AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला नमवलं, मालिकेत 1-1 ने बरोबरी

भारताने ऑस्टेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात विजय मिळवला. यासह पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. आता मालिका विजयासाठी दोन्ही संघांना पुढचे दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत.

तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला नमवलं, मालिकेत 1-1 ने बरोबरी
तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला नमवलं, मालिकेत 1-1 ने बरोबरीImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Nov 02, 2025 | 5:19 PM
Share

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना 6 गडी राखून जिंकला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 187 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान भारताने 5 गडी गमवून पूर्ण केलं. भारताने ऑस्ट्रेलियाने दिलेलं आव्हान 5 गडी राखून 18.3 षटकात पूर्ण केलं. विजयी धावांचा पाठलाग करताना भारताने आक्रमक सुरुवात केली. अभिषेक शर्माने चांगली सुरुवात केली. त्याने 16 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकार मारत 25 धावांची खेळी केली. पहिल्या विकेटसाठी अभिषेक शर्माने गिलसोबत 33 धावांची भागीदारी केली. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि शुबमन गिल यांच्यात 28 धावांची भागीदारी झाली. शुबमन गिल 12 चेंड़ूत 1 चौकाराच्या मदतीने 15 धावा केल्या. गिलची विकेट पडल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माकडून अपेक्षा होत्या. पण सूर्यकुमार यादव फटका मारताना चुकला आमि 24 धावांवर तंबूत परतावं लागलं.

अक्षर पटेल पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. आक्रमक फटकेबाजी करून संघावरील दडपण कमी करेल अशी अपेक्षा होती. अक्षर पटेल पण काही खास करू शकला नाही. त्याने 12 चेंडूत 1 चौकार मारत 17 धावा केल्या. पण तिलक वर्मासोबत 22 चेंडूत 35 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर आणि तिलक वर्मा यांच्यातील आक्रमक भागीदारी संघासाठी महत्त्वाची ठरली. या दोघांनी 19 चेंडूत 34 धावा केल्या. मात्र एक चुकीचा फटका आणि तिलक वर्माचा डाव 29 धावांवर संपला.

वॉशिंग्टनची खेळी भारतासाठी खूपच महत्त्वाची ठरली. टिम डेविडचा झेल सोडल्याने टीम इंडियाला 54 धावांचा फटका बसला होता. मात्र फलंदाजीत त्याने त्याची वसुली केली. त्याने 24 चेंडूत 53 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे टीम इंडियाला विजय मिळवता आला. वॉशिंग्टन सुंदर आणि जितेश शर्मा यांनी 25 चेंडूत नाबाद 43 धावांची भागीदारी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

ऑस्ट्रेलियाकडून सीन अबोट हा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने 3.3 षटकात 56 धावा दिल्या. त्याला एकही विकेट घेता आली नाही. तर नाथन एलिसने 4 षटकात 36 धावा देत 3 गडी बाद केले. झेव्हियर्स बार्लेट आणि मार्कस स्टोयनिस यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.या विजयासह मालिकेत तीन सामन्यानंतर 1-1 अशी बरोबरी झाली. त्यामुळे उर्वरित दोन्ही सामन्यात मालिका विजयासाठी जिंकणं भाग आहे. पहिला सामना पावसामुळे झाला नव्हता.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.