AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Virat : रोहित-विराटवर हल्लाबोल, दिग्गज भारतीय खेळाडू काय म्हणाला?

Rohit Sharma And Virat Kohli : न्यूझीलंड विरूद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही अपयशी ठरले.त्यामुळे सध्या हे दोघे अनेकांच्या निशाण्यावर आहेत.

Rohit Virat : रोहित-विराटवर हल्लाबोल, दिग्गज भारतीय खेळाडू काय म्हणाला?
rohit sharma and virat kohli test cricketImage Credit source: Bcci
| Updated on: Nov 05, 2024 | 12:21 AM
Share

न्यूझीलंडविरुद्ध भारताने कसोटी मालिका गमावली. इतकंच नाही भारताला मायदेशात 3 किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्हाईटवॉशने पराभूत व्हावं लागलं. या लाजीरवाण्या पराभवानंतर टीम इंडियावर आणि अनुभवी खेळाडू या नात्याने आजी माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांवर सडकून टीका केली जात आहे. टीम इंडियाचे माजी वेगवान गोलंदाज करसन घावरी यांनी विराट आणि रोहितवर हल्लाबोल केला आहे. आता हे दोघे अपयशी ठरले तर त्यांनी निवृत्ती घ्यायला हवी, असं घावरी म्हणाले. ऑस्ट्रेलिया दौरा दोघांसाठी अखेरची संधी असायला हवी. त्या दौऱ्यात दोघेही अपयशी ठरले, तर त्यांनी निवृत्ती घ्यावी, असं घावरींना वाटतं.

करसन घावरी काय म्हणाले?

“आता जर विराट कोहली आणि रोहित शर्मा या दाघोांना सूर गवसला नाही, तर त्या दोघांनी सोडून द्यायला हवं. ऑस्ट्रेलियात जर त्यांनी चांगली कामगिरी केली नाही तर त्यांनी निवृत्त व्हायला हवं. विराट आणि रोहितने भारतीय क्रिकेटसाठी खूप काही केलंय. मात्र संघाला विजयाची गरज आहे. आपल्याला भविष्यातील संघ तयार करण्याची गरज आहे. जे कामगिरी करु शकत नाहीत त्यांना कुठवर टीममध्ये ठेवायचं”, असा प्रश्नही घावरी यांनी उपस्थित केला. न्यूझीलंडविरुद्धच्या व्हाईटवॉशनंतर घावरींनी ही प्रतिक्रिया दिली.

विराट-रोहित अपयशी

विराट आणि रोहित या दा दोघांना न्यूझीलंडविरुद्ध बॅटिंगने काही खास करता आलं नाही. विराटने 6 डावांमध्ये 15.50 च्या सरासरीने 93 धावा केल्या. तर रोहितने 15.16 च्या एव्हरेजने 91 रन्स केल्या. त्यामुळे आता या दोघांवर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगली कामगिरी करण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे या अनुभवी जोडीची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी काय रणनिती असणार? याकडे साऱ्यांचंच लक्ष असणार आहे.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर.

राखीव खेळाडू : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.