AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 | आता पावसामुळे सामना रद्द होणं कॅन्सल कॅन्सल कॅन्सल

पावसाच्या व्यत्ययामुळे आतापर्यंत अनेकदा बरेच सामने हे रद्द करावे लागले आहेत. आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठीही खबरदारी म्हणून आयसीसीने पावसामुळे घात होऊ नये यासाठी 1 दिवस राखीवही ठेवला आहे.

IPL 2023 | आता पावसामुळे सामना रद्द होणं कॅन्सल कॅन्सल कॅन्सल
प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Apr 27, 2023 | 10:23 PM
Share

मुंबई | पावसामुळे अनेक क्रिकेट सामने रद्द होतात. तर काही वेळा सामन्यांमधील षटकं कमी केली जातात. यामुळे उत्साहाने स्टेडियममध्ये सामना पाहायला आलेल्या क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड होता. दोन्ही संघांना प्रत्येकी 1 पॉइंट वाटून दिल्याने पॉइंट्सटेबलचं गणितही बिघडतं. पावसामुळे सर्व समीकरणं बदलतात. मात्र आता असं काहीच होणार नाहीये. गेल्या अनेक वर्षात तंत्रज्ञान विकसित झालंय. या तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आता सामना रद्द होणार नाही. यामुळे कितीही पाऊस पडला तरी नो टेन्शन.ही पद्धत नक्की काय आहे, आणि पावसानंतरही सामना कसा खेळवण्यात येणार, हे आपण जाणून घेऊयात.

आता धोधो, मुसळधार किंवा बदाबदा, पाऊस कसाही पडो, अवघ्या 20 मिनिटात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पावसाच्या पाण्यावर पाणी फेरलं जाणार आहे, म्हणजेच खेळपट्टीवरील जमलेलं पाणी नाहीसं होणार. पाऊस पडल्याने आऊटफिल्डवर परिणाम होतो. मात्र तंत्रज्ञानाच्या मदतीने 20 मिनिटात मैदान आधीसारखं खेळण्याच्या लाईकीच होईल. हे शक्य होणार आहे ते एडवान्स सब एअर सिस्टमुळे.

एडवान्स सब एअर सिस्टमुळे पावसानंतर मैदान लवकरात लवकर सुकवण्यात मदत होईल, ज्यामुळे खेळावर परिणाम होणार नाही. याआधी स्टेडियमच्या एका भागात पाणी काढण्यासाठी ड्रेनेज सिस्टमचा वापर करण्यात आला होता. सामने रद्द झाल्याने भविष्यात पुन्हा तसं होऊ नये, यासाठी एडवान्स सब एअर सिस्टमचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एचपीसीए अर्थात हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. धर्मशाळा स्टेडियममध्ये 2 सामने रद्द झालेत. त्यामुळे तडकाफडकी हा निर्णय घेतला गेला. याचं सर्व काम मार्च महिन्यातच पूर्ण झालं.

“धर्मशाळा स्टेडियममधील नव्या आऊटफिल्डमधील पावसाचं पाणी काढण्यासाठी एडवान्स सब एअर ड्रेनेज सिस्टम स्थापित करण्यात आलं आहे. ज्यामुळे पावसाचं पाणी 20 मिनिटात सुकवलं जाईल. त्यानंतर मैदानात खेळता येईल”, असं एचपीसीएचे सचिव अवनीश परमार यांनी सांगितलं.

सब एअर सिस्टमच्या मदतीने मैदान लवकरात लवकर सुकवलं जातं. या सिस्टमच्या मदतीने संपूर्ण मैदानात आऊट फिल्डमध्ये परफारेटड पाईप टाकले जातात. यामध्ये बारीक बारीक छिद्र असतात. या छिद्रांच्या मदतीने पाणी या पाईपच्या माध्यमातून बाहेर पडतं. तसेच प्रेशरमुळे पाणी शोषून बाहेर काढलं जातं. इतकंच नाही, तर या सिस्टमच्या मदतीने मैदानातील गवताच्या मुळात जाऊन पाणी एअर प्रेशरच्या मदतीने शोषून काढलं जाऊ शकतं.

Follow Us
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.