AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अतितटीच्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर कर्णधार तिलक वर्माने मांडला लेखाजोखा, म्हणाला…

तिरंगी एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारत अ संघाने श्रीलंका अ संघाला पराभवाची धूळ चारली. या सामन्यात शेवटच्या दोन षटकात कमाल झाली. भारताने हातातून गेलेला सामना जिंकला. या विजयानंतर भारताचा कर्णधार तिलक वर्माने लेखाजोखा मांडला आहे.

अतितटीच्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर कर्णधार तिलक वर्माने मांडला लेखाजोखा, म्हणाला...
अतितटीच्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर कर्णधार तिलक वर्माने मांडला लेखाजोखा, म्हणाला...Image Credit source: PTI
| Updated on: Jun 09, 2026 | 10:39 PM
Share

भारत अ आणि श्रीलंका अ संघ तिरंगी मालिकेतील पहिल्या सामन्यात आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. तसेच 50 षटकात 6 गडी गमवून 277 धावा केल्या आणि विजयासाठी 278 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने चांगली सुरूवात केली. त्यामुळे हा सामना भारताच्या हातून जाईल असंच वाटलं होतं. पण एक चमत्कार घडावा तसा हा सामना फिरला. श्रीलंकेच्या तोंडात असलेला विजयाचा घास भारताने हिरावून घेतला. या सामन्यातील 48 आणि 49 व्या षटकात श्रीलंकेने 4 विकेट गमावल्या. त्यामुळे भारताला विजय मिळाला. श्रीलंकेला 18 चेंडूत 17 धावा करता आल्या नाहीत. अवघ्या 8 धावांवर चार विकेट गमावल्या आणि भारताने हा सामना जिंकला. या विजयानंतर भारताचा कर्णधार तिलक वर्माने या सामन्याचा लेखाजोखा मांडला.

सामना भारताच्या बाजूने कधी झुकला? याबाबत भारत अ संघाचा कर्णधार तिलक वर्मा म्हणाला की, ‘साहन ज्या प्रकारे फलंदाजी करत होता ती खूपच चांगली होती, मला वाटतं की जेव्हा अंशुलने तो यॉर्कर टाकला आणि साहन बाद झाला, ती एक महत्त्वाची विकेट होती आणि तिथेच सामन्याला कलाटणी मिळाली. विशेषतः आमचे सलामीचे गोलंदाज अर्शद आणि कंबोज यांनी पहिल्या स्पेलमध्ये फारशी चांगली गोलंदाजी केली नसली तरी, ज्या प्रकारे त्यांनी सामना संपवला ते पाहणे जबरदस्त होते.’

तिलक वर्मा खेळपट्टीबाबत स्पष्टपणे म्हणाला की, ‘खेळपट्टी फारशी बदललेली नाही. आम्हाला वाटलं होतं की दुसऱ्या डावात ती आणखी संथ होईल, पण खरं सांगायचं तर, खेळपट्टी फारशी बदललेली नाही. पण जसं मी नाणेफेकीच्या वेळी म्हणालो, 270 धावा चांगल्या होत्या, पण मला वाटतं की आम्ही आता नव्याने विचार करू आणि चांगल्या ठिकाणी गोलंदाजी कशी करायची हे पाहू आणि पुढच्या सामन्यात पुनरागमन करू.’

तिलक वर्मा पुढे म्हणाला की, श्रीलंकेत श्रीलंका आणि अफगाणिस्तानसारख्या खूप चांगल्या संघांविरुद्ध खेळताना आव्हान असेल. तुम्ही पाहिले तर, आम्ही श्रीलंकेविरुद्ध खेळलेली शेवटची मालिका त्यांनी जिंकली होती. पण आम्हाला माहित आहे की ही स्पर्धा किती चुरशीची असेल आणि आम्ही त्यासाठी तयारी केली आहे, आणि मला आनंद आहे की पहिला सामना आमच्या बाजूने आहे.

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष