AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी तिकीट विक्री सुरु, भारत पाकिस्तान सामना फक्त 438 रुपयात; पण…

टी20 वर्ल्डकप स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. म्हणजेच दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. असं असताना या स्पर्धेसाठी तिकीट विक्री 11 डिसेंबरपासून सुरु झाली आहे. भारत पाकिस्तान सामन्याच्या तिकीटासाठी झुंबड उडाली आहे.

IND vs PAK : टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी तिकीट विक्री सुरु, भारत पाकिस्तान सामना फक्त 438 रुपयात; पण...
IND vs PAK : टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी तिकीट विक्री सुरु, भारत पाकिस्तान सामना फक्त 438 रुपयात; पण...Image Credit source: ACC/Asian Cricket
| Updated on: Dec 11, 2025 | 10:22 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांना घरच्या मैदानावर सामने पाहण्याची नामी संधी आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धा 7 फेब्रुवारी ते 8 मार्चदरम्यान खेळली जाणार आहे. या दरम्या एकूण 40 सामने खेळले जाणार आहेत. या सामन्यांसाठी आयसीसीने नुकतीच तिकीट विक्री सुरु केली आहे. गुरूवारी पहिल्या टप्प्याची तिकीट विक्री केली गेली. यात काही सामन्यांची तिकिटे फक्त 100 रुपयात मिळत आहे. पण क्रीडाप्रेमींना वेध लागले आहेत ते भारत पाकिस्तान सामन्याचे… कारण हा सामना पाहण्याची मजा काही औरच आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मैदानात उपस्थित राहून सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांची धडपड सुरु आहे. पण गुरूवारी 6.45 वाजता तिकीट विक्री सुरु झाली आणि पहिल्या टप्प्यातील सर्व तिकिटं अर्ध्या तासातच विकली गेली.

भारत पाकिस्तान हा सामना पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींना श्रीलंकेत जावं लागणार आहे. कारण दोन्ही संघ तटस्थ ठिकाणी सामना खेळणार हे आधीच ठरलं आहे. त्यामुळे हा सामना श्रीलंकेत होणार आहे. हा सामना कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियमवर होईल. आता तुम्ही तिकीट विकत घेण्यासाठी गेलात तर तिथे तुम्ही सोल्ड आऊट असं लिहिलेलं दिसेल. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये आतापासूनच या सामन्याची उत्सुकता असल्याचं दिसून आलं आहे. आयसीसीने भारत पाकिस्तान सामन्यांची पहिल्या टप्प्यातील तिकिटांसाठी 1500 श्रीलंकन रुपये ठेवली होती. म्हणजेच भारतीय चलताना त्याची रक्कम 438 रुपये आहे. त्यामुळे झटपट तिकीट विक्री होणं सहाजिकच आहे.

भारताच्या इतर सामन्यांची तिकीटही संपली

भारताचा पहिला सामना 7 फेब्रुवारीला मुंबईत अमेरिकेशी होणार आहे. या सामन्याचं तिकीट 750 रुपयांपासून सुरु झालं होतं. पण या सामन्याच्या पहिल्या टप्प्याची तिकीट विक्री झाली आहे. 12 फेब्रुवारीला दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणाऱ्या भारत-नामिबिया सामन्याची तिकिटेही विकली गेली आहेत. फक्त फक्त भारत-नेदरलँड सामन्याची तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या तिकिटाचे दर 500 रुपयांपासून आहे. हा सामना 18 फेब्रुवारी रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. या मैदानात प्रेक्षकांची आसन संख्या अधिक आहे. त्यामुळे विक्री होण्यास थोडा विलंब लागला आहे.

Follow Us
स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या वक्तव्याने सभागृहात गदारोळ
Rahul Gandhi | स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या एका वक्तव्याने सभागृहात प्रचंड गदारोळ
कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
Photo | कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय...
Manoj Jarange Patil | एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या; जरांगेंनी पुन्हा फुंकलं आंदोलनाचं रणशिंग
पालिकेची लूटमार सुरू? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर पेडणेकर आक्रमक
Kishori Pednekar | पालिकेची लूटमार सुरू आहे का? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकर आक्रमक
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... भाजप नेता काय म्हणाला?
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्याने घेरलं
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...