AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पराभवानंतर शुबमन गिलने मनातलं सांगितलं, अभिमान वाटतो असं सांगत काढले चिमटे

भारताने तिसरा कसोटी सामना अवघ्या 22 धावांनी गमावला. या सामन्यात इंग्लंडने 192 धावा करत विजयासाठी 193 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण भारतीय संघ 172 धावांवरच बाद झाला. भारताचा पराभव झाला असला तरी कर्णधार शुबमन गिलने अभिमान व्यक्त केला आहे.

पराभवानंतर शुबमन गिलने मनातलं सांगितलं, अभिमान वाटतो असं सांगत काढले चिमटे
पराभवानंतर शुबमन गिलने मनातलं सांगितलं, अभिमान वाटतो असं सांगत काढले चिमटेImage Credit source: BCCI
| Updated on: Jul 14, 2025 | 10:16 PM
Share

अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. भारताने पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली. पण दुसऱ्या डावात 193 धावांचं आव्हान गाठताना नांगी टाकली. आघाडीचे सर्व फलंदाज फेल गेले. अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि शेपटाच्या फलंदाजांनी कडवी झुंज दिली. त्यामुळे पराभवाचं अंतर काही अंशी कमी झालं. भारताने तिसरा गमावल्याने इंग्लंडने या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतावर उर्वरित दोन सामन्यात दडपण वाढलं आहे. भारताला या मालिकेत बरोबरी साधण्यासाठी चौथा कसोटी सामना काहीही करून जिंकावा लागणार आहे. त्यामुळे उर्वरित दोन्ही सामन्यात भारतावर दडपण असणार यात काही शंका नाही. या पराभवानंतर शुबमन गिलने सुरुवातीला अभिमान व्यक्त केला. त्यानंतर आपल्या मनातली खंत बोलून दाखवली.

कर्णधार शुबमन गिल म्हणाला की, ‘खूप अभिमान आहे. पाच दिवसांच्या कठीण क्रिकेटमध्ये आणि शेवटच्या सत्रापर्यंत शेवटच्या विकेटपर्यंत आणि प्रयत्नांचा प्रचंड अभिमान आहे. मी पाठलाग करण्याबद्दल खूप आत्मविश्वासू होतो. भरपूर फलंदाजी शिल्लक असताना मी खूप आत्मविश्वासू होतो. परंतु इंग्लंड ज्या पद्धतीने आक्रमण करत राहिला, त्यामुळे आम्हाला आमच्या टॉप-ऑर्डरमध्ये कदाचित दोन-तीन 50 धावांच्या भागीदारी करायच्या होत्या, आम्ही ते करू शकलो नाही आणि ते आमच्यापेक्षा चांगले खेळले.’

‘जोपर्यंत एक फलंदाज फलंदाजी करत आहे तोपर्यंत नेहमीच आशा असते. कारण लक्ष्य मोठे नव्हते आणि एक 50-60 धावांची भागीदारीने सामन्यात परतू वाटत होतं. जडेजा खूप अनुभवी आहे आणि त्याला कोणताही संदेश देऊ इच्छित नव्हतो. मला वाटते की तो शेपटाच्या फलंदाजांसह खरोखर चांगली फलंदाजी करत होता आणि मला फक्त त्याने आणि टेल-एंडर्सनी शक्य तितक्या वेळ फलंदाजी करावी अशी इच्छा होती.’ असंही कर्णधार शुबमन गिल याने सांगितलं.

‘आज सकाळीही त्यांनी ज्या पद्धतीने योजना आखल्या. आम्हाला 50 धावांची भागीदारी अपेक्षित होती आणि जर आम्हाला वरच्या क्रमात 50 धावांची भागीदारी मिळाली असती, तर आमच्यासाठी गोष्टी सोप्या झाल्या असत्या. कधीकधी, मालिकेचा स्कोअरकार्ड तुम्ही किती चांगले खेळला आहात हे दर्शवत नाही. मला वाटते की आम्ही खरोखर चांगले क्रिकेट खेळलो आणि मला वाटते की येथून ही मालिका आणखी रोमांचक होणार आहे.’, असंही गिल पुढे म्हणाला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.