AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा इफेक्ट! भारत-पाकिस्तान यांच्यातील पाच क्रिकेट सामने होणार रद्द

दहशतवादी देश अशी ओळख असलेल्या पाकिस्तानसोबत भारताने सर्वच संबंध तोडले आहेत. पाकिस्तानसोबत भारताने मागच्या 12-13 वर्षांपासून द्विपक्षीय मालिका खेळली नाही. आयसीसी स्पर्धेत फक्त दोन्ही देश आमनेसामने आले आहेत. पण पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हा विरोध आणखी तीव्र झाला आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा इफेक्ट! भारत-पाकिस्तान यांच्यातील पाच क्रिकेट सामने होणार रद्द
भारत पाकिस्तान सामनाImage Credit source: PTI
| Updated on: Apr 25, 2025 | 7:37 PM
Share

पाकिस्तान हा देश कायम आपल्या कुरापती आणि दहशतवादी कृत्यांसाठी ओळखला जातो. आतापर्यंत पाकिस्तानने जे पेरलं आहे त्याचे परिणाम दिसत आहे. दहशतवाद्यांना आश्रयही पाकिस्तानात दिला जातो. याची अनेक उदाहरण भुतकाळात दिसून आली आहेत. ओसामा बिन लादेनलाही अमेरिकेने पाकिस्तानातच मारलं होतं. असं असताना पाकिस्तानकडून दहशतवादाला खिळ बसवण्याऐवजी अजून प्रोत्साहन देण्याचं काम केलं जात आहे. 22 एप्रिलला झालेल्या पहलगाम हल्ल्यातही पाकिस्तानचा हात आहे. या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांना जीव गमवावा लागला. या कृत्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तानविरुद्ध संताप आहे. पाकिस्तानशी कोणतेही संबंध ठेवू नयेत अशी मागणी होत आहे. तसेच योग्य धडा शिकवावा अशी मागणीही जोर धरत आहे. दरम्यान बीसीसीआयने कठोर पावलं उचलावी अशी मागणी केली जात आहे. पाकिस्तानसोबत कोणत्याही स्पर्धेत खेळू नये. जर ही मागणी मान्य झाली तर एका वर्षात पाच सामने रद्द होऊ शकतात.

भारत आणि पाकिस्तान हे संघ आयसीसी आणि आशिया क्रिकेट काउंसिल स्पर्धेत एकमेकांचा सामना करतात. पण 22 एप्रिलला केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट बोर्डावर दबाव वाढला आहे. पाकिस्तानविरुद्ध आयसीसी स्पर्धेतही खेळू नये अशी मागणी जोर धरत आहे. बीसीसीआयने या प्रकरणी तसं कोणतीही पाऊल उचलेलं नाही. पण जर असं काही झालं तर एका वर्षात 5 सामन्यांवर गडांतर येणार आहे. यात आशिया कपपासून वर्ल्डकप आणि सिनियर टीमपासून ज्युनियर टीमचा समावेश असेल.

या वर्षी पुरुष आशिया कप खेळला जाणार आहे. या स्पर्धेचं यजमानपद भारताकडे आहे. ही स्पर्धा पूर्णपणे भारतात खेळली जाईल. मागच्या काही आशिया कप स्पर्धेचं वेळापत्रक पाहीलं तर दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये असतात. तसेच सुपर 4 फेरीत पुन्हा आमनासामना होतो. यामुळे आशिया कप स्पर्धेतील दोन सामने रद्द होतील. या वर्षी महिला वनडे वर्ल्डकप भारतात होणार आहे. ही स्पर्धा राउंड रॉबिन फॉर्मेट खेळली जाईल. या स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना होईल. त्यामुळे रद्द होणाऱ्या यादीत आणखी एका सामन्याची भर पडेल.

पुरुषांचा 19 वर्षांखालील विश्वचषक पुढील वर्षी खेळवला जाणार आहे आणि यामध्येही भारत आणि पाकिस्तान असेल.पुढील वर्षी भारतात पुरुषांचा टी20 विश्वचषक होणार आहे. मागील टी20 विश्वचषकाप्रमाणे यावेळीही भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीसीसीआयने कठोर पाऊल उचललं तर हे पाच सामने एका वर्षात रद्द होतील.

Follow Us
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा.
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी.
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.