AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘गौतम गंभीर ढोंगी…’, माजी क्रिकेटपटूची ‘त्या’ निर्णयानंतर आगपाखड

आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडिया कसून सराव करत आहे. या स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना आकर्षणाचा केंद्रबिंदू असणार आहे. असं असताना माजी क्रिकेटपटूने भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरवर टीकास्त्र सोडलं आहे. जाणून घ्या काय आहे प्रकरण ते...

'गौतम गंभीर ढोंगी...', माजी क्रिकेटपटूची 'त्या' निर्णयानंतर आगपाखड
'गौतम गंभीर ढोंगी...', माजी क्रिकेटपटूची 'त्या' निर्णयानंतर आगपाखड Image Credit source: PTI
| Updated on: Aug 26, 2025 | 4:21 PM
Share

आशिया कप स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. 9 सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबरला होणार आहे. ओमान विरुद्ध पहिला सामना असणार आहे. त्यानंतर 14 ऑगस्टला भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. खरं तर हा सामना होणार की नाही याबाबत शंका होती. मात्र केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट केल्याने हा सामना होणार आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने गौतम गंभीरवर नाराजी व्यक्त केली आहे. गौतम गंभीर जेव्हा प्रशिक्षक नव्हता तेव्हा भारत पाकिस्तान सामन्याबाबत वेगळं मत असायचं. आता हेड कोच झाल्यानंतर मूग गिळून गप्प बसला आहे, असं माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी याने सांगितलं. भारत पाकिस्तान सामन्याचं आयोजन केल्याने मनोज तिवारीने संताप व्यक्त केला आहे. या सामन्याला परवानगी कशी दिली, असं सांगत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानने निर्दोष भारतीयांची हत्या केली. आता आम्ही शत्रू राष्ट्रासोबत क्रिकेट खेळणार आहोत, हे चुकीचं आहे, असं सांगत मनोज तिवारीने संताप व्यक्त केला. मनोज तिवारीने क्रिकट्रॅकरशी बोलताना सांगितलं की, ‘मला कायम असं वाटतं की तो दोन्ही बाजूने बोलतो. तो ढोंगी आहे. कारण ही तीच व्यक्ती आहेत जी कोच नसताना सांगायची की, भारत-पाकिस्तान सामना कधीच झाला नाही पाहीजे. आता तो काय करणार आहे. आता टीम इंडियाचा हेड कोट आहे. भारतीय संघ आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. आता राजीनामा का देत नाही. टीम इंडियासोबत नसेल असं का सांगत नाही.’

गौतम गंभीर काय म्हणाला होता?

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी गौतम गंभीरने एका कार्यक्रमात सांगितलं होतं की, भारताने पाकिस्तानविरुद्ध आयसीसी स्पर्धेतही खेळू नये. पाकिस्तान जिथपर्यंत दहशतवादी कारवाया बंद करत नाही जोपर्यंत असंच केलं पाहीजे. पण गौतम गंभीरच्या या वक्तव्यानंतरही भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळला आणि जिंकला. गौतम गंभीरने तेव्हा सांगितलं होती की, पाकिस्तानविरुद्ध खेळायचं की नाही? शेवटी हा निर्णय सरकार घेतं.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!