AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC 2027 : तिसर्‍या कसोटी पराभवानंतर भारताचं नुकसान, अंतिम फेरीचं गणित होणार किचकट

भारताने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत चुका करत सामना गमावला. त्यामुळे भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 गुणतालिकेत मोठं नुकसान झालं. या पराभवामुळे भारताचं अंतिम फेरीचं गणित किचकट होत जाणार आहे.

WTC 2027 : तिसर्‍या कसोटी पराभवानंतर भारताचं नुकसान, अंतिम फेरीचं गणित होणार किचकट
WTC 2027 : तिसर्‍या कसोटी सामन्यात पराभव झाल्याने भारताचं नुकसान, अंतिम फेरीचं गणित होणार किचकटImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Jul 14, 2025 | 9:39 PM
Share

भारताची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेचं अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगलं होतं. त्यामुळे आता नव्या पर्वात भारताची त्यासाठी धडपड सुरु आहे. पण इंग्लंडमधील तीन कसोटी सामन्यातील कामगिरी पाहता भारताचं पुढचं गणित कठीण होत जाणार आहे. कारण ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत पुढच्या काळात बरीच चढाओढ पाहायला मिळणार आहे. भारताचा हा प्रवास पुढे आणखी कठीण होत जाणार आहे. कारण की भारताला या साखळीत ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, वेस्ट इंडिज, श्रीलंका, न्यूझीलंड या संघांचा सामना करायचा आहे. त्यामुळे हा प्रवास पुढे अजून किचकट होत जाणार आहे. भारताच्या पुढील कसोटी मालिका वेस्ट इंडिजविरुद्ध 2, दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 2, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5, श्रीलंकेविरुद्ध 2 आणि न्यूझीलंडविरुद्ध 2 सामने खेळणार आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्ध त्यांच्या भूमीवर खेळणार आहे.

गुणतालिकेत अशी भारताची टक्केवारी

ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी ही 100 टक्के असून त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध दोन्ही सामने जिंकले आहेत. तिसऱ्या सामन्याच्या निकालाचा यावर परिणाम होऊ शकतो. श्रीलंका बांग्लादेश कसोटी मालिकेनंतर श्रीलंकेची विजयी टक्केवारी ही 66.67 टक्के आहे. इंग्लंडने तिसरा कसोटी सामना जिंकल्याने विजयी टक्केवारीत वाढ झाली आहे. इंग्लंडची विजयी टक्केवारी ही 66.67 टक्के झाली. भारताने तिसरा कसोटी सामना गमावल्याने विजयी टक्केवारीत घट झाली आहे. भारताची विजयी टक्केवारी 50 वरून 33.33 झाली आहे. तसेच चौथ्या स्थानी घसरण झाली आहे.

भारताने हातात असलेला सामना गमावला

भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेतील तिसरा सामना भारताने अवघ्या 22 धावांनी गमावला.  इंग्लंडने दुसऱ्या डावात 192 धावा केल्या आणि विजयासाठी 193 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना भारताने 170 धावांपर्यंत मजल मारली. रवींद्र जडेजाने या सामन्यात एकाकी झुंज दिली. या पराभवामुळे भारताचा लॉर्ड्सवरील पराभवाची मालिका सुरुच राहिली आहे. आतापर्यंत भारताने 20 कसोटी सामना लॉर्ड्सवर खेळले. त्यापैकी 3 सामन्यात विजय, 13 सामन्यात पराभव आणि चार सामने कसेबसे ड्रॉ केले आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.