AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : चॅम्पियन्स ट्रॉफीवरून पाकिस्तानी न्यूज चॅनेलवर जुंपली, हरभजन सिंगने तोंडावर काढली लाज

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे. मात्र या स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही हे जवळपास स्पष्ट आहे. बीसीसीआयने पाकिस्तानऐवजी ही स्पर्धा दुबई किंवा श्रीलंकेत करण्याची मागणी केली आहे. या मुद्द्यावरून हरभजन सिंग पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू आणि पत्रकारांना भिडला आणि खडेबोल सुनावले.

Video : चॅम्पियन्स ट्रॉफीवरून पाकिस्तानी न्यूज चॅनेलवर जुंपली, हरभजन सिंगने तोंडावर काढली लाज
| Updated on: Jul 12, 2024 | 10:25 PM
Share

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साली पाकिस्तानात होणार यावर आयसीसीकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. मात्र या स्पर्धेवरून बराच वाद सुरु आहे. कारण टीम इंडियाने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला आहे. दहशतवादाला खतपाणी देणाऱ्या देशात जायचं नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे. ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर करावी अशी विनंतरी बीसीसीआयने केली आहे. या मॉडेल अंतर्गत भारतीय संघ आशिया चषकाप्रमाणे दुबई किंवा श्रीलंकेत सामने खेळेल. या मागणीमुळे पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली आहे. भारताने पाकिस्तानात खेळायला यावं यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न होत आहेत. पण भारताने या प्रयत्नांना केराची टोपली दाखवली आहे. या मुद्द्यावरून पाकिस्तानी मिडियामध्ये चर्चांचा फड रंगला आहे. असं असताना या चर्चेत माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग याने भाग घेतला होता. पाकिस्तानी चॅनेलवर हरभजन सिंग गेस्ट म्हणून भाग घेतला होता. यावेळी पत्रकार आणि माजी खेळाडूंना भिडला.

अँकरने प्रश्न विचारला की, टीम इंडिया पाकिस्तानात येणार नाही का? नुकताच दिग्गज संघांनी पाकिस्तान दौरा केला आहे. यावर हरभजन सिंगने सांगितलं, टीम इंडिया पाकिस्तानात अजिबात येणार नाही. टीम इंडियाला पाकिस्तानची गरज नाही. जर तुम्ही भारताशिवाय करू शकता तर जे हवं ते करा. पाकिस्तानी मीडियातील बातम्यांनुसार, टीम इंडिया पाकिस्तानात आली नाही तर श्रीलंकेला खेळण्याची संधी दिली जाईल. हरभजनने यात बातमीवरून पाकिस्तान पत्रकाराला खडे बोल सुनावले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आर्थिक स्थिती एकदम नाजूक आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून गयावया सुरु आहे.

आशिया कप चषकातही असंच काहीसं झालं होतं. भारतीय संघाने पाकिस्तानात खेळण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर पाकिस्तान झुकलं आणि हायब्रीड मॉडेलवर स्पर्धा खेळण्याची तयारी दर्शवली. भारताने सर्व सामने श्रीलंकेत खेळले. इतकंच काय तर रोहित शर्माच्या नेतृत्वात आशिया चषकावर नाव कोरलं. त्यानंतर पाकिस्तान संघ भारतात वनडे वर्ल्डकप स्पर्धा खेळण्यासाठी आला होता. मात्र साखळी फेरीतच पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात आलं. टी20 वर्ल्डकप स्पर्धेतही पाकिस्तानचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं होतं.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.