AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला नमवलं, मालिकेत 1-1 ने बरोबरी

भारताने ऑस्टेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात विजय मिळवला. यासह पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. आता मालिका विजयासाठी दोन्ही संघांना पुढचे दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत.

तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला नमवलं, मालिकेत 1-1 ने बरोबरी
तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला नमवलं, मालिकेत 1-1 ने बरोबरीImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Nov 02, 2025 | 5:19 PM
Share

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना 6 गडी राखून जिंकला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 187 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान भारताने 5 गडी गमवून पूर्ण केलं. भारताने ऑस्ट्रेलियाने दिलेलं आव्हान 5 गडी राखून 18.3 षटकात पूर्ण केलं. विजयी धावांचा पाठलाग करताना भारताने आक्रमक सुरुवात केली. अभिषेक शर्माने चांगली सुरुवात केली. त्याने 16 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकार मारत 25 धावांची खेळी केली. पहिल्या विकेटसाठी अभिषेक शर्माने गिलसोबत 33 धावांची भागीदारी केली. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि शुबमन गिल यांच्यात 28 धावांची भागीदारी झाली. शुबमन गिल 12 चेंड़ूत 1 चौकाराच्या मदतीने 15 धावा केल्या. गिलची विकेट पडल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माकडून अपेक्षा होत्या. पण सूर्यकुमार यादव फटका मारताना चुकला आमि 24 धावांवर तंबूत परतावं लागलं.

अक्षर पटेल पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. आक्रमक फटकेबाजी करून संघावरील दडपण कमी करेल अशी अपेक्षा होती. अक्षर पटेल पण काही खास करू शकला नाही. त्याने 12 चेंडूत 1 चौकार मारत 17 धावा केल्या. पण तिलक वर्मासोबत 22 चेंडूत 35 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर आणि तिलक वर्मा यांच्यातील आक्रमक भागीदारी संघासाठी महत्त्वाची ठरली. या दोघांनी 19 चेंडूत 34 धावा केल्या. मात्र एक चुकीचा फटका आणि तिलक वर्माचा डाव 29 धावांवर संपला.

वॉशिंग्टनची खेळी भारतासाठी खूपच महत्त्वाची ठरली. टिम डेविडचा झेल सोडल्याने टीम इंडियाला 54 धावांचा फटका बसला होता. मात्र फलंदाजीत त्याने त्याची वसुली केली. त्याने 24 चेंडूत 53 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे टीम इंडियाला विजय मिळवता आला. वॉशिंग्टन सुंदर आणि जितेश शर्मा यांनी 25 चेंडूत नाबाद 43 धावांची भागीदारी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

ऑस्ट्रेलियाकडून सीन अबोट हा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने 3.3 षटकात 56 धावा दिल्या. त्याला एकही विकेट घेता आली नाही. तर नाथन एलिसने 4 षटकात 36 धावा देत 3 गडी बाद केले. झेव्हियर्स बार्लेट आणि मार्कस स्टोयनिस यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.या विजयासह मालिकेत तीन सामन्यानंतर 1-1 अशी बरोबरी झाली. त्यामुळे उर्वरित दोन्ही सामन्यात मालिका विजयासाठी जिंकणं भाग आहे. पहिला सामना पावसामुळे झाला नव्हता.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.