AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS 5TH T20I | अर्शदीप सिंहची गेमचेंजिग ओव्हर, टीम इंडियाचा 6 धावांनी विजय

INDIA vs AUSTRALIA 5TH T20I | अर्शदीप सिंह याने शेवटच्या ओव्हरमध्ये सामना फिरवत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. टीम इंडियाच्या इतर गोलंदाजांनीही 161 धावांच्या बचावात निर्णायक भूमिका बजावली.

IND vs AUS 5TH T20I | अर्शदीप सिंहची गेमचेंजिग ओव्हर, टीम इंडियाचा  6 धावांनी विजय
| Updated on: Dec 03, 2023 | 10:47 PM
Share

बंगळुरु | टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर रंगतदार झालेल्या पाचव्या आणि शेवटच्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर 6 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 161 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाला मात्र 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 154 धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाला 20 व्या ओव्हरमध्ये विजयासाठी 10 धावांची गरज होती. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन मॅथ्यु वेड मैदानात उभा होता. मात्र अर्शदीपने हुशारीने बॉलिंग केली. अर्शदीपने धोकादायक मॅथ्यु वेड याला आऊट केलं आणि सामना फिरवला. तसेच अर्शदीपने शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावांचा शानदार बचाव करत फक्त 3 रन्सच दिल्या.

ऑस्ट्रेलियाकडून बेन मॅकडरमॉट याने सर्वाधिक 54 धावांची खेळी केली. ट्रेव्हिस हेड याने 28 धावांचं योगदान दिलं. टीम डेव्हिड याने 17 आणि मॅथ्यु शॉर्ट याने 16 धावा जोडल्या. आरोन हार्डी याने 6 तर जोश फिलीपी 4 धावा करुन माघारी परतला. बेन ड्वार्शुइस आला तसाच झिरोवर परत करत गेला. कॅप्टन मॅथ्यू वेड याने 22 धावा केल्या. तर नॅथन एलिस याने 4 आणि जेसन बेहरेनड्रोफ याने 2 धावा केल्या. टीम इंडियाकडून मुकेश कुमार याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंह या दोघांनी प्रत्येकी 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर अक्षर पटेल याने 1 विकेट घेतली.

टीम इंडियाची बॅटिंग

दरम्यान त्याआधी ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 160 धावा केल्या. टीम इंडियाडकडून यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या सलामी जोडीने अनुक्रमे 21 आणि 10 धावा केल्या. श्रेयस अय्यर याने टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा केल्या. श्रेयसने 37 बॉलमध्ये 5 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 53 रन्स केल्या. कॅप्टन सूर्यकुमार यादव 5 आणि रिंकू सिंह 6 रन्स करुन तंबूत परतले. विकेटकीपर जितेश शर्मा याने 24 आणि अक्षर पटेल याने 31 धावा केल्या. तर रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंह या दोघांनी 2-2 धावा जोडल्या.

टीम इंडिया विजयी

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), अक्षर पटेल, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंग.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | मॅथ्यू वेड (कॅप्टन आणि विकेटकीपर), ट्रेव्हिस हेड, जोश फिलिप, बेन मॅकडरमॉट, एरॉन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ आणि तन्वीर संघा.

Follow Us
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं विधान...
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं अगदी जिव्हारी लागणारं वक्तव्य
राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट
मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट: राज्याच्या विकासासाठी मागितले सहकार्य
रायगडला नवा पालकमंत्री. गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव...
रायगडला नवा पालकमंत्री. गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला,पालकमंत्रीपदी गोगावले, महाजन यांची नियुक्ती
रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले, नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट...
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट याचिकाकर्त्यांनाच नोटीस; ED, CBI...
दिमागी नक्षलवाद: सोशल मीडियावर नवीन ट्रेंड, लाखोंनी केले फॉलो
दिमागी नक्षल पार्टीचा सोशल मीडियावर धुमाकूळ: पंतप्रधानांच्या शब्दातून झालेली ऑनलाईन चळवळ
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना दिले तातडीचे निर्देश... झारखंड विद्यार्थी
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना दिले तातडीचे निर्देश... झारखंड विद्यार्थी आंदोलनावर अखेर राहुल गांधींनी सोडलं मौन
दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! CM फडणवीस आणि पंतप्रधानांच्या भेटीत...
दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! CM फडणवीस आणि पंतप्रधानांच्या भेटीत नेमकं काय घडलं? मोठी अपडेट समोर