AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बसं झालं..आता कारणं नको! श्रीलंका दौऱ्यापूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला गौतम गंभीरची तंबी?

टी20 वर्ल्डकप स्पर्धा आणि झिम्बाब्वे दौऱ्यानंतर टीम इंडियात सर्वकाही ठीक चाललं असं वाटत आहे. पण गौतम गंभीरने प्रशिक्षकपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर भविष्याच्या दृष्टीने आतापासून पायाभरणी करण्यास सुरुवात केली आहे. रोहित-विराटने टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण वनडे मालिकेत खेळावं असा आग्रह गौतम गंभीरने धरल्याची माहिती आहे.

बसं झालं..आता कारणं नको! श्रीलंका दौऱ्यापूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला गौतम गंभीरची तंबी?
| Updated on: Jul 16, 2024 | 1:40 PM
Share

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून यात तीन टी20 आणि 3 वनडे सामने खळणार आहे. या सामन्यांसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. मात्र या मालिकेत दिग्गज खेळाडू खेळणार नसल्याची माहिती समोर येत आहे. मात्र प्रशिक्षकपदी बसलेल्या गौतम गंभीर यांना ही बाब रूचलेली नाही, अशी माहिती समोर येत आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंना पुरेसा आराम मिळाला आहे. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी रोहित शर्मा, विराटसह इतर खेळाडूंचा विचार व्हावा, असं गौतम गंभीरने निवड समितीला सांगितलं आहे. श्रीलंकाविरुद्धची वनडे मालिका 2 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. तसेच ही मालिका 7 ऑगस्टला संभणार आहे. त्यानंतर बांग्लादेशविरुद्धच्या मालिकेसाठी सहा आठवड्यांचं अंतर आहे. त्यामुळे श्रीलंकाविरुद्धच्या मालिकेतून वरिष्ठ खेळाडूंना वगळण्यात अर्थ नाही, असं गौतम गंभीरने सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

श्रीलंकाविरुद्धची मालिका 7 ऑगस्टला संपणार आहे. तर बांग्लादशविरुद्धची मालिका 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. त्यामुळे या दोन्ही मालिकांमध्ये खूप अंतर आहे. त्यामुळे खेळाडूंना पुन्हा आराम मिळणार आहे. त्यामुळे रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देणं योग्य वाटत नसल्याचा युक्तिवाद गौतम गंभीरने निवड समितीसमोर केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी प्रमुख खेळाडूंची निवड करण्याची मागणी केल्याचं वृत्त आहे. यापूर्वी रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह बांग्लादेशविरुद्धच्या मालिकेपासून पुनरागमन करणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे आता श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत दिग्गज खेळाडू खेळणार की नाही हा प्रश्न आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत हार्दिक पांड्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. श्रीलंकेविरुद्धच्या दौऱ्यात तो टी20 वर्ल्डकप स्पर्धेत असेल. पण वनडे मालिकेसाठी वैयक्तिक कारणामुळे मुकण्याची शक्यता आहे, असं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत बांग्लादेशविरुद्ध हार्दिक पांड्या शेवटचा वनडे सामना खेळला होता. त्यानंतर वनडे सामना खेळलेला नाही. दरम्यान हार्दिक पांड्याने वनडे मालिकेत खेळणार नसल्याचं बीसीसीआयला कळवल्याचं वृत्त आहे.  दरम्यान श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा आज केली जाईल. या संघात कोणा कोणाची निवड होते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.