णधारपदाखाली संवाद खूप स्पष्ट असायचा. मालिकेपूर्वी, मालिका सुरु असताना आणि मालिका संपल्यानंतर काही खेळाडूंशी थेट चर्चा करायचा आणि सांगायचा.’ शुबमन गिलने रोहित शर्माबाबत सांगितलं की, ‘रोहित शर्माने ज्या पद्धतीचं वातावरण बनवलं होतं. अशा स्थितीत त्याने शिव्या जरी दिल्या तरी मनाला लागत नव्हत्या. ते त्यांचं व्यक्तित्व आहे. ती त्यांची स्पेशालिटी आहे आणि दृढ झाली आहे. त्याने भलेही एखादी गोष्ट कठोरपणे सांगितली तरी त्याच्या मनात काही नसतं. टीमच्या हिशेबाने तो सांगत असतो.’

शुबमन गिलने विराट कोहलीबाबतही आपलं मन मोकळं केलं. ‘जेव्हा मी विराट भाईच्या नेतृत्वाखाली खेळायचो, तेव्हा मला वाटते की त्याचे विचार आणि कसोटी सामन्यादरम्यानचे त्याचे विचार मला खूप आवडायचे. सामन्यादरम्यान, जर एखादी योजना यशस्वी झाली नाही, तर तो लगेच दुसरी योजना बनवतो आणि गोलंदाजाला काय करायचे आहे ते सांगतो.’, असं शुबमन गिलने पुढे सांगितलं. शुबमन गिलच्या नेतृत्वाचा कस पहिल्याच दौऱ्यात लागणार आहे.

Follow Us
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?