AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ind vs ban : ‘आता टॅलेंट राहिलं नाही’, सौरव गांगुली याची भारत-बांगलादेश कसोटी मालिकेबाबत मोठी भविष्यवाणी, म्हणाला…

Soural Ganguly on India vs Bangladesh Test series : भारत आणि बांगलादेशमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिक होणार आहे. या मालिकेआधी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने मोठी भविष्यवाणी केली आहे.

ind vs ban : 'आता टॅलेंट राहिलं नाही', सौरव गांगुली याची भारत-बांगलादेश कसोटी मालिकेबाबत मोठी भविष्यवाणी, म्हणाला...
| Updated on: Sep 09, 2024 | 6:37 PM
Share

दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बांंगलादेश संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यातील पहिला सामना 19 सप्टेंबरला चेन्नईमध्ये पार पडणार आहे. यंदा मार्च महिन्यानंतर टीम इंडियाने एकही कसोटी सामना खेळला नाही. तर पाहुणा संघ बांगलादेशने पाकिस्तानला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत केल्याने मोठ्या आत्मविश्वासाने ते मैदानात उतरतील. टीम इंडियाला घरच्या मैदानावर पराभूत करणं काही सोप्पे नाही. अशातच या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेबद्दल माजी कर्णधार सौरव गांगुलीने भविष्यवाणी केली आहे.

सौरव गांगुली काय म्हणाला?

पाकिस्तानला त्यांच्या भूमीवर हरवण काही सोपे काम नाही त्यामुळे बांगलादेशच्या खेळाडूंचे अभिनंदन. पण भारतीय संघ पूर्ण वेगळा आहे. घरच्या मैदानात किंवा विदेशात दोन्हीकडे भारतीय संघ दमदार कामगिरी करतो. भारताची फलंदाजी मजबूत आहे. मला वाटत नाही बांगलादेश भारतामध्ये जिंकेल, ही मालिका भारतीय संघ जिंकेल, पण भारतालाही बांगलादेश चांगली टक्कर देईल. कारण पाकिस्तानचा पराभव केल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला असणार असल्याचं सौरव गांगुली याने म्हटलं आहे.

पाकिस्तानमध्ये मला खरोखरच टॅलेंटची कमतरता दिसत आहे. जेव्हा आम्ही पाकिस्तान संघाचा विचार करत होतो तेव्हा मियांदाद, वसीम, वकार, सईद अन्वर, मोहम्मद युसूफ आणि युनूस खान या खेळाडूंची आठवण येते. या खेळाडूंप्रमाणे आताच्या संघाकडे टॅलेंट पाहायला मिळत नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्याा लोकांना याकडे लक्ष द्यावे लागेल, असंही गांगली म्हणाला.

दरम्यान, बांगलादेशने कसोटी मालिकेमध्ये भारताचा 2-0 ने पाकिस्तानचा पराभव केला होता. शान मसूद हा पाकिस्तान संघाचे नेतृत्त्व करत होता. मात्र बांगलादेशने त्यांच्याय घरच्या मैदानावर त्यांना पराभवाची धूळ चारली. आता भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना 9 ते 23 सप्टेंबरमध्ये चेन्नईमध्ये तर दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर यादरम्यान होणार आहे.

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघः रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.

सुनेत्रा पवार यांच्या शासकीय वाहनप्रकरणी वाद; अनिकेत तटकरेंवर टीका
सुनेत्रा पवार यांच्या शासकीय वाहनप्रकरणी वाद; अनिकेत तटकरेंवर टीका.
विलीनीकरणानंतर पवार राजकारणापासून होणार होते दूर,नेमकं काय घडणार होतं?
विलीनीकरणानंतर पवार राजकारणापासून होणार होते दूर,नेमकं काय घडणार होतं?.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद; महिलेला कपडे फाडत मारहाण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद; महिलेला कपडे फाडत मारहाण.
राज ठाकरे यांना आम्ही विकासासाठी सोबत घेणार, शिरसाटांचं विधान
राज ठाकरे यांना आम्ही विकासासाठी सोबत घेणार, शिरसाटांचं विधान.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सुनील तटकरे यांनाही पूर्वकल्पना होती?
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सुनील तटकरे यांनाही पूर्वकल्पना होती?.
संजय राऊत आणि दादा भुसे यांच्यातील फौजदारी खटला संपला
संजय राऊत आणि दादा भुसे यांच्यातील फौजदारी खटला संपला.
टिपू सुलतानच्या मुद्द्यावर ठाकरे गटाची भूमिका काय? संजय राऊतांनी एका..
टिपू सुलतानच्या मुद्द्यावर ठाकरे गटाची भूमिका काय? संजय राऊतांनी एका...
रोहित पवारांचे VSR कंपनीवर गंभीर आरोप; SR कंपनीला एका बड्या नेत्याचा..
रोहित पवारांचे VSR कंपनीवर गंभीर आरोप; SR कंपनीला एका बड्या नेत्याचा...
बदलापूरमध्ये अंडाशय तस्करीचा धक्कादायक प्रकार उघड; तीन महिलांना अटक
बदलापूरमध्ये अंडाशय तस्करीचा धक्कादायक प्रकार उघड; तीन महिलांना अटक.
चंद्रपूरचा बदला भिवंडीत, काँग्रेसच्या पाठिंब्याने नारायण चौधरी महापौर
चंद्रपूरचा बदला भिवंडीत, काँग्रेसच्या पाठिंब्याने नारायण चौधरी महापौर.