AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK A vs IND A Final | पाकिस्तान टीम इंडिया भिडणार, कोण जिंकणार आशिया कप?

ind a vs pak a asia cup 2023 final | रविवारी 23 जुलै रोजी क्रिकेट चाहत्यांना हायव्होल्टेज सामना होणार आहे. एमर्जिंग आशिया कप जिंकण्यासाठी पाकिस्तान ए विरुद्ध टीम इंडिया आमनेसामने असणार आहेत.

PAK A vs IND A Final | पाकिस्तान टीम इंडिया भिडणार, कोण जिंकणार आशिया कप?
| Updated on: Jul 22, 2023 | 10:56 PM
Share

कोलंबो | पाकिस्तान आणि टीम इंडिया, 2 सख्खे शेजारी आणि पक्के वैरी. खेळ कोणताही असो, उभयसंघातील सामन्याकडे दोन्ही देशांचं नाही तर क्रीडा विश्वाचं लक्ष असतं. आता आशिया कप आणि त्यानंतर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत हे कडवट प्रतिस्पर्धी आमनेसामने भिडणार आहेत. मात्र त्याआधी रविवारी 23 जुलै रोजी एसीसी मेन्स एमर्जिंग एशिया कप स्पर्धेत पाकिस्तान ए विरुद्ध टीम इंडिया ए यांच्यात आरपारचा सामना होणार आहे. एशिया किंग होण्यासाठी दोन्ही संघात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.

टीम इंडिया ए ने शुक्रवारी बांगलादेश ए ला 51 धावांनी विजय मिळवत फायनलमध्ये एन्ट्री मारली. तर त्याआधी पहिल्या सेमी फायनलमध्ये पाकिस्तानने श्रीलंकेचा 60 रन्सने खुर्दा उडवला. पाकिस्तानने साखळी फेरीत 3 पैकी 2 सामन्यात विजय मिळवला. तर टीम इंडिया विरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानला जिंकता आलं नाही. तर टीम इंडियाने साखळी फेरीत तिन्ही सामने जिंकले.

पाकिस्तान-टीम इंडिया दुसऱ्यांदा आमनेसामने

दरम्यान पाकिस्तान टीम इंडिया या स्पर्धेत फायनलआधी साखळी फेरीत 19 जुलैला आमनेसामने आले होते. त्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानवर 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला होता. त्यामुळे आताही अंतिम सामन्यात पाकिस्तानचा सुपडा साफ करण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असणार आहे.

10 वर्षांनंतर पुनरावृत्तीची संधी

दरम्यान टीम इंडिया ए टीमने आजपासून 10 वर्षांपूर्वी पाकिस्तान विरुद्ध सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात 9 विकेट्सने विजय मिळवला होता. पाकिस्तानने विजयसाठी दिलेलं 160 धावांचं आव्हान टीम इंडियाने केएल राहुल याच्या नाबाद 93 धावांच्या जोरावर पूर्ण केलं होतं. आता यश धूल सूर्यकुमार यादव याच्यानंतर टीम इंडियाला 10 वर्षानंतर पाकिस्तानलाच पराभूत करत एशिया किंग करणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांची बारीक नजर असणार आहे.

पाकिस्तान ए टीम | मोहम्मद हारिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), सैम अयुब, साहिबजादा फरहान, ओमेर युसूफ, तय्यब ताहिर, कासिम अक्रम, मुबासिर खान, अमद बट, मोहम्मद वसीम जूनियर, सुफियान मुकीम, अर्शद इक्बाल, हसीबुल्ला खान, मेहरान मुमताज आणि कामरान गुलाम.

टीम इंडिया ए | यश धुल (कॅप्टन), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), साई सुदर्शन, अभिषेक शर्मा, निकिन जोस, निशांत सिंधू, रियान पराग, हर्षित राणा, मानव सुथार, राजवर्धन हंगरगेकर, युवराजसिंह डोडिया, प्रभसिमरन सिंग, आकाश सिंग, नितीश पॉल रेड्डी आणि प्रदोष पॉल.

Follow Us
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.