AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैभव सूर्यवंशीची एन्ट्री अन् या खेळाडूचा बळी? तिसऱ्या सामन्यासाठी कर्णधार अय्यरच्या मनात आहे तरी काय?

भारताने अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेत अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली आहे. तीन सामन्यांची टी20 मालिका पहिल्या दोन सामन्यातील विजयानंतर 2-0 ने खिशात घातली आहे. आता तिसरा सामना औपचारिक असणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल केला जाण्याची शक्यता वाढली आहे.

वैभव सूर्यवंशीची एन्ट्री अन् या खेळाडूचा बळी? तिसऱ्या सामन्यासाठी कर्णधार अय्यरच्या मनात आहे तरी काय?
वैभव सूर्यवंशीची एन्ट्री अन् या खेळाडूचा बळी? तिसऱ्या सामन्यासाठी कर्णधार अय्यरच्या मनात आहे तरी काय?Image Credit source: PTI
| Updated on: Sep 16, 2026 | 2:57 PM
Share

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. भारताने आधीच मालिकेत विजयी आघाडी घेतली असली, तरी या शेवटच्या सामन्यापूर्वी युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या प्लेइंग इलेव्हन मधील संभाव्य एन्ट्रीमुळे क्रिकेट वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. सामन्यापूर्वी बोलताना भारतीय कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, “तिसरा टी20 सामना हा आपल्या राखीव खेळाडूंची ताकद आजमावण्याची एक चांगली संधी आहे. जे खेळाडू सलग बाहेर बसले आहेत, त्यांना आगामी मोठ्या आव्हानांच्या दृष्टीने सामन्यांचा सराव मिळावा यासाठी आम्ही त्यांना अंतिम 11 मध्ये नक्कीच संधी देऊ इच्छितो.” अय्यरने आपल्या वक्तव्यात थेट वैभव सूर्यवंशीच्या नावाचा उल्लेख केला नसला, तरी त्याचा रोख वैभवकडेच होता हे स्पष्ट समजते.

युवा सनसनाटी वैभव सूर्यवंशीने नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वे दौऱ्यात आपल्या फलंदाजीने धुमाकूळ घातला होता. तिथे धडाकेबाज कामगिरी करत त्याने थेट ‘मालिकावीर’ पुरस्कारावर आपले नाव कोरले होते. वैभव या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 151 धावांसह मालिकेतील सर्वात यशस्वी आणि सर्वोच्च धावा करणारा फलंदाज ठरला. संपूर्ण मालिकेत त्याने तब्बल 196.10 च्या स्फोटक स्ट्राईक रेटने फलंदाजी केली, जो या मालिकेतील सर्वोत्तम स्ट्राईक रेट होता. मात्र, इतकी उत्कृष्ट कामगिरी करूनही अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या दोन्ही सामन्यांत त्याला बाकावर बसावे लागले होते. आता तिसऱ्या सामन्यात त्याला अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे.

वैभव षटकारांच्या विक्रमात भर घालणार

वैभवला तिसऱ्या सामन्यात संधी मिळाली, तर त्याला टी20 फॉरमॅटमधील आपल्या षटकारांची संख्या आणखी वाढवण्याची सुवर्णसंधी असेल. विशेष म्हणजे, यावर्षी टी20 सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत अवघ्या 22 सामन्यांच्या 22 डावांमध्ये तब्बल 86 गगनचुंबी षटकार ठोकण्याचा अद्भूत पराक्रम केला आहे.

अभिषेक की संजू सॅमसन? निवडकर्त्यांसमोर मोठा पेच

वैभव सूर्यवंशीला संघात समाविष्ट करायचे ठरल्यास संघ व्यवस्थापनासमोर “कोणाचा पत्ता कापायचा?” हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सलामीला दमदार फॉर्ममध्ये असलेल्या अभिषेक शर्माला विश्रांती द्यायची की मागच्या सामन्यात आक्रमक अर्धशतक ठोकणाऱ्या संजू सॅमसनला बाहेर बसवायचे, असा दुहेरी पेच कर्णधार श्रेयस अय्यर आणि प्रशिक्षकांसमोर असेल. जर संजूचा पत्ता कट झाला, तर सॅमसनच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला हा खूप मोठा धक्का मानला जाईल.

Follow Us
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक