AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: ‘हा’ धुरंदर भारतीय फलंदाज दोन वर्षानंतर भारतीय संघात, इंग्लंड विरुद्ध कसोटीसाठी सज्ज, अशी असू शकते विराट सेना

भारत आणि इंग्लंड यांच्यात 4 ऑगस्टपासून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ सध्या कोणत्या खेळाडूंना पहिल्या कसोटीसाठी खेळवायचं ही रणनीती आखण्यात व्यस्त आहे.

IND vs ENG: 'हा' धुरंदर भारतीय फलंदाज दोन वर्षानंतर भारतीय संघात, इंग्लंड विरुद्ध कसोटीसाठी सज्ज, अशी असू शकते विराट सेना
के एल राहुल
| Edited By: | Updated on: Aug 04, 2021 | 6:31 PM
Share

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी दोन्ही संघाकडून पहिल्या टेस्टसाठी मैदानात उतरणारे अंतिम 11 खेळाडू कोण असतील? या चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. भारतीय संघातील खेळाडू सतत दुखापतग्रस्त होत असल्याने संघ प्रशासनाला अंतिम 11 खेळाडू निवडणे कठीण झाले आहे. नुकताच संघाचा सलामीवीर मयांक अगरवाल (Mayank Agarwal) दुखापतग्रस्त झाल्याने भारतीय संघाला नवा सलामीवीरा लागणार आहे. यासाठीच भारताकडून दोन वर्षापूर्वी अखेरचा कसोटी सामना खेळलेल्या केएल राहुलचे (KL Rahul) नाव जवळपास निश्चित झाले आहे. रोहित शर्मासोबत सलामीवीर म्हणून राहुलला पाठवण्यात येऊ शकते.

केएल राहुलने नुकतीच काउंटी 11 संघासोबत झालेल्या तीन दिवसीय सराव सामन्यातही शतक ठोकले होते. राहुल शिवाय हनुमा विहारीला देखील सलामीला पाठवले जाऊ शकते. तर पृथ्वी शॉ अजूनही इंग्लंडला पोहोचला नसल्याने त्याचा सध्या विचार केला जात नाही. केएल राहुल आणि रोहित शर्मा हे आधीही एकत्र सलामीला उतरले आहे. राहुलने 2019 मध्ये वेस्टइंडीज विरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

चार वेगवान गोलंदाजासह खेळू शकते टीम इंडिया

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारतीय संघ दोन फिरकीपटूंची रणनीती बदलू शकतो. या रणनीतीने न्यूझीलंड विरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे यावेळी भारतीय संघ चार वेगवान गोलंदाज खेळवू शकतो. तसेच पहिला सामना असलेल्या ट्रेंट ब्रिजच्या मैदानाही सध्या वेगवान गोलंदाजीसाठी उत्तम असल्याने भारतीय संघ मोहम्मद सिराजला संघात संधी देऊ शकतो. त्याशिवाय जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी असणारच आहेत. तर फिरकीपटू म्हणून आर आश्विनला संधी देण्यात येईल.

इंग्लंड विरुद्ध पहिल्या टेस्टसाठी संभाव्य भारतीय संघ

केएल राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), आर अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह.

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट

दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट

तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट

चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर

पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.

हे ही वाचा 

IND vs ENG : सलामीवीर मयांक पहिल्या सामन्याला मुकणार, ‘या’ पर्यांयाचा वापर करु शकते टीम इंडिया

IND vs ENG : भारताविरुद्ध मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, चार दिग्गज खेळाडूंचे पुनरागमन

IND vs ENG : भारताचा नवखा गोलंदाज, 74 धावा देत 7 विकेट, 24 वर्षांनंतर लॉर्ड्सवर विजय

(In India vs England First Test mohammed siraj and kl rahul may Play in final 11)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.