AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : टीम इंडिया मालिका विजयासाठी सज्ज, ऑस्ट्रेलियासाठी करो या मरो सामना, कोण जिंकणार?

Australia vs India Women 2nd T20i Preview : ऑस्ट्रेलिया वूमन्स टीमसाठी गुरुवार निर्णायक ठरणार आहे. ऑस्ट्रेलिया या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे कांगारुंसाठी दुसरा सामना हा करो या मरो असा आहे.

IND vs AUS : टीम इंडिया मालिका विजयासाठी सज्ज, ऑस्ट्रेलियासाठी करो या मरो सामना, कोण जिंकणार?
Harmanpeet Kaur Shafali Verma Team IndiaImage Credit source: Bcci
| Updated on: Feb 19, 2026 | 2:11 AM
Share

वूमन्स टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. टीम इंडिया या दौऱ्यात सध्या टी 20i मालिका खेळत आहे.  उभयसंघात टी 20i मालिकेनंतर वनडे सीरिज खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर एकमेव कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे. सध्या टीम इंडिया या 3 सामन्यांच्या टी 20i मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारताला सलग दुसरा सामना जिंकून मालिकेवर नाव कोरण्याची संधी आहे. यजमान संघाची सुरुवात पराभवाने झाली. त्यामुळे आता मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या सामन्यात कोणत्याही स्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे दुसर्‍या सामन्यात कांगारुंचा चांगलाच कस लागणार आहे. त्यामुळे या सामन्यात यजमान पाहुण्या संघासमोर कशी कामगिरी करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टीम इंडियाची विजयी सलामी

टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात रविवारी 15 फेब्रुवारीला ऑस्ट्रेलियावर डीएलएसनुसार 21 धावांनी विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियाने सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये 18 ओव्हरमध्ये ऑलआऊट 133 धावा केल्या होत्या. त्यानंतर टीम इंडियाच्या बॅटिंगदरम्यान पावसाने खोडा घातला. भरताने तोवर 5.1 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 50 धावा केल्या. त्यानंतर पावसामुळे सामन्याचा निकाल डीएलएसनुसार लावण्यात आला. भारताने हा सामना 21 धावांनी जिंकला. भारताने अशाप्रकारे 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.

टीम इंडियाला मालिका विजयाची संधी

आता टीम इंडियाला सलग दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलिया मालिका वाचवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर दुसऱ्या बाजूला मालिका गमवायची नसेल तर ऑस्ट्रेलियाला कोणत्याही स्थितीत दुसरा सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्याच्या निकालाकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

दुसऱ्या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती

उभयसंघातील दुसरा सामना हा कॅनबेरातील मानुका ओव्हलमध्ये होणार आहे. सोफी मोलिनेक्स ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. सामन्याला दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

प्रतिका रावलचा समावेश

दरम्यान भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात टी 20i मालिकेनंतर वनडे सीरिजचा थरार रंगणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात सलामीवीर प्रतिका रावल हीचा समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. उभयसंघात 24 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान ही मालिका होणार आहे.

Follow Us
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा....
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार.
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह...
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात...
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर..
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर...
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये..
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये...
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!.
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,.
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;.
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले....
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले.....